शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीवरील बेलोरा, मुंगोली, धानोरा पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:50 IST

या परिसरात वर्धा नदीवर बेलोरा, मुंगोली व धानोरा येथे पूल आहे. या तिन्ही पुलांवरून रात्रंदिवस जडवाहनाची वर्दळ सुरू असते. विशेषत: कोळसा, सिमेंट व लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठया प्रमाणात होत असते.

ठळक मुद्देबांधकाम विभागाने लक्ष द्यावे : पुलावर खड्डे व सळाखी बाहेर निघाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : या परिसरात वर्धा नदीवर बेलोरा, मुंगोली व धानोरा येथे पूल आहे. या तिन्ही पुलांवरून रात्रंदिवस जडवाहनाची वर्दळ सुरू असते. विशेषत: कोळसा, सिमेंट व लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठया प्रमाणात होत असते. मात्र मागील काही वर्षात या पुलाच्या देखरेखीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस पुलाची अवस्था दयनीय होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.वर्धा नदी बेलोरा घाटावरील पूल तयार होऊन १९८७ मध्ये रहदारी सुरू झाली. टोल वसुली झाली. त्यानंतर वर्धा नदीच्या काठावर दोन्ही बाजुने वेकोलिने ओ. बी. (माती) टाकली. त्यामुळे सदर पुलाच्या बेलोरा साईडची माती पुराच्या पाण्याने वाहून गेली. पुलाला धोका निर्माण झाल्याने १९९९ मध्ये पुलाचे वाढीव काम करण्यात आले. त्यावेळीसुद्धा वाहनधारकाकडून टोल वसुली करण्यात आली होती. सदर पुलावरून मोठया प्रमाणात कोळशाची ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस होत असल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले. पुलाच्या सळाखी बहार निघाल्या. पुलाची दूरवस्था झाली. वेकोलिच्या कामगार संघटना, सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी वेकोलि व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. आणि उशिरा का होईना, मागील वर्षी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने एक कोटी रुपये खर्च करून खड्डे बुजविण्यात आले. मात्र एका वर्षात या कामाला तडे जाऊ लागले. या पुलाच्या बाजूने दुचाकी व सायकलीच्या रहदारीकरीता व्यवस्था आहे. पुलावर सिमेंट कॉकेटचे पिल्लर टाकून ही व्यवस्था केली आहे. पण त्या रस्त्याच्या साफसफाईकडे संबंधिताचे दुर्लक्ष झाल्याने धुळ जमा होऊन पावसाने चिखल झाले आहे. सिमेंट कॉकेटचे पिल्लर अनेक ठिकाणी तुटून पडले असल्यामुळे रहदारी प्रभावित झाली आहे. जडवाहनांच्या रस्त्याने दुचाकीवरून प्रवास करावा लागतो.वर्धा नदी धानोरा पुलावरून आंध्र, गडचांदूर कडून वणी, यवतमाळ, मुबंईकडे रात्रंदिवस जडवाहनांची वर्दळ असते. रस्त्याची दुर्दशा झाली. त्याच बरोबर सदर पुलावर मोठमोठे खड्डे पडले. पुलाच्या सळाखी निघाल्यामुळे पुलाची दूरवस्था झाली. पुलाला कठडे नसल्याने व पडलेल्या खड्डयामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सदर पुलाच्या गंभीर समस्येबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते इबादुल हसन यांनी पुलावरील मोठमोठ्या खड्डयाचे फोटो काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना पाठविले आणि तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. यावर संबंधित अधिकाºयांनी पुलाची पाहणी करून तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.हिच परिस्थिती वर्धा नदी मुंगोली पुलाची झाली आहे. सदर पुलावरून घुग्घुस मार्गे मुंगोली, सिंदोला, अदिलाबाद, वणीकडे जाणाºया वाहनाची वर्दळ असते. तसेच मुंगोली, कोलगाव कोळसा खाणीतून घुग्घुस रेल्वे सायडींग व चंद्रपूर, नागपूरकडे कोळसाची सुमारे २००४ पासून वाहतूक सुरू आहे. पुलाला कठडे नसल्याने अनेकदा ट्रक नदीत पडले. वारंवार कठडे लावण्याची मागणी झाल्यानंतर थातूरमातूर तारा बांधल्या आहे. पण पुलावर जागोजागी खड्डे पडले व सळाखी निघाल्याने पुलावरून वाहन नेताना चालकाला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.