शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

वर्धा नदीवरील बेलोरा, मुंगोली, धानोरा पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:50 IST

या परिसरात वर्धा नदीवर बेलोरा, मुंगोली व धानोरा येथे पूल आहे. या तिन्ही पुलांवरून रात्रंदिवस जडवाहनाची वर्दळ सुरू असते. विशेषत: कोळसा, सिमेंट व लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठया प्रमाणात होत असते.

ठळक मुद्देबांधकाम विभागाने लक्ष द्यावे : पुलावर खड्डे व सळाखी बाहेर निघाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : या परिसरात वर्धा नदीवर बेलोरा, मुंगोली व धानोरा येथे पूल आहे. या तिन्ही पुलांवरून रात्रंदिवस जडवाहनाची वर्दळ सुरू असते. विशेषत: कोळसा, सिमेंट व लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठया प्रमाणात होत असते. मात्र मागील काही वर्षात या पुलाच्या देखरेखीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस पुलाची अवस्था दयनीय होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.वर्धा नदी बेलोरा घाटावरील पूल तयार होऊन १९८७ मध्ये रहदारी सुरू झाली. टोल वसुली झाली. त्यानंतर वर्धा नदीच्या काठावर दोन्ही बाजुने वेकोलिने ओ. बी. (माती) टाकली. त्यामुळे सदर पुलाच्या बेलोरा साईडची माती पुराच्या पाण्याने वाहून गेली. पुलाला धोका निर्माण झाल्याने १९९९ मध्ये पुलाचे वाढीव काम करण्यात आले. त्यावेळीसुद्धा वाहनधारकाकडून टोल वसुली करण्यात आली होती. सदर पुलावरून मोठया प्रमाणात कोळशाची ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस होत असल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले. पुलाच्या सळाखी बहार निघाल्या. पुलाची दूरवस्था झाली. वेकोलिच्या कामगार संघटना, सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी वेकोलि व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. आणि उशिरा का होईना, मागील वर्षी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने एक कोटी रुपये खर्च करून खड्डे बुजविण्यात आले. मात्र एका वर्षात या कामाला तडे जाऊ लागले. या पुलाच्या बाजूने दुचाकी व सायकलीच्या रहदारीकरीता व्यवस्था आहे. पुलावर सिमेंट कॉकेटचे पिल्लर टाकून ही व्यवस्था केली आहे. पण त्या रस्त्याच्या साफसफाईकडे संबंधिताचे दुर्लक्ष झाल्याने धुळ जमा होऊन पावसाने चिखल झाले आहे. सिमेंट कॉकेटचे पिल्लर अनेक ठिकाणी तुटून पडले असल्यामुळे रहदारी प्रभावित झाली आहे. जडवाहनांच्या रस्त्याने दुचाकीवरून प्रवास करावा लागतो.वर्धा नदी धानोरा पुलावरून आंध्र, गडचांदूर कडून वणी, यवतमाळ, मुबंईकडे रात्रंदिवस जडवाहनांची वर्दळ असते. रस्त्याची दुर्दशा झाली. त्याच बरोबर सदर पुलावर मोठमोठे खड्डे पडले. पुलाच्या सळाखी निघाल्यामुळे पुलाची दूरवस्था झाली. पुलाला कठडे नसल्याने व पडलेल्या खड्डयामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सदर पुलाच्या गंभीर समस्येबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते इबादुल हसन यांनी पुलावरील मोठमोठ्या खड्डयाचे फोटो काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना पाठविले आणि तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. यावर संबंधित अधिकाºयांनी पुलाची पाहणी करून तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.हिच परिस्थिती वर्धा नदी मुंगोली पुलाची झाली आहे. सदर पुलावरून घुग्घुस मार्गे मुंगोली, सिंदोला, अदिलाबाद, वणीकडे जाणाºया वाहनाची वर्दळ असते. तसेच मुंगोली, कोलगाव कोळसा खाणीतून घुग्घुस रेल्वे सायडींग व चंद्रपूर, नागपूरकडे कोळसाची सुमारे २००४ पासून वाहतूक सुरू आहे. पुलाला कठडे नसल्याने अनेकदा ट्रक नदीत पडले. वारंवार कठडे लावण्याची मागणी झाल्यानंतर थातूरमातूर तारा बांधल्या आहे. पण पुलावर जागोजागी खड्डे पडले व सळाखी निघाल्याने पुलावरून वाहन नेताना चालकाला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.