शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

बैलजोडी गेली; मशागत कशी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:34 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटांना बळी ठरत असतो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतपीक धोक्यात येत असून शेती हमखास पिकेलच याची शाश्वती आता बळीराजाला राहिलेली नाही.

ठळक मुद्देकाळाचा घाला : नापिकीमुळे नागवलेल्या शेतकऱ्याची अगतिकता

शशिकांत गणवीर।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटांना बळी ठरत असतो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतपीक धोक्यात येत असून शेती हमखास पिकेलच याची शाश्वती आता बळीराजाला राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल असून आर्थिक विवंचनात सापडल्याचे चित्र आहे. अशातच ७० हजार खर्चुन नवी बैलजोडी घेतली. मात्र वीज पडून डोळ्यादेखत दोन्ही बैलांचा तडफडून मृत्यू झाला. आता खरीप हंगामात मशागत कशी करायची, असा प्रश्न आपादग्रस्त शेतकºयापुढे उभे ठाकला आहे.मागील काही दिवसात उन्हाळ्याच्या तीव्र दाहकतेने मानवासह सर्वाचीच लाहीलाही होत असतानाच वादळी वाºयाने जिल्ह्याला झोडपले. या वादळात अनेकांची घरे उद्ध्ववस्त होऊन निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळ व मेघगर्जनेत मूल तालुक्यातील सिंतळा येथील नागेंद्र घोनडे यांच्या अंगणात बांधून असलेल्या लाल्या-पांढऱ्या नामक बैलजोडीवर वीज कोसळली. यात दोन्ही बैल जागीच ठार झाले. या अचानक आलेल्या संकटाने शेतकरी हादरला. डोळ्यादेखत नवीन घेतलेली बैलजोडी क्षणार्धात मृत पावल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले अन् शेतकरी ढसाढसा रडला.मागील वर्षी पडलेल्या अत्यल्प पाऊस व धानपिकावर आलेल्या रोगाने धानपिक उद्ध्वस्त झाले. उत्पन्न निम्यावर आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. अशातच येणाऱ्या हंगामाची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. शासनाची कर्जमाफीचीही तारीख पे तारीख होत असल्याने नव्याने कर्ज मिळेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.नवीन हंगामाच्या मशागतीकरिता सिंतळा येथील शेतकरी नागेंद्र घोनडे यांनी ७० हजार रुपयांची बैलजोडी खरेदी केली होती. अन् या जोडीवर काळाने घाला घातल्याने शेतकरी हादरला आहे. या घटनेचा पंचनामा, शवविच्छेदन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मात्र प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याचे समजते. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत केव्हा मिळेल, याची शाश्वती नसल्याने येणाऱ्या हंगामाची मशागत कशाने करायची, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सदर शेतकऱ्याला तत्काळ निधी मंजूर करून मिळणारी नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.