शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बैलजोडी गेली; मशागत कशी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:34 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटांना बळी ठरत असतो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतपीक धोक्यात येत असून शेती हमखास पिकेलच याची शाश्वती आता बळीराजाला राहिलेली नाही.

ठळक मुद्देकाळाचा घाला : नापिकीमुळे नागवलेल्या शेतकऱ्याची अगतिकता

शशिकांत गणवीर।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटांना बळी ठरत असतो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतपीक धोक्यात येत असून शेती हमखास पिकेलच याची शाश्वती आता बळीराजाला राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल असून आर्थिक विवंचनात सापडल्याचे चित्र आहे. अशातच ७० हजार खर्चुन नवी बैलजोडी घेतली. मात्र वीज पडून डोळ्यादेखत दोन्ही बैलांचा तडफडून मृत्यू झाला. आता खरीप हंगामात मशागत कशी करायची, असा प्रश्न आपादग्रस्त शेतकºयापुढे उभे ठाकला आहे.मागील काही दिवसात उन्हाळ्याच्या तीव्र दाहकतेने मानवासह सर्वाचीच लाहीलाही होत असतानाच वादळी वाºयाने जिल्ह्याला झोडपले. या वादळात अनेकांची घरे उद्ध्ववस्त होऊन निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळ व मेघगर्जनेत मूल तालुक्यातील सिंतळा येथील नागेंद्र घोनडे यांच्या अंगणात बांधून असलेल्या लाल्या-पांढऱ्या नामक बैलजोडीवर वीज कोसळली. यात दोन्ही बैल जागीच ठार झाले. या अचानक आलेल्या संकटाने शेतकरी हादरला. डोळ्यादेखत नवीन घेतलेली बैलजोडी क्षणार्धात मृत पावल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले अन् शेतकरी ढसाढसा रडला.मागील वर्षी पडलेल्या अत्यल्प पाऊस व धानपिकावर आलेल्या रोगाने धानपिक उद्ध्वस्त झाले. उत्पन्न निम्यावर आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. अशातच येणाऱ्या हंगामाची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. शासनाची कर्जमाफीचीही तारीख पे तारीख होत असल्याने नव्याने कर्ज मिळेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.नवीन हंगामाच्या मशागतीकरिता सिंतळा येथील शेतकरी नागेंद्र घोनडे यांनी ७० हजार रुपयांची बैलजोडी खरेदी केली होती. अन् या जोडीवर काळाने घाला घातल्याने शेतकरी हादरला आहे. या घटनेचा पंचनामा, शवविच्छेदन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मात्र प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याचे समजते. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत केव्हा मिळेल, याची शाश्वती नसल्याने येणाऱ्या हंगामाची मशागत कशाने करायची, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सदर शेतकऱ्याला तत्काळ निधी मंजूर करून मिळणारी नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.