शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘त्या’ शेतातील पिकांची निगा राखते ‘ती’ घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:28 IST

सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते.

ठळक मुद्देशेतरक्षक असे नामकरण केले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीची मशागत...त्यानंतर पेरणी...धरित्रीच्या उदरातून अकुंरलेल्या बीजांपासून ते उत्पन्न घरी येईपर्यंत पिकाला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपावे लागते. ही खटाटोप करूनही उत्पन्न हाती नाही लागले, तर शेतकरी हवालदिल होतो आणि मग तो नैराशात वावरतो. परंतु चंद्रपुरातील एका तरुण शेतकऱ्याने नैराशाच्या गर्तेत न राहता वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अफलातून शक्कल शोधून काढली. आता त्याच्या पिकांचे रक्षण त्याने शेतीत लावलेली स्वयंचलित घंटा करीत आहे. या यंत्राचे त्यांनी शेतरक्षक असे नामकरणही केलेले आहे. हे यंत्र पूर्णत: वॉटर प्रूफ असल्यामुळे विद्युत शॉकचा धोका नाही, हे विशेष.सुहास पिंगे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव. त्यांचे वास्तव्य चंद्रपुरातील गोकुळ गली येथे आहे. त्यांची शेती वरोरा तालुक्यातील गौळ येथे आहे. त्याच्या शेतीचा ४० टक्के भाग हा जंगलाला लागून आहे. रानडुक्कर, चितळ, नीलगाय व ससे या वन्यजीवांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीची नासाडी होत होती. अनेक उपाय करूनही यात त्यांना यश आले नाही. रात्री माणसे जागलीला जात होती. तरीही वन्यजीव जुमानत नव्हते. यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी सोलर पॉवर कुंपण मशीनही लावून बघितली. तरीही काहीएक उपयोग झाला नाही. पिंगे यांनी आयटीआयमध्ये इलेट्रॉनिक्स ट्रेडचे शिक्षण घेतलेले आहे. हा अनुभव पाठीशी असल्याने त्यांनी पीक संरक्षणासाठी अनोखा प्रयोग करून बघितला आणि यात त्यांना यश आले.सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. त्यासाठी त्यांना केवळ साडेपाच हजार रुपयांचा खर्च आला. १२ वॅटची बॅटरी, आॅटोस्टार्ट, स्पीकर, सर्च लाईट व ताट असे साहित्य वापरात आणले आहेत. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते. हे चक्र तिला विद्युत करंट मिळेपर्यंत कायम राहते. सकाळी शेतात गेल्यानंतर ती घंटा परत बंद करून ठेवतात. ही स्वयंचलित घंटा लावल्यापासून वन्यजीवांचा त्रास कायमचा बंद झाला असल्याचे शेतकरी सुहास पिंगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :agricultureशेती