शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

‘त्या’ शेतातील पिकांची निगा राखते ‘ती’ घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:28 IST

सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते.

ठळक मुद्देशेतरक्षक असे नामकरण केले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीची मशागत...त्यानंतर पेरणी...धरित्रीच्या उदरातून अकुंरलेल्या बीजांपासून ते उत्पन्न घरी येईपर्यंत पिकाला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपावे लागते. ही खटाटोप करूनही उत्पन्न हाती नाही लागले, तर शेतकरी हवालदिल होतो आणि मग तो नैराशात वावरतो. परंतु चंद्रपुरातील एका तरुण शेतकऱ्याने नैराशाच्या गर्तेत न राहता वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अफलातून शक्कल शोधून काढली. आता त्याच्या पिकांचे रक्षण त्याने शेतीत लावलेली स्वयंचलित घंटा करीत आहे. या यंत्राचे त्यांनी शेतरक्षक असे नामकरणही केलेले आहे. हे यंत्र पूर्णत: वॉटर प्रूफ असल्यामुळे विद्युत शॉकचा धोका नाही, हे विशेष.सुहास पिंगे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव. त्यांचे वास्तव्य चंद्रपुरातील गोकुळ गली येथे आहे. त्यांची शेती वरोरा तालुक्यातील गौळ येथे आहे. त्याच्या शेतीचा ४० टक्के भाग हा जंगलाला लागून आहे. रानडुक्कर, चितळ, नीलगाय व ससे या वन्यजीवांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीची नासाडी होत होती. अनेक उपाय करूनही यात त्यांना यश आले नाही. रात्री माणसे जागलीला जात होती. तरीही वन्यजीव जुमानत नव्हते. यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी सोलर पॉवर कुंपण मशीनही लावून बघितली. तरीही काहीएक उपयोग झाला नाही. पिंगे यांनी आयटीआयमध्ये इलेट्रॉनिक्स ट्रेडचे शिक्षण घेतलेले आहे. हा अनुभव पाठीशी असल्याने त्यांनी पीक संरक्षणासाठी अनोखा प्रयोग करून बघितला आणि यात त्यांना यश आले.सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. त्यासाठी त्यांना केवळ साडेपाच हजार रुपयांचा खर्च आला. १२ वॅटची बॅटरी, आॅटोस्टार्ट, स्पीकर, सर्च लाईट व ताट असे साहित्य वापरात आणले आहेत. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते. हे चक्र तिला विद्युत करंट मिळेपर्यंत कायम राहते. सकाळी शेतात गेल्यानंतर ती घंटा परत बंद करून ठेवतात. ही स्वयंचलित घंटा लावल्यापासून वन्यजीवांचा त्रास कायमचा बंद झाला असल्याचे शेतकरी सुहास पिंगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :agricultureशेती