शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

माना समाजबांधव रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:21 IST

माना समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही दिरंगाई होत आहे. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभूळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देतहसीलसमोर धरणे : प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : माना समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही दिरंगाई होत आहे. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभूळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली. मात्र प्रशासनाने अजून दखल घेतली नाही. त्यामुळे उपोषणाच्या आठव्या दिवशी मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयापुढे हजारो समाज बांधव उपस्थित झाले. तिथेच त्यांनी दिवसभर धरणे दिले. शासनाने माना समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा धडा शिकवू, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.नारायण जांभूळे यांच्या उपोषणाच्या आठव्या दिवशी हजारो समाज बांधवांनी धरणे दिले. उपोषणकर्ते जांभुळे यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी शनिवारी उपजिल्हा रूग्णालयात भरती केले होते. दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.दरम्यान आज मंगळवारी हजारो समाजबांधव या ठिकाणी उपस्थित झाले. तिथेच धरणे दिले. त्यानंतर तहसीलदार संजय नागतीलक, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी नारायण जांभुळे यांनी सुरू केलेल्या उपोषण मंडपाला भेट देऊन समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. त्यामुळे उपोषणाची सांगता झाली.यावेळी बळीराम गडमडे, अरविंद सांडेकर,रामराव ननावरे, देविदास जांभुले, मंदाताई चौखे, कुलदीप श्रीराम,वाल्मिक ननावरे, विलास चौधरी, सुरेंद्र मानमुंढरे, नामदेव घोडमारे, मनोहर जांभुळे, शंकर भरडे, रामदास चौधरी आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याजात प्रमाणपत्र वैधता सहा महिन्यात निकाली काढावी, आप्तसंबंध गृहित धरण्यासाठी १९८५ रोजीचा आदेश व मानववंश शास्त्राने दिलेल्या माहितीचा आधार घ्यावा, विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणांचा निपटारा करावा, न्यायालयाच्या आदेशानुसार माना, माने, मानी हे एकच असल्याबाबत परिपत्रक काढावे, डोमा गावाजवळील मुक्ताई देवस्थानला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, सुरजगड किल्ल्यावरील ठाकूर देव व देवस्थान परिसरातील अवैध खननाला आळा घालावा, वैरागड, माणिकगड, सुरजागड किल्ल्यांना ऐतिहासिक वारसा स्थळ जाहीर करण्याची मागणी माना समाजाने केली.३६ जणांना अटक व सुटकानागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील हजारोच्या संख्येत माना समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी ३६ जणांना अटक करून काही वेळाने सुटका केली. यामध्ये १७ महिला व १९ पुरुषांचा समावेश होता.