शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहार ठप्प, सर्वसामान्यांना झळ

By admin | Updated: November 10, 2016 02:01 IST

भारत सरकारने मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५००, १००० रुपयाच्या नोटा बंद केल्या. त्याचा परिणाम बुधवारी थेट व्यवहारावर दिसून आला.

ब्रह्मपुरी : भारत सरकारने मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५००, १००० रुपयाच्या नोटा बंद केल्या. त्याचा परिणाम बुधवारी थेट व्यवहारावर दिसून आला.ब्रह्मपुरी येथील बाजारपेठ दर बुधवारी बंद असते. त्यामुळे व्यापाऱ्यांवर देवाण-घेवाणीचा ताण दिसून आला नाही मात्र एटीएम व बँका बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली होती. बहुतांश नागरिकांनी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चिल्लरसाठी पेट्रोल भरण्याचा निमित्त करून जात होते. मात्र तेथेही निराक्षाच हाती आली. पेट्रोल पंपावर ५०० किंवा १००० रुपयाचा पेट्रोल, डिझेल मिळेल, नाही तर चिल्लर पैसे द्यावे लागेल, असा फतवा काढून फलक लावण्यात आलेले दिसून आले. नोटा बदलवायच्या कशा, पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न चौकाचौकात नागरिकांत चर्चीला जात होता. पेट्रोल पंपावरही चिल्लर कुठून येणार हे समजून घेत असताना काही नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंप चालकाशी वादही घातला. पण तो निरर्थक ठरला. ५०० व १००० रुपयाच्या नोटा बंद केल्याचे स्वागतही नागरिकांकडून केले जात होते. तर सर्वसामान्य नागरिकांना लागणारा दैनंदिन व्यवहार मात्र या निर्णयामुळे ठप्प झाल्याचे दिसून आले. बसेस, खाजगी वाहन याद्वारे होणाऱ्या वाहतुकीवरही नोटा बंदचा परिणाम दिसून आला. परिणामी प्रवाश्यांची संख्या रोडावलेली दिसून आली. प्रवासात असणाऱ्या प्रवाशांना नोटा बंद झाल्याची माहिती नव्हती. अशा काही प्रवाश्यांची वाहकांशी हुज्जतही झाली. मात्र दुसरा पर्याय नसल्याने अनेकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.उशिरापर्यंत मशीनवर भरले पैसे ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याची बातमी मंगळवारला सायंकाळी जशी माहीत झाली तसेच ग्राहकांनी आपल्याजवळ असलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी भारतीय स्टेट बँकच्या मशिनवर एकच गर्दी केली. रात्री १ ते दीडवाजेपर्यंत ग्राहकांनी पैसे भरण्यासाठी गर्दी केली होती. मात्र त्यानंतर सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांची गर्दी कमी झाली. ज्या नागरिकांकडे उधार पैसे दिले होते, ते पैसे देण्यासाठी अनेकांनी फोन केल्याचे काही नागरिकांनी सांगितले. मात्र नोटा चलनातून बंद झाल्याने ते स्वीकारण्यास जात नव्हते. भाजीबाजार, फुल विक्रेते, पानटपऱ्यावरही ५०० रूपयाची वस्तू खरेदी करूनही नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या.