शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्यीकरणाची कामे पाण्याखाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:19 IST

निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या अमलनाला सिंचन प्रकल्पाला क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला. सौंदर्यीकरणासाठी ३५ लाख रूपये मंजूर केले. त्यानंतर काम वेगाने सुरू केले. मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अमलनाला सिंचन प्रकल्प लवकरच शंभर टक्के भरला. व सर्व विकास कामे पाण्याखाली गेली.

ठळक मुद्देचुकीचे नियोजन : अमलनाला प्रकल्पातील लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ

अशोक डोईफोडे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या अमलनाला सिंचन प्रकल्पाला क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला. सौंदर्यीकरणासाठी ३५ लाख रूपये मंजूर केले. त्यानंतर काम वेगाने सुरू केले. मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अमलनाला सिंचन प्रकल्प लवकरच शंभर टक्के भरला. व सर्व विकास कामे पाण्याखाली गेली. कुंपण व भिंत पाण्याखाली आहे. सौंदर्यीकरणावर केलेला लाखो रूपयांचा खर्च योग्य नियोजन न केल्यामुळे व्यर्थ गेल्याचा आरोप केला जात आहे. सौंदर्यीकरणाची जागा उंच ठिकाणी निवडणे आवश्यक होते. उंच ठिकाणी जागा निवडली असती तर लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ गेला नसता, असे आता बोलले जात आहे. वनविभागाने याचा पुनश्च विचार करून सौंदर्यीकरणाची जागा बदलावी, अशी मागणी पर्यटक इबादूल हसन सिद्धीकी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन दिले आहे. या ठिकाणी बोटींग, हॉटेल, रिसोर्ट तयार करणे गरजेचे आहे.वेस्टवेअरवर पर्यटकांची गर्दीअंमलनाला प्रकल्प शंभर टक्के भरल्यानंतर वेस्टवेअर सुरू होतो. ते विलोभनीय स्थळ बघण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. यावर्षी तर लवकरच वेस्टवेअर सुरू झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी दररोज असते. रविवारी तर प्रचंड गर्दी असते. याठिकाणी वनविभागाने बोटींग, रिसोर्ट, हॉटेल, बगिचा तयार केल्यास पर्यटकांना सोईचे होईल. तसेच संरक्षण भिंत करणे गरजेचे आहे. पोलीस बंदोबस्त वाढविणेसुद्धा आवश्यक आहे. सेल्फीच्या नादात दुर्घटना होण्याची शक्यता आहे.रस्ता दुरूस्त करावाबैलमपूरपासून अमलनाला वेस्टवेअरपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उघडला आहे. हा रस्ता दुरूस्त करणे गरजेचे आहे. डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करावे, अशी मागणी आहे.