शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटींचे सौंदर्यीकरण गेले पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:49 IST

मध्य चांदा वनविभागातर्फे अंमलनाला धरणावर अंमलनाला पर्यटन स्थळाची निर्मिती करण्याकरिता दहा कोटी रूपये खर्च करून सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र प्रारंभीच काम पाण्यात बुडाल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देअंमलनाला पर्यटन स्थळ : योग्य नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : मध्य चांदा वनविभागातर्फे अंमलनाला धरणावर अंमलनाला पर्यटन स्थळाची निर्मिती करण्याकरिता दहा कोटी रूपये खर्च करून सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र प्रारंभीच काम पाण्यात बुडाल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोरपना तालुक्यासह जिवती तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने अंमलनाला धरण शंभर टक्के भरला. दोन वर्षांनंतर वेस्टवेअरवरून पाणी सुरू झाले आहे. त्यामुळे आजमितीला येथे पर्यटकांची मोठी गर्दी आहे.अंमलनालाकडे पर्यटकांचे वाढते आकर्षण बघता, गेल्या जानेवारी महिन्यामध्ये अंमलनाला पर्यटन क्षेत्राच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन आमदार संजय धोटे यांच्या हस्ते पार पडले. मात्र पहिल्याच पावसात संपूर्ण सौंदर्यीकरणाचे काम पाण्याखाली आले आहे.जवळपास दोन हेक्टर जागेमध्ये सुरू असलेल्या या कामाच्या जागेवर पूर्णपणे पाणी साचले असून संरक्षण भिंत पाण्याखाली आली आहे. अनेक कंत्राटदारांच्या माध्यमातून येथे वेगवेगळी कामे सुरू असून चुकीच्या नियोजनामुळे शासनाचा निधी व्यर्थ जाण्याची शक्यता दिसून येत आहे.वनविभागाने निवडलेल्या अभियंत्यांनी अभ्यासपूर्ण क्षेत्र न निवडल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम करण्याकरिता मुबलक जागा आहे. तरीही अगदी अंमलनाल्याला लागून पाण्याच्या जवळ काम केल्याने शासनाला दरवर्षी देखभाल-दुरुस्तीचा मोठा खर्च करावा लागणार आहे.महत्त्वाचे म्हणजे आजघडीला या ठिकाणी संपूर्ण दलदल झाल्याने सौंदर्यीकरणाचे काम करता येणे शक्य दिसत नाही.शासनाने या गंभीर बाबीची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन जागा निवडीबाबत फेरविचार करावा व केलेला खर्च लोकहिताचा व्हावा, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.रोप-वेच्या खाली प्रवेशद्वारदहा कोटींचे काम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून माणिकगड सिमेंट कंपनीचे रोप-वे आहे. ऐन रोप-वे असलेल्या ठिकाणी बगीचाचे प्रवेशद्वार तयार करण्यात येत असून नागरिकांना जोखीम पत्करून रोप-वेच्या खालून बगीचामध्ये जाण्याची वेळ येणार आहे. रोप-वे मधील चलनामधून छोटे दगड पडून डोक्याला सुद्धा इजा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.