शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

दुर्लक्षित किल्ल्याचे सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:58 IST

बल्लारपूर या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या वर्धा नदी काठावरील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देबल्लारपूर नगर पालिकेचा पुढाकार : आतील भागात पर्यटकांसाठी सुविधा

ऑनलाईन लोकमतबल्लारपूर : बल्लारपूर या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या वर्धा नदी काठावरील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. किल्ल्याच्या आतील भागाचे सौंदर्यीकरण आणि पर्यटकांना सोयी सुविधा निर्माण करण्याची कामे बल्लारपूर नगर परिषद करणार आहे.विकासात्मक कामे करण्याची पुरातत्व विभागाकडे नगर परिषदेने तयारी दर्शविली होती. पुरातत्व विभागाने त्याला हिरवी झेंडी दिली आहे. येथील ऐतिहासिक स्थळ गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. या किल्ल्याची वयोमानाप्रमाणे काही ठिकाणी पडझड झाली असली तरी यातील बराचसा भाग आणि नदीकाठा नजीकच्या भिंती सुस्थितीत आहेत. काही भागाची दुरुस्ती पुरातत्व विभागाने नुकतीच केली आहे. परंतु, आतील स्वच्छतेबाबत बोंब होती.किल्ल्यात सर्वत्र उगवणारे गवत आणि इतर हिरव्या कचऱ्यांमुळे किल्ल्यातील बरेचशा वास्तू झाकोळल्या गेल्या होत्या. बल्लारपूर नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन, पुरातत्व विभागाकडून परवानगी घेतली. त्यानंतर किल्ल्याचा आतील भाग स्वच्छ करण्याची मेहिम लोकसहभागातून हाती घेतली. जवळपास अडीच महिने सतत स्वच्छता मोहिम राबवून किल्ला पूर्णत: कचरामुक्त करण्यात आला.या दरम्यान पुरातत्व विभागाच्या चंद्रपूर तथा नागपूर येथील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व या मोहिमेतून किल्ल्याचा झालेला कायापालट बघून ते प्रभावीत झालेत. या कचरामुक्ती अभियानाच्या समारोपप्रसंगी नगर परिषद प्रशानाने किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी दर्शविली आणि पुरातत्व विभागाकडे नगर परिषदेने तसा प्रस्ताव पाठविला.या प्रस्तावाची दखल पुरातत्व विभागाने घेतली व त्या विभागाने नगर परिषदेच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची तयारी दर्शविली आहे. तसे पत्र नगर परिषदेला पुरातत्व विभागाकडून प्राप्त झाले आहे. किल्ल्याच्या सौंदर्यीकरणात बाग, बसण्याकरिता बेंचेस, सौर ऊर्जेतून प्रकाश व्यवस्था, पेयजल व्यवस्था, आवश्यक त्या ठिकाणी लोखंडी द्वार अशी व्यवस्था नगर परिषदेकडून केली जाणार आहे. शहरातील या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे, शहरातील व बाहेरील लोकांना येथे रमता यावे, किल्ल्यामागचा इतिहास लोकांना कळावा या उद्देशाने नगर परिषदेने या कामाकरिता पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांच्या प्रयत्नाने किल्ल्याच्या ढासळलेल्या भिंतीची दुरुस्ती पुरातत्व विभागाने केली.असा आहे बल्लारपूरच्या किल्ल्याचा इतिहासबल्लारपूर येथील किल्ला १३२० साली आदिया बल्लारशाह या राजाने बांधला. येथून सात राजांनी सत्ता गाजविली. बल्लारपूरचा शेवटचा राजा खांडक्या बल्लारशाहा याला चंद्रपूरला आजच्या अंचलेश्वर मंदिराच्या जागेवर साक्षात्कार घडला. त्याने प्रभावित होऊन तेथे किल्ला बांधून राजधानी तेथे करण्याचे ठरविले. खांडक्या बल्लारशहाने परकोटाची पायाभरणी केली. राजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्राने परकोट व किल्ला बांधून बल्लारपूरची राजधानी चंद्रपूरला हलविली. तेव्हापासून बल्लारपूरच्या या किल्ल्याचे महत्त्व काहीसे कमी झाले आणि हा किल्ला दुर्लक्षीत राहिला. मात्र, यावर्षी या किल्ल्याची पुरातत्व विभागाकडून चांगली निगा राखली जात आहे. त्यात नगर परिषदेचे सहकार्य मिळत असल्याने लवकरच किल्ल्याचे रूप पालटणार आहे.

टॅग्स :Fortगड