शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षित किल्ल्याचे सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:58 IST

बल्लारपूर या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या वर्धा नदी काठावरील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देबल्लारपूर नगर पालिकेचा पुढाकार : आतील भागात पर्यटकांसाठी सुविधा

ऑनलाईन लोकमतबल्लारपूर : बल्लारपूर या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या वर्धा नदी काठावरील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. किल्ल्याच्या आतील भागाचे सौंदर्यीकरण आणि पर्यटकांना सोयी सुविधा निर्माण करण्याची कामे बल्लारपूर नगर परिषद करणार आहे.विकासात्मक कामे करण्याची पुरातत्व विभागाकडे नगर परिषदेने तयारी दर्शविली होती. पुरातत्व विभागाने त्याला हिरवी झेंडी दिली आहे. येथील ऐतिहासिक स्थळ गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. या किल्ल्याची वयोमानाप्रमाणे काही ठिकाणी पडझड झाली असली तरी यातील बराचसा भाग आणि नदीकाठा नजीकच्या भिंती सुस्थितीत आहेत. काही भागाची दुरुस्ती पुरातत्व विभागाने नुकतीच केली आहे. परंतु, आतील स्वच्छतेबाबत बोंब होती.किल्ल्यात सर्वत्र उगवणारे गवत आणि इतर हिरव्या कचऱ्यांमुळे किल्ल्यातील बरेचशा वास्तू झाकोळल्या गेल्या होत्या. बल्लारपूर नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन, पुरातत्व विभागाकडून परवानगी घेतली. त्यानंतर किल्ल्याचा आतील भाग स्वच्छ करण्याची मेहिम लोकसहभागातून हाती घेतली. जवळपास अडीच महिने सतत स्वच्छता मोहिम राबवून किल्ला पूर्णत: कचरामुक्त करण्यात आला.या दरम्यान पुरातत्व विभागाच्या चंद्रपूर तथा नागपूर येथील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व या मोहिमेतून किल्ल्याचा झालेला कायापालट बघून ते प्रभावीत झालेत. या कचरामुक्ती अभियानाच्या समारोपप्रसंगी नगर परिषद प्रशानाने किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी दर्शविली आणि पुरातत्व विभागाकडे नगर परिषदेने तसा प्रस्ताव पाठविला.या प्रस्तावाची दखल पुरातत्व विभागाने घेतली व त्या विभागाने नगर परिषदेच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची तयारी दर्शविली आहे. तसे पत्र नगर परिषदेला पुरातत्व विभागाकडून प्राप्त झाले आहे. किल्ल्याच्या सौंदर्यीकरणात बाग, बसण्याकरिता बेंचेस, सौर ऊर्जेतून प्रकाश व्यवस्था, पेयजल व्यवस्था, आवश्यक त्या ठिकाणी लोखंडी द्वार अशी व्यवस्था नगर परिषदेकडून केली जाणार आहे. शहरातील या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे, शहरातील व बाहेरील लोकांना येथे रमता यावे, किल्ल्यामागचा इतिहास लोकांना कळावा या उद्देशाने नगर परिषदेने या कामाकरिता पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांच्या प्रयत्नाने किल्ल्याच्या ढासळलेल्या भिंतीची दुरुस्ती पुरातत्व विभागाने केली.असा आहे बल्लारपूरच्या किल्ल्याचा इतिहासबल्लारपूर येथील किल्ला १३२० साली आदिया बल्लारशाह या राजाने बांधला. येथून सात राजांनी सत्ता गाजविली. बल्लारपूरचा शेवटचा राजा खांडक्या बल्लारशाहा याला चंद्रपूरला आजच्या अंचलेश्वर मंदिराच्या जागेवर साक्षात्कार घडला. त्याने प्रभावित होऊन तेथे किल्ला बांधून राजधानी तेथे करण्याचे ठरविले. खांडक्या बल्लारशहाने परकोटाची पायाभरणी केली. राजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्राने परकोट व किल्ला बांधून बल्लारपूरची राजधानी चंद्रपूरला हलविली. तेव्हापासून बल्लारपूरच्या या किल्ल्याचे महत्त्व काहीसे कमी झाले आणि हा किल्ला दुर्लक्षीत राहिला. मात्र, यावर्षी या किल्ल्याची पुरातत्व विभागाकडून चांगली निगा राखली जात आहे. त्यात नगर परिषदेचे सहकार्य मिळत असल्याने लवकरच किल्ल्याचे रूप पालटणार आहे.

टॅग्स :Fortगड