शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

सौंदर्यीकरणाचे काम संथगतीने

By admin | Updated: May 6, 2015 01:25 IST

येथील नगर परिषद क्षेत्रातील कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरु होऊन दोन महिने झाले लोटले आहे.

ब्रह्मपुरी : येथील नगर परिषद क्षेत्रातील कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरु होऊन दोन महिने झाले लोटले आहे. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम राज्य सरोवर संवर्धन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या विद्यमाने ४ कोटी ५० लाख रूपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. त्यातील अर्धाअधिक निधी एक वर्षापूर्वीच नगरपालिकेला प्राप्त झाला होता. त्याअंतर्गत एजन्सीची नेमणूकीला संथ गतीने प्रक्रिया राबवून आपल्या सोयीने कंत्राट एजन्सी नेमण्यात आली, यामध्ये मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर तलाव ८.१० हेक्टर आर आराजीचा असून अंदाजे दीड मीटर औरसचौरस खोलीकरण करणे अपेक्षित होते. मात्र कुठे कमी तर कुठे जास्त याच्या अंदाजाने खोलीकरण करण्यात आले आहे. सरासरी खोलीकरणाचे उतरते स्वरूप मिळते जुळते नाही, हे आताच्या कामावरुन दिसून येत आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी गाळ काढून मान्सूनपूर्वी काम होणे अत्यावश्यक होते. पावसाळ्या लागल्यानंतर गाळ काढण्यासाठी जेसीबी व टिप्पर जाणे अशक्य असल्याने नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन ताबडतोब कामाला गती वाढविण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास गाळ काढण्याच्या कामाचे एक कोटी रुपये वाया जातील व सर्वसामान्य जनतेचा पैसा कामात लागणार नाही. सध्या काढलेला गाळ कुठे टाकणार, याचेही नियोजन नगरपालिकेकडे सध्या नाही. त्यामुळे कंंत्राटदार नगरपालिकेला वारंवार विचारणा करीत आहे. काढाली रोडला लागून महसूल विभागाची जागा आहे. ही जागा खदान म्हणून ओळखल्या जाते. तिथे गाळ टाकल्यास खड्डे बुजल्या जातील व गाळ काढण्याचे काम सुलभ होईल व महसूल विभागाला ती जागा बांधकाम प्रयोजनासाठी वापरता येईल, अशा प्रकारची तोंडी सूचना नागरिकांकडून केल्या गेली आहे. या दृष्टीने उपविभागीय अधिकारी राजस्व यांनी त्वरित कार्यवाही करुन तलावाच्या सौंदर्यीकरण विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. या कामाची दखल घेऊन आमदार विजय वडेट्टीवार यांनी तलावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्याधिकारी व नगरपालिका अध्यक्ष ब्रह्मपुरी यांना उचित सूचना करुन गाळ काढण्याच्या संदर्भात त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले व विलंब होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यंत्रणेचे कामाचे स्वरूप थोडे वाढले आहे. नागरिकांनी कंत्राटदाराशी चर्चा केली असता, सदर गाळ सभोवताल रस्त्यासाठी उपयोगात आणायचा, असून ते काम अपेक्षित आहे. परंतु हा गाळ रस्त्यासाठी उपयोगात आल्यास त्या खराब गाळातून झिरपणारे पाणी परत तलावात जाऊन शुद्धीकरण होणारे तलाव परत प्रदूषित होईल व जैसे थे अवस्था प्राप्त होईल व शासनाचे पैसे पाण्यात जातील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण गाळ बाहेर टाकावा अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)