शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

सौंदर्यीकरणाचे काम संथगतीने

By admin | Updated: May 6, 2015 01:25 IST

येथील नगर परिषद क्षेत्रातील कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरु होऊन दोन महिने झाले लोटले आहे.

ब्रह्मपुरी : येथील नगर परिषद क्षेत्रातील कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरु होऊन दोन महिने झाले लोटले आहे. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम राज्य सरोवर संवर्धन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या विद्यमाने ४ कोटी ५० लाख रूपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. त्यातील अर्धाअधिक निधी एक वर्षापूर्वीच नगरपालिकेला प्राप्त झाला होता. त्याअंतर्गत एजन्सीची नेमणूकीला संथ गतीने प्रक्रिया राबवून आपल्या सोयीने कंत्राट एजन्सी नेमण्यात आली, यामध्ये मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर तलाव ८.१० हेक्टर आर आराजीचा असून अंदाजे दीड मीटर औरसचौरस खोलीकरण करणे अपेक्षित होते. मात्र कुठे कमी तर कुठे जास्त याच्या अंदाजाने खोलीकरण करण्यात आले आहे. सरासरी खोलीकरणाचे उतरते स्वरूप मिळते जुळते नाही, हे आताच्या कामावरुन दिसून येत आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी गाळ काढून मान्सूनपूर्वी काम होणे अत्यावश्यक होते. पावसाळ्या लागल्यानंतर गाळ काढण्यासाठी जेसीबी व टिप्पर जाणे अशक्य असल्याने नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन ताबडतोब कामाला गती वाढविण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास गाळ काढण्याच्या कामाचे एक कोटी रुपये वाया जातील व सर्वसामान्य जनतेचा पैसा कामात लागणार नाही. सध्या काढलेला गाळ कुठे टाकणार, याचेही नियोजन नगरपालिकेकडे सध्या नाही. त्यामुळे कंंत्राटदार नगरपालिकेला वारंवार विचारणा करीत आहे. काढाली रोडला लागून महसूल विभागाची जागा आहे. ही जागा खदान म्हणून ओळखल्या जाते. तिथे गाळ टाकल्यास खड्डे बुजल्या जातील व गाळ काढण्याचे काम सुलभ होईल व महसूल विभागाला ती जागा बांधकाम प्रयोजनासाठी वापरता येईल, अशा प्रकारची तोंडी सूचना नागरिकांकडून केल्या गेली आहे. या दृष्टीने उपविभागीय अधिकारी राजस्व यांनी त्वरित कार्यवाही करुन तलावाच्या सौंदर्यीकरण विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. या कामाची दखल घेऊन आमदार विजय वडेट्टीवार यांनी तलावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्याधिकारी व नगरपालिका अध्यक्ष ब्रह्मपुरी यांना उचित सूचना करुन गाळ काढण्याच्या संदर्भात त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले व विलंब होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यंत्रणेचे कामाचे स्वरूप थोडे वाढले आहे. नागरिकांनी कंत्राटदाराशी चर्चा केली असता, सदर गाळ सभोवताल रस्त्यासाठी उपयोगात आणायचा, असून ते काम अपेक्षित आहे. परंतु हा गाळ रस्त्यासाठी उपयोगात आल्यास त्या खराब गाळातून झिरपणारे पाणी परत तलावात जाऊन शुद्धीकरण होणारे तलाव परत प्रदूषित होईल व जैसे थे अवस्था प्राप्त होईल व शासनाचे पैसे पाण्यात जातील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण गाळ बाहेर टाकावा अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)