शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

सौंदर्यीकरणाचे काम संथगतीने

By admin | Updated: May 6, 2015 01:25 IST

येथील नगर परिषद क्षेत्रातील कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरु होऊन दोन महिने झाले लोटले आहे.

ब्रह्मपुरी : येथील नगर परिषद क्षेत्रातील कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरु होऊन दोन महिने झाले लोटले आहे. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम राज्य सरोवर संवर्धन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या विद्यमाने ४ कोटी ५० लाख रूपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. त्यातील अर्धाअधिक निधी एक वर्षापूर्वीच नगरपालिकेला प्राप्त झाला होता. त्याअंतर्गत एजन्सीची नेमणूकीला संथ गतीने प्रक्रिया राबवून आपल्या सोयीने कंत्राट एजन्सी नेमण्यात आली, यामध्ये मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर तलाव ८.१० हेक्टर आर आराजीचा असून अंदाजे दीड मीटर औरसचौरस खोलीकरण करणे अपेक्षित होते. मात्र कुठे कमी तर कुठे जास्त याच्या अंदाजाने खोलीकरण करण्यात आले आहे. सरासरी खोलीकरणाचे उतरते स्वरूप मिळते जुळते नाही, हे आताच्या कामावरुन दिसून येत आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी गाळ काढून मान्सूनपूर्वी काम होणे अत्यावश्यक होते. पावसाळ्या लागल्यानंतर गाळ काढण्यासाठी जेसीबी व टिप्पर जाणे अशक्य असल्याने नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन ताबडतोब कामाला गती वाढविण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास गाळ काढण्याच्या कामाचे एक कोटी रुपये वाया जातील व सर्वसामान्य जनतेचा पैसा कामात लागणार नाही. सध्या काढलेला गाळ कुठे टाकणार, याचेही नियोजन नगरपालिकेकडे सध्या नाही. त्यामुळे कंंत्राटदार नगरपालिकेला वारंवार विचारणा करीत आहे. काढाली रोडला लागून महसूल विभागाची जागा आहे. ही जागा खदान म्हणून ओळखल्या जाते. तिथे गाळ टाकल्यास खड्डे बुजल्या जातील व गाळ काढण्याचे काम सुलभ होईल व महसूल विभागाला ती जागा बांधकाम प्रयोजनासाठी वापरता येईल, अशा प्रकारची तोंडी सूचना नागरिकांकडून केल्या गेली आहे. या दृष्टीने उपविभागीय अधिकारी राजस्व यांनी त्वरित कार्यवाही करुन तलावाच्या सौंदर्यीकरण विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. या कामाची दखल घेऊन आमदार विजय वडेट्टीवार यांनी तलावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्याधिकारी व नगरपालिका अध्यक्ष ब्रह्मपुरी यांना उचित सूचना करुन गाळ काढण्याच्या संदर्भात त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले व विलंब होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यंत्रणेचे कामाचे स्वरूप थोडे वाढले आहे. नागरिकांनी कंत्राटदाराशी चर्चा केली असता, सदर गाळ सभोवताल रस्त्यासाठी उपयोगात आणायचा, असून ते काम अपेक्षित आहे. परंतु हा गाळ रस्त्यासाठी उपयोगात आल्यास त्या खराब गाळातून झिरपणारे पाणी परत तलावात जाऊन शुद्धीकरण होणारे तलाव परत प्रदूषित होईल व जैसे थे अवस्था प्राप्त होईल व शासनाचे पैसे पाण्यात जातील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण गाळ बाहेर टाकावा अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)