शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

एसडीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे समाधान व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:52 IST

येथील उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन आलेला प्रत्येक नागरिक आनंदी होवून गेला पाहिजे, अशा प्रकारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रविवारी बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन आलेला प्रत्येक नागरिक आनंदी होवून गेला पाहिजे, अशा प्रकारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रविवारी बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, नगराध्यक्ष हरीष शर्मा, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पंचायत समिती सभापती गोंविदा पोडे, न. प. उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नगर परिषदेच्या २६ सेवानिवृत्त कर्मचाºयांना त्यांच्या थकीत असलेल्या रकमेचे धनादेश, विधवा, परित्यक्ता महिला व पुरुषांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या वतीने डस्टबीन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसडीओ क्रांती डोंबे यांनी केले. संचालन जांभुळकर यांनी तर आभार अहीर यांनी मानले.पालकमंत्र्यांमुळे विकास कामे मार्गी : ना. अहीरदेशात व राज्यात भाजप सरकार आले तेव्हापासून सिंचन, शेती, कौशल्य विकास, पर्यटन, रोजगार निर्माण करण्याचे कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र असे विविध विकास प्रकल्प त्यांच्या पुढाकाराने कार्यान्वित होत आहेत. याचा आपल्याला या क्षेत्राचा खासदार म्हणून अभिमान असल्याचे ना. हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले.