शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

जनतेच्या सुख-दु:खात समरस व्हा- पटेल

By admin | Updated: June 20, 2016 00:37 IST

केंद्रातील व राज्यातील सरकार देशातील व राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला अपयशी ठरले.

भद्रावती : केंद्रातील व राज्यातील सरकार देशातील व राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला अपयशी ठरले. हे आता सामान्य जनतेला कळून चुकले आहे. शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब नागरिकांना दिलेले अच्छे दिनाचे आश्वासन फोल ठरले असून देशातील नागरिक विविध समस्यांना तोंड देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या सुख दु:खात सहभागी होवून त्यांच्या दारापर्यंत पोहचण्याची नितांत गरज आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करूनच पक्ष बांधणीच्या कार्याला सुरुवात करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.स्थानिक विश्रामगृहात गुरुवारी कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाने जनतेचा विश्वासघात केला. सर्वसाधारण व गोरगरीब जनतेला केरोसीन मिळत नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खंबीर नेतृत्त्वाची देशाला गरज असल्याचेही यावेळी पटेल म्हणाले. याप्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा युवा नेते मुनाज शेख, वरोरा येथील नगराध्यक्ष जनाबाई पिंपळकर, अ‍ॅड. प्रदीप बुराण, बंडू भोंगगाडे, नगरसेवक लता हिवरकर, शांताराम नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद जीवतोडे, वरोरा तालुका अध्यक्ष बंडू साखरकर, विलास नेरकर, शहर अध्यक्ष सुनील महाले, सुधाकर रोहणकर, नामदेव मत्ते, सुनील तेलंग, विठ्ठल हनवते, राजेश मत्ते, रोहण कुटेमाटे, आशिष कार्लेकर आदी उपस्थित होते. माजी मंत्री अनिल देशमुख बोलताना म्हणाले, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची आणि मोठे करण्याची भूमिका केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली आहे. संचालन प्रशांत काळे यांनी केले तर आभार सुनील महाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)