शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या सुख-दु:खात समरस व्हा- पटेल

By admin | Updated: June 20, 2016 00:37 IST

केंद्रातील व राज्यातील सरकार देशातील व राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला अपयशी ठरले.

भद्रावती : केंद्रातील व राज्यातील सरकार देशातील व राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला अपयशी ठरले. हे आता सामान्य जनतेला कळून चुकले आहे. शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब नागरिकांना दिलेले अच्छे दिनाचे आश्वासन फोल ठरले असून देशातील नागरिक विविध समस्यांना तोंड देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या सुख दु:खात सहभागी होवून त्यांच्या दारापर्यंत पोहचण्याची नितांत गरज आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करूनच पक्ष बांधणीच्या कार्याला सुरुवात करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.स्थानिक विश्रामगृहात गुरुवारी कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाने जनतेचा विश्वासघात केला. सर्वसाधारण व गोरगरीब जनतेला केरोसीन मिळत नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खंबीर नेतृत्त्वाची देशाला गरज असल्याचेही यावेळी पटेल म्हणाले. याप्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा युवा नेते मुनाज शेख, वरोरा येथील नगराध्यक्ष जनाबाई पिंपळकर, अ‍ॅड. प्रदीप बुराण, बंडू भोंगगाडे, नगरसेवक लता हिवरकर, शांताराम नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद जीवतोडे, वरोरा तालुका अध्यक्ष बंडू साखरकर, विलास नेरकर, शहर अध्यक्ष सुनील महाले, सुधाकर रोहणकर, नामदेव मत्ते, सुनील तेलंग, विठ्ठल हनवते, राजेश मत्ते, रोहण कुटेमाटे, आशिष कार्लेकर आदी उपस्थित होते. माजी मंत्री अनिल देशमुख बोलताना म्हणाले, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची आणि मोठे करण्याची भूमिका केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली आहे. संचालन प्रशांत काळे यांनी केले तर आभार सुनील महाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)