शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

जनतेच्या सुख-दु:खात समरस व्हा- पटेल

By admin | Updated: June 20, 2016 00:37 IST

केंद्रातील व राज्यातील सरकार देशातील व राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला अपयशी ठरले.

भद्रावती : केंद्रातील व राज्यातील सरकार देशातील व राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला अपयशी ठरले. हे आता सामान्य जनतेला कळून चुकले आहे. शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब नागरिकांना दिलेले अच्छे दिनाचे आश्वासन फोल ठरले असून देशातील नागरिक विविध समस्यांना तोंड देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या सुख दु:खात सहभागी होवून त्यांच्या दारापर्यंत पोहचण्याची नितांत गरज आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करूनच पक्ष बांधणीच्या कार्याला सुरुवात करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.स्थानिक विश्रामगृहात गुरुवारी कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाने जनतेचा विश्वासघात केला. सर्वसाधारण व गोरगरीब जनतेला केरोसीन मिळत नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खंबीर नेतृत्त्वाची देशाला गरज असल्याचेही यावेळी पटेल म्हणाले. याप्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा युवा नेते मुनाज शेख, वरोरा येथील नगराध्यक्ष जनाबाई पिंपळकर, अ‍ॅड. प्रदीप बुराण, बंडू भोंगगाडे, नगरसेवक लता हिवरकर, शांताराम नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद जीवतोडे, वरोरा तालुका अध्यक्ष बंडू साखरकर, विलास नेरकर, शहर अध्यक्ष सुनील महाले, सुधाकर रोहणकर, नामदेव मत्ते, सुनील तेलंग, विठ्ठल हनवते, राजेश मत्ते, रोहण कुटेमाटे, आशिष कार्लेकर आदी उपस्थित होते. माजी मंत्री अनिल देशमुख बोलताना म्हणाले, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची आणि मोठे करण्याची भूमिका केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली आहे. संचालन प्रशांत काळे यांनी केले तर आभार सुनील महाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)