शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या सुख-दु:खात समरस व्हा- पटेल

By admin | Updated: June 20, 2016 00:37 IST

केंद्रातील व राज्यातील सरकार देशातील व राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला अपयशी ठरले.

भद्रावती : केंद्रातील व राज्यातील सरकार देशातील व राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला अपयशी ठरले. हे आता सामान्य जनतेला कळून चुकले आहे. शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब नागरिकांना दिलेले अच्छे दिनाचे आश्वासन फोल ठरले असून देशातील नागरिक विविध समस्यांना तोंड देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या सुख दु:खात सहभागी होवून त्यांच्या दारापर्यंत पोहचण्याची नितांत गरज आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करूनच पक्ष बांधणीच्या कार्याला सुरुवात करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.स्थानिक विश्रामगृहात गुरुवारी कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाने जनतेचा विश्वासघात केला. सर्वसाधारण व गोरगरीब जनतेला केरोसीन मिळत नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खंबीर नेतृत्त्वाची देशाला गरज असल्याचेही यावेळी पटेल म्हणाले. याप्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा युवा नेते मुनाज शेख, वरोरा येथील नगराध्यक्ष जनाबाई पिंपळकर, अ‍ॅड. प्रदीप बुराण, बंडू भोंगगाडे, नगरसेवक लता हिवरकर, शांताराम नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद जीवतोडे, वरोरा तालुका अध्यक्ष बंडू साखरकर, विलास नेरकर, शहर अध्यक्ष सुनील महाले, सुधाकर रोहणकर, नामदेव मत्ते, सुनील तेलंग, विठ्ठल हनवते, राजेश मत्ते, रोहण कुटेमाटे, आशिष कार्लेकर आदी उपस्थित होते. माजी मंत्री अनिल देशमुख बोलताना म्हणाले, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची आणि मोठे करण्याची भूमिका केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली आहे. संचालन प्रशांत काळे यांनी केले तर आभार सुनील महाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)