शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
5
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
6
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
7
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
8
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
9
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
10
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
11
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
12
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
13
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
14
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
15
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
16
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
17
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
18
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
19
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
20
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश

डिजिटल व्हा, पण गं्रथांशी मैत्री मोलाची

By admin | Updated: February 14, 2017 00:36 IST

सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही.

श्याम माधव धोंड : जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटनचंद्रपूर : सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही. इ-बुक वाचा. शिक्षक, विद्यार्थ्यांसह सर्वांनी डिजिटल व्हावे. पण तंत्रज्ञान ग्रंथांना मागे टाकू शकत नाही. ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक श्याम माधव धोंड यांनी केले.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत ज्युबिली हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन धोंड यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह होते. मंचावर गोंडवाना साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्र सालफळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राम गारकर, निरंतर शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, डाएटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील आदी उपस्थित होते.धोंडे म्हणाले की, ग्रंथ सर्वांचे गुरू आहेत. ग्रंथ सखा आहे. माणसांची श्रीमंती त्याच्याकडे असलेल्या ग्रंथांच्या संख्येवरून मोजली जाते. त्यामुळे डिजिटलायझेशनचे युग आले तरी ग्रंथ आपले महत्त्व टिकवून आहेत. गोंडवाना परिसरात आदिवासी वेगळी भाषा बोलतात. ती बोली स्वरूपात आहे. मुकूंद गोखले यांनी आदिवासी बोलीचा संगणकावर फॉन्ट तयार केला आहे. त्यातून संगणकावर बोलीला भाषेचे स्वरूप आणले आहे. या बोलीला जुन्या काळात चंद्रपूर परिसरात लिपी होती. परंतु काळाच्या ओघात ती नष्ट झाली. बोली भाषेला समृद्ध करीत असते. मी एक १२०० पानांचा ग्रंथ सोबत आणला आहे. हा ग्रंथ प्राकृत भाषेत आहे. ती मराठीपूर्वीची भाषा आहे. त्यामुळे या ग्रंथाचे मोल आजही अधिक आहे, असेही स्पष्ट केले. उद्घाटन सत्रात माध्यमिक शिक्षणाधिकारी डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी गारकर, डाएटचे प्राचार्य पाटील यांचे मार्गदर्शन झाले. संचालन बारसागडे यांनी केले. आभार पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची आकर्षक दिंडीउद्घाटन सत्रापूर्वी मौलाना अबुल कलाम आझाद बाग येथून सकाळी ८.३० वाजता विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भगवे फेटे परिधान करून अनेकांचे लक्ष्य वेधून घेतले. दिंडीमध्ये लेझिम पथकही सहभागी झाले होते. तर सन्मित्र सैनिक शाळेच्या बँड पथकाच्या तालावर दिंडीने आझाद बगिचा, जटपुरा गेटमार्गाने मार्गक्रमण केले. दिंडीचा समारोप ज्युबिली हायस्कूल येथे करण्यात आला. दिंडीमध्ये ज्युबिली हायस्कूल, सिटी कन्या शाळा, हिंदी सिटी हायस्कूल, छोटुभाई पटेल हायस्कूल, एफईएस गर्ल्स हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.