शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

डिजिटल व्हा, पण गं्रथांशी मैत्री मोलाची

By admin | Updated: February 14, 2017 00:36 IST

सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही.

श्याम माधव धोंड : जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटनचंद्रपूर : सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही. इ-बुक वाचा. शिक्षक, विद्यार्थ्यांसह सर्वांनी डिजिटल व्हावे. पण तंत्रज्ञान ग्रंथांना मागे टाकू शकत नाही. ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक श्याम माधव धोंड यांनी केले.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत ज्युबिली हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन धोंड यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह होते. मंचावर गोंडवाना साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्र सालफळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राम गारकर, निरंतर शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, डाएटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील आदी उपस्थित होते.धोंडे म्हणाले की, ग्रंथ सर्वांचे गुरू आहेत. ग्रंथ सखा आहे. माणसांची श्रीमंती त्याच्याकडे असलेल्या ग्रंथांच्या संख्येवरून मोजली जाते. त्यामुळे डिजिटलायझेशनचे युग आले तरी ग्रंथ आपले महत्त्व टिकवून आहेत. गोंडवाना परिसरात आदिवासी वेगळी भाषा बोलतात. ती बोली स्वरूपात आहे. मुकूंद गोखले यांनी आदिवासी बोलीचा संगणकावर फॉन्ट तयार केला आहे. त्यातून संगणकावर बोलीला भाषेचे स्वरूप आणले आहे. या बोलीला जुन्या काळात चंद्रपूर परिसरात लिपी होती. परंतु काळाच्या ओघात ती नष्ट झाली. बोली भाषेला समृद्ध करीत असते. मी एक १२०० पानांचा ग्रंथ सोबत आणला आहे. हा ग्रंथ प्राकृत भाषेत आहे. ती मराठीपूर्वीची भाषा आहे. त्यामुळे या ग्रंथाचे मोल आजही अधिक आहे, असेही स्पष्ट केले. उद्घाटन सत्रात माध्यमिक शिक्षणाधिकारी डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी गारकर, डाएटचे प्राचार्य पाटील यांचे मार्गदर्शन झाले. संचालन बारसागडे यांनी केले. आभार पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची आकर्षक दिंडीउद्घाटन सत्रापूर्वी मौलाना अबुल कलाम आझाद बाग येथून सकाळी ८.३० वाजता विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भगवे फेटे परिधान करून अनेकांचे लक्ष्य वेधून घेतले. दिंडीमध्ये लेझिम पथकही सहभागी झाले होते. तर सन्मित्र सैनिक शाळेच्या बँड पथकाच्या तालावर दिंडीने आझाद बगिचा, जटपुरा गेटमार्गाने मार्गक्रमण केले. दिंडीचा समारोप ज्युबिली हायस्कूल येथे करण्यात आला. दिंडीमध्ये ज्युबिली हायस्कूल, सिटी कन्या शाळा, हिंदी सिटी हायस्कूल, छोटुभाई पटेल हायस्कूल, एफईएस गर्ल्स हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.