शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

डिजिटल व्हा, पण गं्रथांशी मैत्री मोलाची

By admin | Updated: February 14, 2017 00:36 IST

सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही.

श्याम माधव धोंड : जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटनचंद्रपूर : सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही. इ-बुक वाचा. शिक्षक, विद्यार्थ्यांसह सर्वांनी डिजिटल व्हावे. पण तंत्रज्ञान ग्रंथांना मागे टाकू शकत नाही. ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक श्याम माधव धोंड यांनी केले.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत ज्युबिली हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन धोंड यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह होते. मंचावर गोंडवाना साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्र सालफळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राम गारकर, निरंतर शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, डाएटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील आदी उपस्थित होते.धोंडे म्हणाले की, ग्रंथ सर्वांचे गुरू आहेत. ग्रंथ सखा आहे. माणसांची श्रीमंती त्याच्याकडे असलेल्या ग्रंथांच्या संख्येवरून मोजली जाते. त्यामुळे डिजिटलायझेशनचे युग आले तरी ग्रंथ आपले महत्त्व टिकवून आहेत. गोंडवाना परिसरात आदिवासी वेगळी भाषा बोलतात. ती बोली स्वरूपात आहे. मुकूंद गोखले यांनी आदिवासी बोलीचा संगणकावर फॉन्ट तयार केला आहे. त्यातून संगणकावर बोलीला भाषेचे स्वरूप आणले आहे. या बोलीला जुन्या काळात चंद्रपूर परिसरात लिपी होती. परंतु काळाच्या ओघात ती नष्ट झाली. बोली भाषेला समृद्ध करीत असते. मी एक १२०० पानांचा ग्रंथ सोबत आणला आहे. हा ग्रंथ प्राकृत भाषेत आहे. ती मराठीपूर्वीची भाषा आहे. त्यामुळे या ग्रंथाचे मोल आजही अधिक आहे, असेही स्पष्ट केले. उद्घाटन सत्रात माध्यमिक शिक्षणाधिकारी डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी गारकर, डाएटचे प्राचार्य पाटील यांचे मार्गदर्शन झाले. संचालन बारसागडे यांनी केले. आभार पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची आकर्षक दिंडीउद्घाटन सत्रापूर्वी मौलाना अबुल कलाम आझाद बाग येथून सकाळी ८.३० वाजता विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भगवे फेटे परिधान करून अनेकांचे लक्ष्य वेधून घेतले. दिंडीमध्ये लेझिम पथकही सहभागी झाले होते. तर सन्मित्र सैनिक शाळेच्या बँड पथकाच्या तालावर दिंडीने आझाद बगिचा, जटपुरा गेटमार्गाने मार्गक्रमण केले. दिंडीचा समारोप ज्युबिली हायस्कूल येथे करण्यात आला. दिंडीमध्ये ज्युबिली हायस्कूल, सिटी कन्या शाळा, हिंदी सिटी हायस्कूल, छोटुभाई पटेल हायस्कूल, एफईएस गर्ल्स हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.