शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या, डेंग्यू ताप टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

एडीस डास पाच ते सहा मि.मी. लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे याला टायगर मॉस्किटोही म्हणतात. तो दिवसा चावते, वारंवार चावा घेतात. त्यामुळे आजाराची शक्यता वाढते. ४०० मीटरपर्यंत उडू शकते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू जसे दोरी लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदी ठिकाणी विश्रांती घेतो.

ठळक मुद्देस्वच्छता पाळा : पावसाळ्यात बळावतो धोका, सतर्क राहण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळा सुरू झाला की, विविध आजार डोकेवर काढतात. या दिवसात डेंग्यू, मलेरिया आदी आजारांच्या रूग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होते. हा आजार पावसाळा संपत असताना आणखी बळावतो. डेंग्यूची लागण झाली की, मृत्यू ओढवतो, अशी भीती अनेकांना वाटते. मात्र, योग्य काळजी घेतल्यास डेंग्युलाही पळविता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वत: काळजी घ्यावी, तसेच सतर्क रहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू एडीस डासाच्या मादीमुळे पसरतो. डेंग्यूचा ताप महाभयानक असतो. उपचाराअभावी रूग्ण दगावतातही. त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. डेंग्यूमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तीव्र ताप, डोकेदुखी, दलटी, अंगदूखी, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणे, सुस्त व बेशुध्द होणे तर गंभीर डेंग्यू रूग्णांचा रक्तपेशी कमी झाल्याने होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे मृत्यूदेखील होतो. पावसाळ्याच्या अखेरीस डेंग्यूचा धोका अधिक बळावत असून नागरिकांनी परिसराच्या स्वच्छतेसोबत घरामध्येही स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.एडीस डासाची वैशिष्ट्येएडीस डास पाच ते सहा मि.मी. लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे याला टायगर मॉस्किटोही म्हणतात. तो दिवसा चावते, वारंवार चावा घेतात. त्यामुळे आजाराची शक्यता वाढते. ४०० मीटरपर्यंत उडू शकते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू जसे दोरी लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदी ठिकाणी विश्रांती घेतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यापासून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास असलेली भांडी धुवून, पुसून स्वच्छ ठेवावी, जेणेकरून त्यांची पृष्ठभागाला चिकटलली अंडी नष्ट होतील.भरपूर पाणी प्यावे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावाआजाराची लागण झालेल्या रूग्णांनी भरपूर पाणी प्यावे, पुरेशी विश्रांती घ्यावी, लक्षणानुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात डेंग्यूचा अधिक प्रसार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पाणी साचणाºया परिसरात नियमित स्वच्छता करावी. घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी कोरडी करून पाणी भरावे. घराशेजारी सांडपाणी साचू न देता ते वाहते करावे यामुळे डेग्यू आजार होण्यापासून टाळता येईल.आजार टाळण्यासाठी प्रथम स्वच्छता महत्त्वाची आहे. घराभोवती, इमारतीच्या गच्चीवर पाणी साचू देवू नये, घरातील पाणी साठवणीची भांडी आठवड्यातून किमान एकदा कोरडी करावी. पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. तपासणीसाठी घरी येणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.- डॉ. ए. एन. कुकडपवार, जिल्हा हिवताप अधिकारी, चंद्रपूरअशी रोखाडासांची उत्पत्तीघराभोवती, परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरूपयोगी वस्तू साठवू नये. खराब टायर्स नष्ट करावेत, पाण्याची भांडी, ड्रम, रांजन व्यवस्थित झाकून ठेवावे, घरातील टाक्यांना झाकणे बसवावी, शौचालयाच्या व्हेंटपाईपला जाळी बसवाव, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसरातील डबकी वाहती करावी, मोठ्या उबक्यात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावे, साचलेल्या पाण्यात कू्रड आईल किंवा रॉकेल टाळावे, शेणखताचे ढिगारे गावापासून दुर अंतरावर न्यावे यामुळे आजार टाळता येईल.

टॅग्स :dengueडेंग्यू