शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सावधान ! बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

मूल तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र ४६३९४.९८ हेक्टर असून, लागवडीचे क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर आहे. तालुक्यात धानाची लागवड २२,७८८.०० हेक्टरमध्ये केली जात असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांची बी - बियाणे कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागतात. हेच हेरुन विविध कंपन्या नकली बी - बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.

राजू गेडामलोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेतीचा हंगाम सुरू झाला की, बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या सक्रिय होतात. शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, या हंगामात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाऊ नये म्हणून प्रशासनाने अशा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे.मूल तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र ४६३९४.९८ हेक्टर असून, लागवडीचे क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर आहे. तालुक्यात धानाची लागवड २२,७८८.०० हेक्टरमध्ये केली जात असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांची बी - बियाणे कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागतात. हेच हेरुन विविध कंपन्या नकली बी - बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. हे बघता शेतकऱ्याच्या हितासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना कारवाईचे संकेत दिल्याने बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम काही दिवसात सुरू होणार आहे. पहिल्या पावसात धानाची पेरणी करण्यासाठी अनेकांची धावपळ होताना दिसणार आहे. मूल तालुक्यात धान लागवडीचे क्षेत्र २२,७८८ हेक्टर असल्याने लाखो रुपयांचे बी - बियाणे विकत घ्यावे लागणार आहे. यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते.  हीच संधी साधत मूल तालुक्यात अनेकांनी कृषी केंद्राचा परवाना काढल्याचे दिसून येते. मूल तालुक्यात एकूण ४५ कृषी केंद्र असून लाखो रुपयांचे बी - बियाणे विक्री केले जातात. हीच संधी साधून अनेक कंपन्या आडमार्गाने बोगस बी - बियाणे विकत असल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत.  

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानबियाणे बोगस निघाले की, शेतकऱ्याची हंगामात धावपळ सुरू होते. बियाणाची उगवण क्षमता नसल्याने त्याची तक्रार करण्यास वेळ लागतो. त्यामुळे ना कंपनीकडून भरपाई मिळते, ना शेतात पीक उगवते. असे विदारक चित्र निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.  ही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने कृषी अधिकारी कार्यालयाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गावातील खबऱ्याच्या रुपाने मूल शहरासह तालुक्यातील १११ गावात पाळत ठेवली जात आहे. त्यामुळे बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मूल शहरासह तालुक्यात एकूण ४५ कृषी केंद्र आहेत. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या व चोर मार्गाने विक्री करणारे कृषी केंद्र याकडे कृषी विभागाचे विशेष लक्ष आहे. मूल तालुक्यातील गावागावात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी खबरे ठेवण्यात आले आहेत. यानंतरही बोगस व आडमार्गाने बियाणे विक्री करण्याची माहिती मिळाली तर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.- भास्कर गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, मूल.

 

टॅग्स :agricultureशेती