शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

देशाच्या शैक्षणिक धोरणांबाबत सजग राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

नवीन शैक्षणिक धोरणात उपेक्षिति वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे धोरण जैसेथे लागू झाल्यास देशात मोठी विषमता निर्माण होऊ शकतो. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या समाजाला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी यामध्ये परिणामकारक तरतुदी नाहीत.

ठळक मुद्देबी. जी. कोळसे पाटील : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : व्यवस्थेविरूद्ध लढणाऱ्यांमध्ये आंबेडकरवाद्यांशिवाय अन्य चळवळ दिसत नाही. फुले-आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचायला पाहिजे. कारण, वर्तमान शैक्षणिक नीती अत्यंत भयावह आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणाविषयी सजग असले पाहिजे, अस प्रतिपादन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना टिचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित 'नवीन राष्ट्रीय शिक्षा नीती २०१९' या विषयावर रविवारी प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.यावेळी राज्याचे निवृत्त प्रधान सचिव किशोर गजभिये, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, सामाजिक कार्यकर्ते एल.के. मडावी, रोहिदास राऊत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. कपील भगत, बानाईचे अध्यक्ष राजेश सोनवणे, कॉन्स्टिट्युशनल पॉलिसीच्या समन्वयक डॉ. नम्रता बेंदले, बळीराज धोटे, प्रा. सुधाकर पेटकर, प्रा. डॉ. इसादास भडके, प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर, मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. संदेश वाघ उपस्थित होते. किशोर गजभिये म्हणाले, हिंदू राष्ट्राच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे. यापासून सावध राहून प्रबोधनासाठी पुढे आले पाहिजे. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. वाघ तर मंचावर डॉ. संतोष सुरडकर, प्रा. रमेश बिजेकर उपस्थित होते. या सत्रात संशोधनात्मक अभ्यासपूर्ण विचार मांडल्या गेले. संचालन प्रा. डॉ. इसादास भडके व प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक संघटनेचे सचिव प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर यांनी केले. प्रा. सुधाकर पेटकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. डॉ. विलास पेटकर यांनी मानले. बिरसा क्रांती दल, डॉ. आंबेडकर लॉयर असोसिएशन बानाई चंद्रपूर, कॉन्स्टिट्युशन पॉलिसी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट व आंबेडकरी साहित्य प्रबोधिनीने कार्यक्रमाला सहकार्य केले.वंचितांच्या शैक्षणिक समस्या वाढणारनवीन शैक्षणिक धोरणात उपेक्षिति वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे धोरण जैसेथे लागू झाल्यास देशात मोठी विषमता निर्माण होऊ शकतो. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या समाजाला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी यामध्ये परिणामकारक तरतुदी नाहीत. याचा अनिष्ट परिणाम एकूनच बहुजन समाजावर होण्याचा धोका उपस्थित अभ्यासकांनी वर्तविला. प्राथमिक ते उच्च शिक्षणाच्या धोरणांची यावेळी चिकित्सा झाली.

टॅग्स :Educationशिक्षण