शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्यावर भर देणार- बावनकुळे

By admin | Updated: October 14, 2015 01:18 IST

ग्राहक हाच आपला केंद्रबिंदू असून ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्याचे कार्य महावितरण कंपनीचे आहे.

चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाचे उद्घाटन : एलईडी बल्ब लावण्याचे आवाहनचंद्रपूर : ग्राहक हाच आपला केंद्रबिंदू असून ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्याचे कार्य महावितरण कंपनीचे आहे. ग्राहकांना सेवा देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचा-यांची असून ती सेवा वेळेत देण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने व गांभीर्याने आपली सेवा बजावावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सोमवारी केले.चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचलार्वार, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार नानाभाऊ श्यामकुळे, आमदार डॉ. देवराव होळी, उपमहापौर वसंत देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, महावितरणचे कार्यकारी संचालक संजय ताकसांडे, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे , पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे आदी मंचावर उपस्थित होते.ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भ- मराठवाड्यावर यापूर्वी कायम अन्याय झाला असून याठिकाणी प्राधान्याने ग्राहकांना, शेतकऱ्यांना मुबलक वीज, विजेच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे वीज आहे त्यांनी शासनाने सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेली एलइडी बल्ब वापरून वीज बचतीसाठीही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, परिमंडळाच्या कार्यालयाचा प्रस्ताव दिल्यानंतर केवळ १५ दिवसांमध्ये परिमंडळ कार्यालयाची मान्यता ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच या परिमंडळाच्या माध्यमातून १९८१ पासून विभक्त झालेल्या गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडण्याचे कामही त्यांनी केले, याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक केले. (प्रतिनिधी)