शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

बल्लारपूर नगराध्यक्ष पदासाठी हालचालीला वेग

By admin | Updated: May 15, 2014 23:26 IST

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून बल्लारपूरची ओळख आहे. विद्यमान नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ जून महिन्यात संपणार आहे.

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून बल्लारपूरची ओळख आहे. विद्यमान नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ जून महिन्यात संपणार आहे. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी येथील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण असल्याने माजी खासदार नरेश पुगलिया गटाच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी पालकमंत्री संजय देवतळे गटांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आपल्याच गटाचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी राजकीय हालचालीने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांचा प्रचार न केल्याच्या कारणावरुन विद्यमान नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी व त्यांचे पती तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. अशातच एम.बाल. बैरय्या शहर काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या जागी अब्दुल करीम यांना नेमण्यात आल्याने नरेश पुगलिया गटाला मोठा हादरा बसला. बल्लारपूर शहराच्या राजकारणावर तीन दशकांपासून असलेल्या त्यांच्या वर्चस्वाला पालकमंत्र्यांच्या गटाकडून शह देण्याचा धडाका लावला आहे.

येथील नगरपालिकेत अनुसूचित जाती महिला राखीव जागेवर प्रभाग पाच मधून छाया मडावी या एकमेव काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. परंतु याच प्रभागातून सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार मीना मडावी यांनी विजय मिळविला. आता नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही महिला दावेदार म्हणून समोर आल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसल्याने त्यांचा कल कोणाकडे राहणार हे समजू शकले नाही. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या नगरसेवक छाया मडावी प्रबळ दावेदार असताना अचानक मीना मडावीला समोर करुन पालकमंत्री संजय देवतळे गटाने चुरस निर्माण केली आहे.

ज्यावेळी रजनी मुलचंदानी नगराध्यक्ष झाल्या. त्यावेळी काँग्रेसचे ११, बसपाचे ४, शिवसेनेचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक व अपक्ष दोन असे एकूण २१ नगरसेवकांच सर्मथन मिळाले होते. भाजपाचे ११ नगरसेवक विरोधी गटात होते. दरम्यान बसपाच्या एका नगरसेवकाने राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने नगरपालिकेच्या सत्ताकारणात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष आहे. पुगलिया गटातील नगरसेवकांवर निलंबनाचे संकेत मिळाल्याने नगरपालिका वतरुळातील राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)