शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

निराधारांना अर्थसंकल्पातून मिळावा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:09 IST

शासनाचा सामाजिक न्याया विभागाकडून दारिद्र्य रेषा व गरीब कुटुंबातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दरमहा अनुदान दिले जाते. योजनेची अंमलबजावणी तहसील कार्यालयाकडून होते.

ठळक मुद्देअनुदान वाढीची प्रतीक्षा: सामाजिक न्याय विभागाच्या योजना

अनेकश्वर मेश्राम ।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर: शासनाचा सामाजिक न्याया विभागाकडून दारिद्र्य रेषा व गरीब कुटुंबातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दरमहा अनुदान दिले जाते. योजनेची अंमलबजावणी तहसील कार्यालयाकडून होते. सद्य:स्थिती दरमहा केवळ ६०० रुपये अनुदान मिळते. शेजारच्या तेलंगण राज्याच्या धर्तीवर लाभार्थ्यांना अनुदान वाढीची प्रतीक्षा आहे. आगामी अर्थसंकल्पातून निराधारांना आधार मिळावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून सामाजिक न्याय विभाग दारिद्र्य रेषेखालील विधवांना कुटुंब अर्थ सहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना ६५ वर्षांवरील वृद्धांसाठी श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, शेतकरी, शशेतमजूर, विधवा, अल्पभूधारकांना इंदिरा गांधी वृदञधापकाळ निवृत्ती वेतन योजना राबवित आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला ६०० रूपये अनुदान बँकेच्या शाखेमार्फत दिले जाते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निराधारांच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी आहे.राज्यात १९८० पासून संजय गांधी योजना, १९९१ ला इंदिरा गांधी राष्टÑीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि २०१४ पासून ६५ वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी श्रावण बाळ सेवा योजन लागू केली. आघाडी सरकारने योजनेत टप्प्याटप्प्याने वाढ केली. केंद्र व राज्यात सत्ताबदल होवून युतीचे सरकार आले. चार वर्षांचा कालावधी झाला. पण, निराधारांच्या अनुदानात अद्याप वाढ झाली नाही. ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामध्ये निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर भरीव तरतूद करुन आधार देणे गरजेचे आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थ संकल्पात तरतूद करण्यासाठी सूचना मागविली होती. त्यामुळे निराधार संवर्गातील लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचा सादर होणारा अर्थसंकल्प आधार ठरावा, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.अशा आहेत निराधार योजनासामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना राबविली जाते. योजनेची अंमलबजावणी प्रत्येक तहसील कार्यालय करते. यामध्ये विधवा निराधार महिला, अपंग संवर्गातील अंध, अस्थिव्यंग, मुकबधीर, मतिमंद, कर्णबधीर, क्षयरोग, कर्करोग, एचआयव्ही बाधित, पक्षघात, महिला संवर्गात निराधार, विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील महिला, अत्याचारित, परितकत्या, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य, अनाथ मुले आणि तृतीयपंथी संवर्गाना योजनेचा लाभ दिला जातो. श्रावणबाळ व इंदिरा गांधी राष्टÑीय निवृत्ती वेतन योजनेत ६५ वर्षांवरील वृद्धांनाही लाभ घेता येते.आॅनलाईन अर्ज निराधारांना त्रासदायकसरकारने सर्वत्र आॅनलाईन अर्ज सादर करण्याची मोहीम सुरु केली आहे. यासाठी आपले सरकार सेतू केंद्राची निर्मिती केली. मात्र, बल्लारपूर तहसील कार्यालयातील आपले सरकार सेतू केंद्रात निराधारांना आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा अद्याप उपलब्ध करुन दिले नाही. तालुक्यात सेतू केंद्रात १५ जणांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. मात्र, केवळ आठ ते दहा सेतू केंद्र सुरु आहेत. त्यातही निराधारांना आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पूर्वी प्रमाणेच अर्ज सादर करण्याची पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी आहे.