शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मूलचे बीडीओ बनले सहायक विक्रीकर आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:44 IST

पंचायत समिती मूल येथील गटविकास अधिकारी प्रदीप रंगराव पांढरबळे यांनी नुकतीच महाराष्टÑ लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेली सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. भविष्यातील ध्येय व मनातील आत्मविश्वास या बळावर आपण सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी पात्र ठरल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्दे‘लोकमत’शी वार्तालाप : लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : पंचायत समिती मूल येथील गटविकास अधिकारी प्रदीप रंगराव पांढरबळे यांनी नुकतीच महाराष्टÑ लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेली सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. भविष्यातील ध्येय व मनातील आत्मविश्वास या बळावर आपण सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी पात्र ठरल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रदीप पांढरेबळे हे मुळचे सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे या लहानशा गावातील रहिवाशी आहेत. प्राथमिक शिक्षणापासून अभ्यासाविषयी तळमळ व काही तरी वेगळे करुन दाखविण्याची तत्परता त्यांच्यात होती. त्यांचे इयत्ता पहिली ते दहवी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर अकरावी ते बारावीपर्यंत इस्लामपूर व त्यानंतर सांगली येथील इंजिनिअरीग कॉलेज मध्ये मेकॅनिकल मध्ये डिग्री प्राप्त केली. इंजिनिअरींग करताना दुसऱ्या वर्षी स्पर्धा परीक्षेविषयी चर्चा करुन अभ्यासाकडे वळले. इंजिनिअरींग शाखेतच स्पर्धा परीक्षेबाबत मनमोकळी चर्चा करण्यात त्यांचे मित्र सचिन मोरे, रोहन शिंदे, शिवाजी माकडे यांनी साथ दिली. गावातील एका देवळात अभ्यासाला सुरुवात केली. या काळात वाशिम येथील उपपोलीस अधीक्षक विशाल खांबे यांचे मार्गदर्शन लाभले.ते दुसºया प्रयत्नात सन २०१३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन गटविकास अधिकारी पदासाठी पात्र ठरले. गटविकास अधिकारी पदाची नियुक्ती पंचायत समिती मूल येथे झाल्याने प्रशासनातील बारकावे बघता आले. खूप काही शिकता आले, असे त्यांनी सांगितले. यातून वेगळे काही करता यावे, यासाठी उपजिल्हाधिकारी व सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा अयोगाअंतर्गत परीक्षा दिली व पात्र ठरल्याचे ते सांगतात.सांगली जिल्ह्यातील असलो तरी माणूसकीची नाळ जुळली असल्याने ज्या तालुक्यात आपण पदावर कार्यरत आहोत, त्या तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले पाहिजे. यासाठी आपण स्पर्धा परीक्षेविषयी अनेकदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. स्वत: ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके मिळावीत, यासाठी पुस्तके उपलब्ध करुन दिली. आजही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आपला पुढाकार असते, असे ते म्हणाले.अवघ्या २७ व्या वर्षी गटविकास अधिकारी पदावर मूल पंचायत समितीमध्ये रूजू झाल्यावर कधीही अधिकारी पदाचा आव आणला नाही. हसत मुखाने आलेल्या समस्येवर तोडगा काढण्यात त्यांचा हातखंड असल्याने अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाºयांना आपलेसे वाटायला लागले. सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदावर निवड झाल्याने ते महिनाभरात कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी पदभार सांभाळतील. मात्र पहिलीच गटविकास अधिकारी पदाची नियुक्ती मूल पंचायत समितीत झाल्यानंतर जे शिकायला मिळाले, ते कदापी विसरता येणार नसल्याचे ते सांगतात.जीवनात नवीन काहीतरी करुन दाखविण्यासाठी नवा जोश, नव्या उत्साहाबरोबरच आत्मविश्वास देखील महत्त्वाचा आहे, असे सांगताना त्यांनी अभ्यासात सातत्य असणे तेवढेच गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यात युपीएससी परीक्षा देऊन आयएसआय अधिकारी बनायचे स्वप्न आहे. मात्र अधिकारी बनलो तर मूल तालुक्याशी जुळलेली नाळ कदापी विसरणार नसल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.