शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

दहा हजार नागरिकांना ६० हातपंपांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:31 IST

खनिज विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरद्वारा कोठारी पाणी पुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्र सप्टेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आले.

ठळक मुद्देसाडेतीन कोटींची योजना : तरीही कोठारीवासीयांची घागर रिकामीच

आॅनलाईन लोकमतकोठारी : खनिज विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरद्वारा कोठारी पाणी पुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्र सप्टेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आले. तरीही कोठारीवासीयांची घागर रिकामीच असल्याने पाण्याची समस्या जैसे थे आहे. परिणामी चातकाप्रमाणे वाट पाहणाºया दहा हजार नागरिकांची तहाण भागविण्यासाठी ६० हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे.कोठारीतील जुनी पाणीपुरवठा योजना ग्रा.पं. प्रशासन व पदाधिकाºयांच्या निष्क्रीयतेमुळे मागील सहा वर्षांपासून ठप्प झाली होती. वीज वितरण कंपनीचे वीज देयक भरण्याची पत ग्रामपंचायतीची नसल्याने पाणीपुरवठा सहा वर्षापासून ठप्प झाला. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी ती सुरू करण्यासाठी कधीही तत्परता दाखविली नाही. परिणामी कोठारीत मोठी पाणी समस्या निर्माण झाली.दहा हजाराच्यांवर लोकांना पाण्यासाठी हातपंपावर अवलंबून राहावे लागले. ही समस्या आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाणली. त्यासाठी त्यांनी विधानसभेत खनिज विकास निधी अंतर्गत विशेष बाब म्हणून साडेतीन कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. वर्धा नदीचे पाणी शुद्ध करून १ लक्ष ६० हजार लिटर पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे बांधकाम पूर्ण केले. ग्रा.पं.च्या निवडणुका तोंडावर असताना या योजनेचे उद्घाटन करून कार्यान्वित करण्यात आली. नळाद्वारे पाणी घरात सुरू झाले.नळयोजनेची चातकाप्रमाणे प्रतिक्षा करणाऱ्या गावकऱ्यांना आनंद झाला. मात्र हा आनंद क्षणभरात नाहीसा झाला. नळाची जुनी पाईपलाईन नादूरुस्त होती. जागोजागी पाईप फुटल्या अवस्थेत होते. ते न बदलविल्यामुळे पाईपमधून पाणी जमिनीत मुरू लागले. नळात पाणी येत नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अशात गावकºयांनी ग्रा.पं.ची परवानगी न घेता वॉर्ड सदस्यांना हाताशी धरून नळजोडणी केली व पाण्याची प्रतीक्षा करू लागले.नळाद्वारे पाणी येत नसल्याची बाब गावकऱ्यांनी ग्रा.पं.च्या नजरेत आणून दिली. ग्रा.पं.ने पत्रव्यवहार करून जुनी पाईपलाईन बदलविण्याची व नळयोजना सुरळीत करण्याची मागणी केली. सद्या नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. नवीन नळयोजनेच्या नळाद्वारे येणारे पाण्याची तपासणी न करता व त्यातील त्रुट्या पूर्ण न करता घाईने उद्घाटन करणे नडले. अखेर गावकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.