शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

दहा हजार नागरिकांना ६० हातपंपांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:31 IST

खनिज विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरद्वारा कोठारी पाणी पुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्र सप्टेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आले.

ठळक मुद्देसाडेतीन कोटींची योजना : तरीही कोठारीवासीयांची घागर रिकामीच

आॅनलाईन लोकमतकोठारी : खनिज विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरद्वारा कोठारी पाणी पुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्र सप्टेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आले. तरीही कोठारीवासीयांची घागर रिकामीच असल्याने पाण्याची समस्या जैसे थे आहे. परिणामी चातकाप्रमाणे वाट पाहणाºया दहा हजार नागरिकांची तहाण भागविण्यासाठी ६० हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे.कोठारीतील जुनी पाणीपुरवठा योजना ग्रा.पं. प्रशासन व पदाधिकाºयांच्या निष्क्रीयतेमुळे मागील सहा वर्षांपासून ठप्प झाली होती. वीज वितरण कंपनीचे वीज देयक भरण्याची पत ग्रामपंचायतीची नसल्याने पाणीपुरवठा सहा वर्षापासून ठप्प झाला. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी ती सुरू करण्यासाठी कधीही तत्परता दाखविली नाही. परिणामी कोठारीत मोठी पाणी समस्या निर्माण झाली.दहा हजाराच्यांवर लोकांना पाण्यासाठी हातपंपावर अवलंबून राहावे लागले. ही समस्या आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाणली. त्यासाठी त्यांनी विधानसभेत खनिज विकास निधी अंतर्गत विशेष बाब म्हणून साडेतीन कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. वर्धा नदीचे पाणी शुद्ध करून १ लक्ष ६० हजार लिटर पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे बांधकाम पूर्ण केले. ग्रा.पं.च्या निवडणुका तोंडावर असताना या योजनेचे उद्घाटन करून कार्यान्वित करण्यात आली. नळाद्वारे पाणी घरात सुरू झाले.नळयोजनेची चातकाप्रमाणे प्रतिक्षा करणाऱ्या गावकऱ्यांना आनंद झाला. मात्र हा आनंद क्षणभरात नाहीसा झाला. नळाची जुनी पाईपलाईन नादूरुस्त होती. जागोजागी पाईप फुटल्या अवस्थेत होते. ते न बदलविल्यामुळे पाईपमधून पाणी जमिनीत मुरू लागले. नळात पाणी येत नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अशात गावकºयांनी ग्रा.पं.ची परवानगी न घेता वॉर्ड सदस्यांना हाताशी धरून नळजोडणी केली व पाण्याची प्रतीक्षा करू लागले.नळाद्वारे पाणी येत नसल्याची बाब गावकऱ्यांनी ग्रा.पं.च्या नजरेत आणून दिली. ग्रा.पं.ने पत्रव्यवहार करून जुनी पाईपलाईन बदलविण्याची व नळयोजना सुरळीत करण्याची मागणी केली. सद्या नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. नवीन नळयोजनेच्या नळाद्वारे येणारे पाण्याची तपासणी न करता व त्यातील त्रुट्या पूर्ण न करता घाईने उद्घाटन करणे नडले. अखेर गावकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.