शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बरिसोपाच्या संघर्ष यात्रेचा बल्लारपुरात समारोप

By admin | Updated: January 17, 2016 00:52 IST

बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी या नावाने उदयाला आलेल्या पक्षाने नागपूरहून काढलेल्या विदर्भ संघर्ष यात्रेचा येथे बुधवारी समारोप झाला.

विविध विषयावर मंथन : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढाऱ्यांचे मार्गदर्शनबल्लारपूर : बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी या नावाने उदयाला आलेल्या पक्षाने नागपूरहून काढलेल्या विदर्भ संघर्ष यात्रेचा येथे बुधवारी समारोप झाला. यानिमित्त येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अ‍ॅड. सुरेश माने होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर दशरथ मडावी, कादिरभाई, सिद्धार्थ पाटील, अशोक वनकर, गोपाल मेंढे, बल्लारपूर न.प.चे उपाध्यक्ष संपत कोरडे, नगरसेवक राजू झोडे, विक्की दुपारे, गणेश कोकाटे, वंदना तामगाडगे यांची उपस्थिती होती.विदर्भ राज्य निर्मिती, प्रत्येक शेतकऱ्याला व शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर निवृत्ती वेतन म्हणून प्रतिमाह चार हजार रुपये मिळावेत, खासगी उद्योगात आरक्षण, मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण, बहुजन विद्यार्थी धोरणात बदल या यासह मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने नागपूरहून ही संघर्ष यात्रा काढली. विदर्भातील विविध ठिकाणांहून येत माता जिजाऊ जयंती दिनी मंगळवारी यात्रा बल्लारपुरात पोहचली. यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात वरील मुद्यावर नेत्यांनी जोरकस भाषणे दिली. कादिरभाई यांनी विदर्भ राज्य वेगळा का हवा, याचे विश्लेषण करीत शासनकर्ते विदर्भावर कसा अन्याय करीत आहेत, याचे आकड्यांसह विवेचन केले. दशरथ मडावी हे प्रखर व तितक्याच मुद्देसूद भाषणातून आदिवासींच्या समस्यांवर पोटतिडकीने बोलले. भाजपा शासनावर ताशेरे ओढले व आदिवासींचे नाव बदलवून त्या जागी ‘वनवासी’ नाव ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव कोणता, याचे विश्लेषण करीत भाजपाच्या तुलनेत काँग्रेस शासन काही अंशी चांगले होते अशी पुस्ती जोडली. सिद्धार्थ पाटील यांनीही विविध विषयाला स्पर्श करीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न विस्तृतपणे मांडला. त्याचप्रमाणे सध्याची बहुजन समाजवादी पार्टी ही आंबेडकरी विचारापासून दूर जात असल्याने तो पक्ष सोडून आम्ही हा नवीन पक्ष स्थापन केला असल्याचे स्पष्ट करीत या पक्षाचे ध्येय धोरणे काय, ते सांगितले. माने यांनी पक्षाची भूमिका विषद करीत आंदोलनाचा पुढील टप्पा कोणता याची रूपरेषा मांडली. (तालुका प्रतिनिधी)