शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बॅंका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST

खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी बॅंकेतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरण्याचा अवधी शेतकऱ्यांना असतो. त्यानंतर ...

खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी बॅंकेतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरण्याचा अवधी शेतकऱ्यांना असतो. त्यानंतर पुन्हा नवे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येत असते. जो शेतकरी कर्ज भरत नाहीत, ते कर्ज थकित ठरवून त्यावर व्याज आकारणी केली जाते. भाजप सरकारने २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवली. या योजनेंतर्गत २००९ ते २०१६ पर्यंतची कर्जमुक्ती देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचे पैसे येण्यास बराच कालावधी लागला. त्यामुळे कर्ज माफ होईल, या धारणेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरलेच नाही. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारनेसुद्धा कर्जमाफी केली. त्याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना बॅंकेतर्फे नव्याने कर्ज देण्यात आले. खरीप हंगामात तर ७५५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

बॉक्स

अनेक शेतकरी योजनेपासून वंचित

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले. परंतु, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठण केले होते, त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची ओरड आहे. त्यामुळे ३१ मार्चच्या आत ज्या शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत कर्जमुक्तीसाठी अर्ज भरले होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे तसेच पुनर्गठित करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

कोट

शासनाच्या योजनेंतर्गत माझी कर्जमुक्ती झाली आणि नव्याने कर्जही मिळाले. त्यामुळे हंगामाला हातभार लागला.

समाधान लांडे, शेतकरी, गोवरी

-------

कोट

पात्र शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले. खरीप हंगामासाठी १ लाख चार हजार १६४ खात्यात ७५५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपये, तर रब्बी हंगामासाठी २२ कोटी ६५ लाख दहा हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

- शंभुनाथ झा, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बॅंक, चंद्रपूर