शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बॅंका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST

खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी बॅंकेतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरण्याचा अवधी शेतकऱ्यांना असतो. त्यानंतर ...

खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी बॅंकेतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरण्याचा अवधी शेतकऱ्यांना असतो. त्यानंतर पुन्हा नवे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येत असते. जो शेतकरी कर्ज भरत नाहीत, ते कर्ज थकित ठरवून त्यावर व्याज आकारणी केली जाते. भाजप सरकारने २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवली. या योजनेंतर्गत २००९ ते २०१६ पर्यंतची कर्जमुक्ती देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचे पैसे येण्यास बराच कालावधी लागला. त्यामुळे कर्ज माफ होईल, या धारणेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरलेच नाही. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारनेसुद्धा कर्जमाफी केली. त्याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना बॅंकेतर्फे नव्याने कर्ज देण्यात आले. खरीप हंगामात तर ७५५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

बॉक्स

अनेक शेतकरी योजनेपासून वंचित

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले. परंतु, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठण केले होते, त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची ओरड आहे. त्यामुळे ३१ मार्चच्या आत ज्या शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत कर्जमुक्तीसाठी अर्ज भरले होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे तसेच पुनर्गठित करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

कोट

शासनाच्या योजनेंतर्गत माझी कर्जमुक्ती झाली आणि नव्याने कर्जही मिळाले. त्यामुळे हंगामाला हातभार लागला.

समाधान लांडे, शेतकरी, गोवरी

-------

कोट

पात्र शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले. खरीप हंगामासाठी १ लाख चार हजार १६४ खात्यात ७५५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपये, तर रब्बी हंगामासाठी २२ कोटी ६५ लाख दहा हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

- शंभुनाथ झा, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बॅंक, चंद्रपूर