शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारशाह पॅसेंजर डोंगरगडपर्यंत न्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:03 IST

येथील रेल्वे स्थानकावरुन सकाळी ५.३० वाजता सुटणारी बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजर रेल्वे डोंगरगडपर्यंत न्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांच्याकडे निवेदनातून केली आहे़

ठळक मुद्देजिल्हा रेल्वे प्रवासी संघाची मागणी : विभागीय रेल्वे प्रबंधकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील रेल्वे स्थानकावरुन सकाळी ५.३० वाजता सुटणारी बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजर रेल्वे डोंगरगडपर्यंत न्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांच्याकडे निवेदनातून केली आहे़दक्षिण, पूर्व, मध्यरेल्वे मार्गावर डोंगरगढ येथे भाविकांचे श्रद्धास्थान माता बंबलेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. याठिकाणी लाखो भाविक मातेच्या दर्शनाला जातात. याशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू व नागपूर, मुंबई, भोपाळ, दिल्ली येथे जाण्यासाठी प्रवाशांना र्रेल्वेगाड्यांची गरज आहे़ वडसा ते चांदाफोर्टपर्यंत येणाऱ्या गाडीला बल्लारशाह रेल्वेस्थानकापर्यंत थांबा द्यावे, अशी मागणी रेल्वे संघाने केली़ बल्लारशाह-गोंदिया मार्गावरुन धावरी गाडी क्रमांक १२८५२ चेन्नई-बिलासपूर व्हाया चांदाफोर्ट, गाडी क्रमांक १२२५१ वैनगंगा यशवंतपूर-कोरबा व्हाया चांदाफोर्ट, त्रिरोवल्ली-बिलासपूर, एर्नाकुलम-बिलासपूर, त्रिवेंद्रम-कोरबा आदी गाड्यांपैकी एका सुपरफॉस्ट गाडीला हावडापर्यंत विस्तार करावा़ त्यामुळे गडचिरोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना चांगली सुविधा निर्माण होवू शकते. व्यापार वाढीला चालना मिळेल़ त्याचप्रमाणे चैनई-बिलासपूर, वैनगंगा यशवंतपूर-कोरबा गाडीला मूल येथील रेल्वे स्थानकावर थांबा द्या़ अशी आग्रही मागणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांचेकडे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी केली. ग्रामीण भागातील जनतेला रेल्वेचा प्रवास सुविधाजनक आहे. मागील काही वर्षांपासून डोंगरगड या धार्मिक स्थळावर भाविकांची गर्दी वाढत आहे़ बंबलेश्वरीच्या दर्शनासाठी जायचे असेल तर बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजरचा उपयोग होत नाही़ मध्येच उतरून बस अथवा अन्य साधनांनी पुढचा प्रवास करावा लागतो़ ही गाडी शेवटच्या स्थानापर्यंत नेल्यास भाविकांची मोठी सोय होईल़ शिवाय दक्षिणेतील विविध राज्यांतील भाविकांचा प्रवास सुकर होवू शकेल़ त्यामुळे बल्लारशहा- गोंदिया पॅसेंजर डोंगरगडपर्यंत न्यावे, अशी मागणी दक्षिणपूर्व मध्य रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे़