शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कचरामुक्तीने उजळला बल्लारपूरचा किल्ला

By admin | Updated: January 3, 2015 01:02 IST

येथील वर्धा नदीच्या काठावरील, गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला बल्लारपूर शहराची ऐतिहासिक ओळख आणि वैभव आहे.

बल्लारपूर : येथील वर्धा नदीच्या काठावरील, गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला बल्लारपूर शहराची ऐतिहासिक ओळख आणि वैभव आहे. ६०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या किल्ल्याचा काही भाग कोसळला व जीर्ण झालेला असला तरी गत वैभवाच्या बरेचशा खूणा अजूनही चांगल्या स्थितीत आहेत.त्यातील या किल्ल्याचे दोन मोठे जवळ जवळ लागून असलेले प्रवेशद्वार, नदीकाठावरील अष्टकोणी व देखणा राणी महाल आणि घोडपाग (घोडे बांधण्याची जागा) हे प्रमुख व उल्लेखनिय आहेत. गेल्या काही वर्षांपासून या किल्ल्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किल्ल्याच्या आत गवत व लहान झाडांनी हा भाग पूर्णत: व्यापून टाकला होता. तो एवढा की, किल्ल्यातील बराच दर्शनीय भाग व ऐतिहासिक सौंदर्य पार त्यात झाकोळून गेले होते. परंतु, आता पुरातत्व विभागाने याकडे लक्ष पुरविले आहे. गवत-झाडांचा झालेला कचरा पूर्णत: काढून व तो जाळून नष्ट करून किल्ल्यातील पूर्ण जागा स्वच्छ व चकचकित केली आहे. एवढेच नव्हे तर पुरातत्व विभागाने याकडे अधिक लक्ष घालून घोडपाग स्वच्छ केला आहे. किल्ल्यातून नदीकडे जाण्याचा पायरीचा मार्गही खुला केला जात आहे. त्याचप्रमाणे, राज्याचे अर्थमंत्री आणि बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने, या किल्ल्यातील ढासळत्या स्थितीत असलेल्या पराकोटांची दुरुस्तीही केली जात आहे. किल्ल्याच्या आत कचरा वाढू नये, याची वेळोवेळी काळजी घेत राहणे गरजेचे आहे. किल्ल्यातील आताच्या टापटीपपणामुळे हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)बल्लारपूरला येथील राजे खांडक्या बल्लारशहाच्या समाधी परिसरात गोंडसभेचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी राज्यातून तसेच इतर प्रांतांमधून आलेल्या गोंड व आदिवासी बांधवांनी आवर्जून या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊन गत वैभवाचे अवलोकन करून समाधान व्यक्त केले. अधिवेशनाच्या तीनही दिवसांत किल्ला परिसर गजबजून गेला होता.