शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बल्लारपूरचे पाणी बंद

By admin | Updated: December 8, 2015 00:50 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी तथा अधिकारी यांनी सात डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.

वरिष्ठांनी लक्ष द्यावे : संप सुरूच राहिला तर नागरिकांसमोर मोठे संकट उद्भवणारबल्लारपूर: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी तथा अधिकारी यांनी सात डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे येथील पेयजल वितरणाची संपूर्ण प्रक्रिया बंद पडल्याने बल्लारपूर शहरात नळाद्वारे होणारा पाणी पुरवाठ आज सोमवारपासून बंद पडला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संपत सुरुच राहणार, असे संपकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे संपकाळात पाण्याबाबत मोठी समस्या उभी राहणार आहे.सोमवारी संपाचा पहिला दिवस असल्यामुळे याची तिव्र झळ नळधारकांना बसली नाही. (तांत्रिक अडचणीपायी ही समस्या उदभवली असावी असा समज पहिल्या दिवशी झाला आहे.) परंतु, हा संप सुरूच राहिला तर मात्र गंभीर समस्या उद्भवणार आहे. येथील पेयजल शुद्धीकरण व पाणी पुरवठा संयत्राची सेवा पूर्णत: ठप्प असून त्या विभागाच्या प्रमुख दाराला कुलूप लावले आहे. द्वाराजवळ संपकरी ठाण मांडून बसले आहेत. या संपाची पूर्वसूचना शासन तसेच नगर परिषद, तहसीलदार व पोलीस स्टेशनला या संपाचे नेतृत्व करीत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची संघटना संघर्ष समितीने दिली आहे. महाराष्ट्र जीव प्राधिकरण ही योजना शासनाने घ्यावी आणि तेथील कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पूर्वी राज्यातील पाणी पुरवठा योजना शासनाच्या अधीन होत्या. नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या मंडळाकडे त्या सोपविण्यात आल्या. मजीप्राकडून त्या स्थानिक स्वराज्य संस्थाकडे गेल्यात. यामुळे राज्यात आता केवळ ५७ ठिकाणीच मजीप्रा त्या चालवीत असून उत्पन्न कमी खर्च अधिक यामुळे ही योजना तोट्यात चालली आहे. भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न या संकटापायी उभा झाला आहे. यामुळे, शासनाने ही योजना आपल्याकडे घ्यावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मजिप्रा फक्त बल्लरपूर येथेच कार्यरत असून त्यात ५० कर्मचारी आहेत. ते सर्वच या संपात उतरले आहेत. (तालुका प्रतिनिधी)