शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात श्री पध्दतीने धानाची रोवणी

By admin | Updated: July 17, 2016 00:43 IST

बल्लारपूर तालुक्यात एकूण खरिपाचे क्षेत्र नऊ हजार ३७९ हेक्टरचे आहे. यामध्ये भात लागवडीचे क्षेत्र दोन हजार ५८७ हेक्टर निर्धारित करण्यात आले आहे.

भात पट्ट्यात रोवणीला प्रारंभ : कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ३० हेक्टर क्षेत्रात राबविली पध्दतबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात एकूण खरिपाचे क्षेत्र नऊ हजार ३७९ हेक्टरचे आहे. यामध्ये भात लागवडीचे क्षेत्र दोन हजार ५८७ हेक्टर निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यात शेतकऱ्यांनी २३७ हेक्टर क्षेत्रात पऱ्हाचे बियाणे तर ०.५० हेक्टरमध्ये आवत्याची लागवड केली आहे. तालुका कृषी विभागाने ३० हेक्टरच्या क्षेत्रात श्री पद्धतीने धानाची रोवणी करण्याचे नियोजन केले असून मानोरा, इटोली व कवडजईच्या भाताच्या पट्ट्यात श्रीपद्धतीने धानाची रोवणी केली जात आहे.तालुक्यात शेतकरी भाताची रोवणी पारंपारिक पद्धतीने करण्यास पसंती देतात. परंतु उत्पादनात वाढ करण्याच्या अनुषंगाने तालुका कृषी विभागाने यावर्षी प्रायोगिक तत्वावर ३० हेक्टरच्या धानाच्या पट्ट्यात श्री पद्धतीने भाताची रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. कृषी सहायक प्रशांत गजभिये यांच्या मार्गदर्शनात मानोरा येथील लक्ष्मण देवतळे यांच्या शेतात धानाची रोवण श्री पद्धतीने करण्यात आली. या पद्धतीने भाताची लागवड केल्यास पिकामध्ये तण वाढीचे प्रमाण कमी होत असून मजुरीची काही प्रमाणात बचत होते. सरासरीच्या तुलनेत उत्पादन वाढीस मदत होते.बल्लारपूर तालुक्यात मानोरा, इटोली, कवडजई, कोर्टीमक्ता, मोहाळी, तुकूम, किन्ही येथील शिवार धानाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक भाताचे आहे. येथील भाताच्या उत्पादनावरच परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा आहे. भात पिकाला पाण्याची गरज भासत असल्याने या भागात सिंचनाची सुविधा म्हणून शेततळ्याचे जाळे निर्माण करण्यात आले आहेत. काही प्रमाणात या भागातील शेतकरी गाव तलाव, बोडी, माजी मालगुजारी तलावाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणतात. कोरडवाहू शेतीसाठी साठवणूक केलेले पाणी वरदान ठरत असल्याने कालांतराने शेतकरी पारंपारिक शेती सोबतच श्री पद्धतीच्या भात रोवणीला पसंत करतील, असे कृषी विभागाला वाटत आहे. आजघडीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात भाताची लागवड म्हणून शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. आजतागायत सरासरीच्या तुलनेत ८० टक्के पर्जन्यमान झाल्याने भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मात्र नदी, नाले, जवळील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)