शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात श्री पध्दतीने धानाची रोवणी

By admin | Updated: July 17, 2016 00:43 IST

बल्लारपूर तालुक्यात एकूण खरिपाचे क्षेत्र नऊ हजार ३७९ हेक्टरचे आहे. यामध्ये भात लागवडीचे क्षेत्र दोन हजार ५८७ हेक्टर निर्धारित करण्यात आले आहे.

भात पट्ट्यात रोवणीला प्रारंभ : कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ३० हेक्टर क्षेत्रात राबविली पध्दतबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात एकूण खरिपाचे क्षेत्र नऊ हजार ३७९ हेक्टरचे आहे. यामध्ये भात लागवडीचे क्षेत्र दोन हजार ५८७ हेक्टर निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यात शेतकऱ्यांनी २३७ हेक्टर क्षेत्रात पऱ्हाचे बियाणे तर ०.५० हेक्टरमध्ये आवत्याची लागवड केली आहे. तालुका कृषी विभागाने ३० हेक्टरच्या क्षेत्रात श्री पद्धतीने धानाची रोवणी करण्याचे नियोजन केले असून मानोरा, इटोली व कवडजईच्या भाताच्या पट्ट्यात श्रीपद्धतीने धानाची रोवणी केली जात आहे.तालुक्यात शेतकरी भाताची रोवणी पारंपारिक पद्धतीने करण्यास पसंती देतात. परंतु उत्पादनात वाढ करण्याच्या अनुषंगाने तालुका कृषी विभागाने यावर्षी प्रायोगिक तत्वावर ३० हेक्टरच्या धानाच्या पट्ट्यात श्री पद्धतीने भाताची रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. कृषी सहायक प्रशांत गजभिये यांच्या मार्गदर्शनात मानोरा येथील लक्ष्मण देवतळे यांच्या शेतात धानाची रोवण श्री पद्धतीने करण्यात आली. या पद्धतीने भाताची लागवड केल्यास पिकामध्ये तण वाढीचे प्रमाण कमी होत असून मजुरीची काही प्रमाणात बचत होते. सरासरीच्या तुलनेत उत्पादन वाढीस मदत होते.बल्लारपूर तालुक्यात मानोरा, इटोली, कवडजई, कोर्टीमक्ता, मोहाळी, तुकूम, किन्ही येथील शिवार धानाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक भाताचे आहे. येथील भाताच्या उत्पादनावरच परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा आहे. भात पिकाला पाण्याची गरज भासत असल्याने या भागात सिंचनाची सुविधा म्हणून शेततळ्याचे जाळे निर्माण करण्यात आले आहेत. काही प्रमाणात या भागातील शेतकरी गाव तलाव, बोडी, माजी मालगुजारी तलावाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणतात. कोरडवाहू शेतीसाठी साठवणूक केलेले पाणी वरदान ठरत असल्याने कालांतराने शेतकरी पारंपारिक शेती सोबतच श्री पद्धतीच्या भात रोवणीला पसंत करतील, असे कृषी विभागाला वाटत आहे. आजघडीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात भाताची लागवड म्हणून शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. आजतागायत सरासरीच्या तुलनेत ८० टक्के पर्जन्यमान झाल्याने भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मात्र नदी, नाले, जवळील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)