शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

बल्लारपूर पोलिसांच्या मोहल्ला समितीच्या सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST

शहर व ग्रामीण नागरिकांना मार्गदर्शक सूचना बल्लारपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असून, नागरिक बेफिकीर होऊन घराबाहेर झोपतात. ...

शहर व ग्रामीण नागरिकांना मार्गदर्शक सूचना

बल्लारपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असून, नागरिक बेफिकीर होऊन घराबाहेर झोपतात. या संधीचा फायदा चोर घेत असतात. यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज असून, बल्लारशाह पोलीस ठाण्यातर्फे शहर व ग्रामीण गावात जाऊन मोहल्ला समितीच्या बैठकीद्वारे ठाणेदार उमेश पाटील यांनी मार्गदर्शक सूचना देण्याची मोहीम सुरू केली आहे.

या संदर्भात बामणी येथील टीचर वसाहतीत आयोजित बैठकीत बामणीचे सरपंच सुभाष ताजने, जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. हरीश गेडाम, उप मुख्याधिकारी जयवंत काटकर यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, चोऱ्यांचे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त वाढते. यासाठी लोकांनी घरासमोरील लाईट रात्रीच्या वेळेस सुरू ठेवावे, पोलीस ठाणे, अग्निशमन दल, रुग्णवाहिका फोन नंबर लिहून ठेवावा, शेजारील व्यक्तीचे मोबाईल नंबर ठेवावे, मुख्य दरवाजाला ग्रील लावून ठेवावी, दरवाजाचा पडदा नेहमी बाहेरून लावून ठेवावा व इतर मार्गदर्शक तत्त्वे सांगितली. यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असून, काही अडचण आल्यास पोलीस ठाण्याला १०० नंबरवर फोन करून कळवावे, अशी माहिती दिली. सभेत वॉर्डातील लोकांची उपस्थिती होती.