शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

बल्लारपूर नगरपरिषदेचा गौरव

By admin | Updated: September 7, 2016 00:52 IST

स्वच्छ भारत अभियानात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला आहे.

स्वच्छ भारत अभियान : अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कारबल्लारपूर : स्वच्छ भारत अभियानात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला आहे. या पाठोपाठ बल्लारपूर नगरपालिकेने हागणदारीमुक्त अभियान व घनकचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करून स्वच्छ शहर, सुंदर शहर संकल्पना नागरिकांत रुजविली. त्याबद्दल राज्य शासनाच्या नगरविकास विभाग व एनडीटीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने नगराध्यक्ष छाया मडावी व मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांना चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी नगराध्यक्ष मडावी व मुख्याधिकारी मुद्धा, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, न.प. गटनेते देवेंद्र आर्य यांना पुरस्कारादाखल स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि १ कोटी ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला.बल्लारपूर न.प.ला ‘ब’ वर्ग मिळालेला असून औद्योगिक शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत न.प. प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून स्वच्छ शहर, सुंदर शहर साकारण्यासाठी वॉर्डावॉर्डात गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्त शहर करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. जागृतीमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांमध्ये संकोच भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य ठिकाणी करण्यात आल्याने परिसर स्वच्छ झाला आहे.स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह उपाध्यक्ष संपत कोरडे, स्वच्छता सभापती विनोद उर्फ सिक्की यादव, विरोधी पक्ष गटनेते चंदनसिंह चंदेल, यांच्या सहकार्याने स्वच्छा भारत अभियान राबविले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. (शहर प्रतिनिधी)