शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

बल्लारपूर नगरपरिषदेचा गौरव

By admin | Updated: September 7, 2016 00:52 IST

स्वच्छ भारत अभियानात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला आहे.

स्वच्छ भारत अभियान : अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कारबल्लारपूर : स्वच्छ भारत अभियानात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला आहे. या पाठोपाठ बल्लारपूर नगरपालिकेने हागणदारीमुक्त अभियान व घनकचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करून स्वच्छ शहर, सुंदर शहर संकल्पना नागरिकांत रुजविली. त्याबद्दल राज्य शासनाच्या नगरविकास विभाग व एनडीटीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने नगराध्यक्ष छाया मडावी व मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांना चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी नगराध्यक्ष मडावी व मुख्याधिकारी मुद्धा, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, न.प. गटनेते देवेंद्र आर्य यांना पुरस्कारादाखल स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि १ कोटी ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला.बल्लारपूर न.प.ला ‘ब’ वर्ग मिळालेला असून औद्योगिक शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत न.प. प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून स्वच्छ शहर, सुंदर शहर साकारण्यासाठी वॉर्डावॉर्डात गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्त शहर करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. जागृतीमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांमध्ये संकोच भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य ठिकाणी करण्यात आल्याने परिसर स्वच्छ झाला आहे.स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह उपाध्यक्ष संपत कोरडे, स्वच्छता सभापती विनोद उर्फ सिक्की यादव, विरोधी पक्ष गटनेते चंदनसिंह चंदेल, यांच्या सहकार्याने स्वच्छा भारत अभियान राबविले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. (शहर प्रतिनिधी)