शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बल्लारपूर शहराला स्मार्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:24 IST

औद्योगिकीकरणामुळे बल्लारपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. विकासातही शहर स्मार्ट होण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भरीव योगदान मिळत आहे.

ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : पालकमंत्र्यांचे शहरासाठी भरीव योगदान

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : औद्योगिकीकरणामुळे बल्लारपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. विकासातही शहर स्मार्ट होण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भरीव योगदान मिळत आहे. उपलब्ध निधीतून अंतर्गत रस्ते, दलित वस्ती सुधारणा, स्वच्छ भारत अभियान व अन्य प्राप्त निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहराला विकासात स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.बल्लारपूर शहरात नगरोत्थान योजना, जिल्हास्तर योजना, अग्निशमन अभियान, नागरी दलित वस्ती योजना कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चंदनसिंह चंदेल बोलत होते. दरम्यान ज्या प्रभागात कामाचा शुभारंभ करण्यात आला, तेथील जेष्ठ नागरिकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, काशिनाथ सिंह, वैशाली जोशी, सभापती जयश्री मोहुर्ले, पुनम मोडक, नगरसेवक आशा संगीडवार, सारिका कनकम, स्वामी रायबरम, कांता ढोके, विकास दुपारे यांची उपस्थिती होती.यावेळी चंदेल म्हणाले, राजकीय जीवनाच्या वाटचालीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासात्मक दृष्टीकोन बाळगला आहे. यामुळेच शहराच्या विकासात गती आली आहे. जिल्ह्यातील दुसºया क्रमांकाचे शहर स्मार्ट होण्याकडे वाटचाल करीत आहे. सबका साथ, सबका विकास, हेच ध्येय त्यांनी जोपासले आहे. आगामी काळात बल्लारपूर शहराचा अंतर्गत चेहरा मोहरा बदललेला दिसणार, असे सांगितले.