शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बळीराजा आज उभारणार नवचैतन्याची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:18 IST

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, ही मनोकामना व्यक्त करण्याचा सोहळा. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचा फेरा असतो. यंदाही आहे. त्यामुळे दिवस बदलतील, या आशेने नवे स्वप्न डोळ्यात साठवून नवचैतन्याची गुढी उभारण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.यावर्षी शेतकरी अस्मानी ...

ठळक मुद्देविकासाची आस : अन्यायकारक धोरणांनी शेतकरी हतबल

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, ही मनोकामना व्यक्त करण्याचा सोहळा. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचा फेरा असतो. यंदाही आहे. त्यामुळे दिवस बदलतील, या आशेने नवे स्वप्न डोळ्यात साठवून नवचैतन्याची गुढी उभारण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.यावर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने भरडून निघाला आहे. शेतकºयांनी डोळा भरून पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. अवकाळी गारपीट व पावसाने खरीप तसेच रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली. हाती येणारा शेतमाल वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. गुढीपाडव्याला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असायचे. परंतु, ते दिवस आता संपण्याच्या मार्गावर आले आहेत. विविध प्रश्नांनी अस्वस्थ झाल्याने त्यांच्या चेहºयावर आनंद दिसत नाही. गुढीपाडव्याला शेतकरी समाधानी असायचा. पण, सरकारच्या अन्यायकारक धोरणांमुळे बळीराजा मनातून पूर्णत: खचला.गुढीपाडव्याला घरी पुरणपोळी करून सालगडीला जेवण घातले जाते. ही परंपरा आजही कायम असली तरी चेहऱ्यावरचे दु:खी भाव लपविता येत नाही.सालगडी ठेवण्याचे प्रमाण घटलेगुढी पाडव्याच्या दिवशी शेतकरी नवीन सालगडी ठेवण्याची परंपरा होती.मात्र, दिवसेंदिवस शेती बिनभरवशाची होत आहे. पुरेसे उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. उत्पन्नच होत नसल्याने सालगड्याचा खर्च झेपत नाही. त्यामुळे शेतकरी सालगडी ठेवण्याचा करार या दिवशी करण्याचे प्रमाण आता घटत आहे. बरेच शेतकरी नाईलाजाने इतरांना ठेक्याने देतात. यातून गरीबी व शोषणाची मालिका सुरूच राहते.