शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

बळीराजा आज उभारणार नवचैतन्याची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:18 IST

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, ही मनोकामना व्यक्त करण्याचा सोहळा. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचा फेरा असतो. यंदाही आहे. त्यामुळे दिवस बदलतील, या आशेने नवे स्वप्न डोळ्यात साठवून नवचैतन्याची गुढी उभारण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.यावर्षी शेतकरी अस्मानी ...

ठळक मुद्देविकासाची आस : अन्यायकारक धोरणांनी शेतकरी हतबल

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, ही मनोकामना व्यक्त करण्याचा सोहळा. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचा फेरा असतो. यंदाही आहे. त्यामुळे दिवस बदलतील, या आशेने नवे स्वप्न डोळ्यात साठवून नवचैतन्याची गुढी उभारण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.यावर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने भरडून निघाला आहे. शेतकºयांनी डोळा भरून पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. अवकाळी गारपीट व पावसाने खरीप तसेच रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली. हाती येणारा शेतमाल वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. गुढीपाडव्याला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असायचे. परंतु, ते दिवस आता संपण्याच्या मार्गावर आले आहेत. विविध प्रश्नांनी अस्वस्थ झाल्याने त्यांच्या चेहºयावर आनंद दिसत नाही. गुढीपाडव्याला शेतकरी समाधानी असायचा. पण, सरकारच्या अन्यायकारक धोरणांमुळे बळीराजा मनातून पूर्णत: खचला.गुढीपाडव्याला घरी पुरणपोळी करून सालगडीला जेवण घातले जाते. ही परंपरा आजही कायम असली तरी चेहऱ्यावरचे दु:खी भाव लपविता येत नाही.सालगडी ठेवण्याचे प्रमाण घटलेगुढी पाडव्याच्या दिवशी शेतकरी नवीन सालगडी ठेवण्याची परंपरा होती.मात्र, दिवसेंदिवस शेती बिनभरवशाची होत आहे. पुरेसे उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. उत्पन्नच होत नसल्याने सालगड्याचा खर्च झेपत नाही. त्यामुळे शेतकरी सालगडी ठेवण्याचा करार या दिवशी करण्याचे प्रमाण आता घटत आहे. बरेच शेतकरी नाईलाजाने इतरांना ठेक्याने देतात. यातून गरीबी व शोषणाची मालिका सुरूच राहते.