शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
2
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
3
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
4
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
5
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
6
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
7
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
8
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
9
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
10
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
11
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
12
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
13
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
14
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
15
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
16
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
17
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
18
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
19
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
20
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
Daily Top 2Weekly Top 5

बालविश्वाचे ‘समर कॅम्प’ उपयोगिता की फॅड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:44 IST

मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सुजाण पालकांचा प्रश्न; तज्ज्ञ मार्गदर्शक नसतानाही शिबिरांचे पीक

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दामदुप्पट शुल्क भरून पालक अशा समर कॅम्पमध्ये आपल्या पाल्यांना पाठवू लागले आहेत. त्यामुळे या शिबिरांचा खरोखरच उपयोग होत आहे की केवळ फॅड, असा प्रश्न सुजाण पालक विचारू लागले आहेत.उन्हाळी शिबिरांमध्ये नवीन गोष्टी शिकवल्या जातात. रचनात्मक नवीन वस्तू निर्मिती वगैरे. पण खरेच हे गरजेचे आहे का? मुलांनी प्रत्येक वेळेला काही तरी शिकायलाच हवे. सुट्ट्यांमध्येही त्यांनी शिस्त पाळावी, शिबिरांमध्ये दिलेला होमवर्क पूर्ण करावा. मुलांनी मनसोक्त खेळावे. कुणाचेही कसलेही बंधन नसावे. सुट्टीचा मनमुराद आनंद लुटावा, असे पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. प्रत्येक गोष्टीत तुलना व स्पर्धेचा विचार करणे योग्य नाही. वर्गातल्या मुलांनी अमका क्लास लावला. मग तुही जा त्या क्लासला... तमक्याने पोहण्याचा क्लास लावला मग तूही जा पोहायला... अशी अनुकरणप्रियता घातक ठरू शकते. पण, पालकांच्या अपेक्षा अवास्तव झाल्या. यातूनच कुठल्याही सुविधा नसताना शुल्क घेऊन उन्हाळी शिबिर घेण्याची टूम आता जिल्ह्यात निघाल्याचे दिसून येत आहे.आदर्श पायंडाकाही कुटुंबांमध्ये अशीही परिस्थिती आहे की, मुलांना विविध शिबिरांमध्ये पाठविले नाही तर तो मागे पडेल, अशी धास्ती पालकांना वाटते. त्यामुळे शिबिराचे शुल्क अधिक असूनही ते पाल्यांना शिबिरात घालतात. हा खर्च अनाठायी आहे, असे म्हणणारेही काही पालक चंद्रपुरात आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नि:शुल्क उन्हाळी शिबिर घेऊन आदर्श पायंडा पाडला. शिबिरात विविध विषयांचे तज्ज्ञ मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्तम धडे देत आहेत.कल ओळखून घ्यावा निर्णयमुलांचा कल ओळखून पालकांनी निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक बालक वेगवेगळ्या परिस्थितीतून घडत असतो. त्यांच्या विचारविश्वाचा विचार करूनच पालकांनी दिशा ठरवली पाहिजे. पाल्याबद्दल अवास्तव आशा न ठेवता बौद्धिक क्षमता व कुटुंबाची पार्श्वभूमी नजरेआड करणे अनाठायी आहे. अनुकरणातून मुलांच्या आयुष्याला आकार मिळेलच, असेही नाही.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल