शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

बालविश्वाचे ‘समर कॅम्प’ उपयोगिता की फॅड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:44 IST

मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सुजाण पालकांचा प्रश्न; तज्ज्ञ मार्गदर्शक नसतानाही शिबिरांचे पीक

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दामदुप्पट शुल्क भरून पालक अशा समर कॅम्पमध्ये आपल्या पाल्यांना पाठवू लागले आहेत. त्यामुळे या शिबिरांचा खरोखरच उपयोग होत आहे की केवळ फॅड, असा प्रश्न सुजाण पालक विचारू लागले आहेत.उन्हाळी शिबिरांमध्ये नवीन गोष्टी शिकवल्या जातात. रचनात्मक नवीन वस्तू निर्मिती वगैरे. पण खरेच हे गरजेचे आहे का? मुलांनी प्रत्येक वेळेला काही तरी शिकायलाच हवे. सुट्ट्यांमध्येही त्यांनी शिस्त पाळावी, शिबिरांमध्ये दिलेला होमवर्क पूर्ण करावा. मुलांनी मनसोक्त खेळावे. कुणाचेही कसलेही बंधन नसावे. सुट्टीचा मनमुराद आनंद लुटावा, असे पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. प्रत्येक गोष्टीत तुलना व स्पर्धेचा विचार करणे योग्य नाही. वर्गातल्या मुलांनी अमका क्लास लावला. मग तुही जा त्या क्लासला... तमक्याने पोहण्याचा क्लास लावला मग तूही जा पोहायला... अशी अनुकरणप्रियता घातक ठरू शकते. पण, पालकांच्या अपेक्षा अवास्तव झाल्या. यातूनच कुठल्याही सुविधा नसताना शुल्क घेऊन उन्हाळी शिबिर घेण्याची टूम आता जिल्ह्यात निघाल्याचे दिसून येत आहे.आदर्श पायंडाकाही कुटुंबांमध्ये अशीही परिस्थिती आहे की, मुलांना विविध शिबिरांमध्ये पाठविले नाही तर तो मागे पडेल, अशी धास्ती पालकांना वाटते. त्यामुळे शिबिराचे शुल्क अधिक असूनही ते पाल्यांना शिबिरात घालतात. हा खर्च अनाठायी आहे, असे म्हणणारेही काही पालक चंद्रपुरात आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नि:शुल्क उन्हाळी शिबिर घेऊन आदर्श पायंडा पाडला. शिबिरात विविध विषयांचे तज्ज्ञ मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्तम धडे देत आहेत.कल ओळखून घ्यावा निर्णयमुलांचा कल ओळखून पालकांनी निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक बालक वेगवेगळ्या परिस्थितीतून घडत असतो. त्यांच्या विचारविश्वाचा विचार करूनच पालकांनी दिशा ठरवली पाहिजे. पाल्याबद्दल अवास्तव आशा न ठेवता बौद्धिक क्षमता व कुटुंबाची पार्श्वभूमी नजरेआड करणे अनाठायी आहे. अनुकरणातून मुलांच्या आयुष्याला आकार मिळेलच, असेही नाही.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल