शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वृक्षलागवड व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:21 IST

मंगल जीवने बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता जागतिक पर्यावरण दिनप्रसंगी वृक्षलागवडीची ...

मंगल जीवने

बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता जागतिक पर्यावरण दिनप्रसंगी वृक्षलागवडीची आठवण होऊ लागली आहे. कारण वृक्ष पर्यावरणासाठी महत्त्वाची आहेत. कारण ती वर्षाला २२ किलोपेक्षा जास्त कार्बन शोषून घेतात. त्यामुळे वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनच पर्यावरणाचा समतोल साधू शकतो. ही संकल्पना लक्षात घेऊन बल्लारशाह वनपरिक्षेत्रात ५० कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत मागील चार वर्षांत अंदाजे १० लाखांच्या जवळपास विविध प्रजातींचे रोपवन उभे असून, पर्यावरणाचा समतोल राखत आहे.

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात कारवा, कळमना, उमरी, मानोरा व बल्लारशाह या पाच बिटात दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात येतो. यामध्ये विविध मिश्र प्रजातींचे रोपवन नर्सरीत तयार करून लावण्यात येते.

मागील चार वर्षांत बल्लारशाह वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मानोरा उपक्षेत्रात ३ हजार ९०० हेक्टरवर २ लाखांच्या जवळपास विविध प्रजातींचे रोपवन तयार करण्यात आल्याची माहिती क्षेत्र सहायक प्रवीण विरूटकर यांनी दिली.

बॉक्स

वनकर्मचारी सांगतात...

बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील रोपवनाबाबत सांगताना क्षेत्र सहायक भोवरे म्हणाले, जिथे वन आहे तिथे जीव आहे. अलीकडे कोरोनाकाळात प्राणवायू विकत घेण्याची वेळ आली आहे. याला पर्याय वृक्ष संवर्धनाचा आहे. आणि आम्ही वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण करीत आहोत. उमरी वनपरिक्षेत्राचे प्रवीण बिपटे यांनी वृक्षलागवडीची माहिती देताना सांगितले की मिश्र प्रजातींचे रोपवन आता बहरले आहे. कळमनाचे क्षेत्र सहायक पुरी व कारवाचे रुंदन कातकर यांच्या नर्सरीत लावलेल्या रोपवनाची संपूर्ण वाढ झाली आहे. बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील अधिकारी संतोष थिपे म्हणाले, त्यांच्या हद्दीत येणाऱ्या गावांना या वृक्षलागवडीचा निश्चितच फायदा होईल. गावशेजारी घेतलेल्या वृक्षलागवडीमुळे गावाच्या शोभेत भर पडते. गावाच्या जवळ जंगल उभे राहते. त्यामुळे गावकऱ्यांना प्राणवायू मिळण्यास मदत होते. तसेच वृक्षलागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते. पर्जन्यमान वाढण्यास मदत होते. पावसाचे प्रमाण वाढेल, जमिनीची धूप थांबेल.

वृक्षलागवड करताना वनाची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धन या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.