शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

वृक्षलागवड व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:21 IST

मंगल जीवने बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता जागतिक पर्यावरण दिनप्रसंगी वृक्षलागवडीची ...

मंगल जीवने

बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता जागतिक पर्यावरण दिनप्रसंगी वृक्षलागवडीची आठवण होऊ लागली आहे. कारण वृक्ष पर्यावरणासाठी महत्त्वाची आहेत. कारण ती वर्षाला २२ किलोपेक्षा जास्त कार्बन शोषून घेतात. त्यामुळे वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनच पर्यावरणाचा समतोल साधू शकतो. ही संकल्पना लक्षात घेऊन बल्लारशाह वनपरिक्षेत्रात ५० कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत मागील चार वर्षांत अंदाजे १० लाखांच्या जवळपास विविध प्रजातींचे रोपवन उभे असून, पर्यावरणाचा समतोल राखत आहे.

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात कारवा, कळमना, उमरी, मानोरा व बल्लारशाह या पाच बिटात दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात येतो. यामध्ये विविध मिश्र प्रजातींचे रोपवन नर्सरीत तयार करून लावण्यात येते.

मागील चार वर्षांत बल्लारशाह वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मानोरा उपक्षेत्रात ३ हजार ९०० हेक्टरवर २ लाखांच्या जवळपास विविध प्रजातींचे रोपवन तयार करण्यात आल्याची माहिती क्षेत्र सहायक प्रवीण विरूटकर यांनी दिली.

बॉक्स

वनकर्मचारी सांगतात...

बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील रोपवनाबाबत सांगताना क्षेत्र सहायक भोवरे म्हणाले, जिथे वन आहे तिथे जीव आहे. अलीकडे कोरोनाकाळात प्राणवायू विकत घेण्याची वेळ आली आहे. याला पर्याय वृक्ष संवर्धनाचा आहे. आणि आम्ही वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण करीत आहोत. उमरी वनपरिक्षेत्राचे प्रवीण बिपटे यांनी वृक्षलागवडीची माहिती देताना सांगितले की मिश्र प्रजातींचे रोपवन आता बहरले आहे. कळमनाचे क्षेत्र सहायक पुरी व कारवाचे रुंदन कातकर यांच्या नर्सरीत लावलेल्या रोपवनाची संपूर्ण वाढ झाली आहे. बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील अधिकारी संतोष थिपे म्हणाले, त्यांच्या हद्दीत येणाऱ्या गावांना या वृक्षलागवडीचा निश्चितच फायदा होईल. गावशेजारी घेतलेल्या वृक्षलागवडीमुळे गावाच्या शोभेत भर पडते. गावाच्या जवळ जंगल उभे राहते. त्यामुळे गावकऱ्यांना प्राणवायू मिळण्यास मदत होते. तसेच वृक्षलागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते. पर्जन्यमान वाढण्यास मदत होते. पावसाचे प्रमाण वाढेल, जमिनीची धूप थांबेल.

वृक्षलागवड करताना वनाची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धन या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.