शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बैलपोळा उरला आता नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:47 IST

शेतीचे दैवत म्हणून ज्यांना ओळखले जाते. त्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने बैलपोळा आता नावापुरताच उरला आहे. नागभीड येथील काही वसाहतीमध्ये आर्जव करूनही बैलजोड्या न आल्याने अनेकांना बैलपुजेशिवाय पोळा साजरा करावा लागला.

ठळक मुद्देपैशाची चणचण : शेतकऱ्यांमध्येच निरूत्साह

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शेतीचे दैवत म्हणून ज्यांना ओळखले जाते. त्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने बैलपोळा आता नावापुरताच उरला आहे. नागभीड येथील काही वसाहतीमध्ये आर्जव करूनही बैलजोड्या न आल्याने अनेकांना बैलपुजेशिवाय पोळा साजरा करावा लागला.काळ बदलत आहे, तसे काळाचे तंत्र आणि तंत्रज्ञानही बदलत आहे. २० पंचेवीस वर्षापूर्वी ज्या तंत्राने शेती केली जायची, त्या तंत्राला फाटा देत बहुंतांश शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब केला आहे. याला कारणेही कारणीभूत आहेत. विविध कंपन्याकडून हप्तेवारीवर ट्रॅक्टर व विविध यंत्रे उपलब्ध झाली. कुरणांवर अतिक्रमण झाल्याने व जंगलांचे नियम कडक झाल्याने जनावरांच्या चराईसाठी जागाच उरली नाही. परिणामी शेतकºयांनी गुरे पाळणे बंद केले. याचा परिणाम रविवारी पोळ्यावर दिसून आला. नागभीड येथे बाजार चौक आणि शिवटेकडी अशा दोन ठिकाणी पोळा भरतो. पूर्वी या ठिकाणी बैल कोठे उभी करावीत हा प्रश्न होता. मात्र यावर्षी एका ठिकाणी १४ तर दुसऱ्या ठिकाणी आठ बैलजोड्या आल्या होत्या. या अल्प बैलजोड्यांचा परिणाम पूजेवर झाला. नागभीड येथील काही वसाहतींमध्ये तर बैलजोडी गेल्याच नाहीत. काहींनी आर्जव करून पूजेसाठी बैलजोडी बोलावून घेतली. पण काहींनी आर्जव करूनही बैलमालकांनी बैल आणले नाही. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वाट पाहूनही बैलजोडी न आल्याने अनेकांना बैलपुजेविनाच पोळा साजरा करावा लागत आहे.