शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बैलपोळा उरला आता नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:47 IST

शेतीचे दैवत म्हणून ज्यांना ओळखले जाते. त्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने बैलपोळा आता नावापुरताच उरला आहे. नागभीड येथील काही वसाहतीमध्ये आर्जव करूनही बैलजोड्या न आल्याने अनेकांना बैलपुजेशिवाय पोळा साजरा करावा लागला.

ठळक मुद्देपैशाची चणचण : शेतकऱ्यांमध्येच निरूत्साह

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शेतीचे दैवत म्हणून ज्यांना ओळखले जाते. त्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने बैलपोळा आता नावापुरताच उरला आहे. नागभीड येथील काही वसाहतीमध्ये आर्जव करूनही बैलजोड्या न आल्याने अनेकांना बैलपुजेशिवाय पोळा साजरा करावा लागला.काळ बदलत आहे, तसे काळाचे तंत्र आणि तंत्रज्ञानही बदलत आहे. २० पंचेवीस वर्षापूर्वी ज्या तंत्राने शेती केली जायची, त्या तंत्राला फाटा देत बहुंतांश शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब केला आहे. याला कारणेही कारणीभूत आहेत. विविध कंपन्याकडून हप्तेवारीवर ट्रॅक्टर व विविध यंत्रे उपलब्ध झाली. कुरणांवर अतिक्रमण झाल्याने व जंगलांचे नियम कडक झाल्याने जनावरांच्या चराईसाठी जागाच उरली नाही. परिणामी शेतकºयांनी गुरे पाळणे बंद केले. याचा परिणाम रविवारी पोळ्यावर दिसून आला. नागभीड येथे बाजार चौक आणि शिवटेकडी अशा दोन ठिकाणी पोळा भरतो. पूर्वी या ठिकाणी बैल कोठे उभी करावीत हा प्रश्न होता. मात्र यावर्षी एका ठिकाणी १४ तर दुसऱ्या ठिकाणी आठ बैलजोड्या आल्या होत्या. या अल्प बैलजोड्यांचा परिणाम पूजेवर झाला. नागभीड येथील काही वसाहतींमध्ये तर बैलजोडी गेल्याच नाहीत. काहींनी आर्जव करून पूजेसाठी बैलजोडी बोलावून घेतली. पण काहींनी आर्जव करूनही बैलमालकांनी बैल आणले नाही. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वाट पाहूनही बैलजोडी न आल्याने अनेकांना बैलपुजेविनाच पोळा साजरा करावा लागत आहे.