शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याकरिता बहुजन समाजाने एक होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:09 IST

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : देशातील सरकार भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या तयारीत असणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी सज्ज असले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही दलितांपूरती मर्यादित न राहता ती बहुजनांचीही चळवळ झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना ...

ठळक मुद्देनाना पटोले : गिरीशबाबू खोब्रागडे स्मृतीसन्मान पुरस्काराचे वितरण

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : देशातील सरकार भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या तयारीत असणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी सज्ज असले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही दलितांपूरती मर्यादित न राहता ती बहुजनांचीही चळवळ झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्मृतीशेष गिरीशबाबू खोब्रागडे स्मृती सन्मान पुरस्कार प्रदान कार्यक्रम तथा जीवन बागडे यांचा गौरव सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेतळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते मारोतराव कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, रिपब्लिक पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे, ब्रह्मपुरीच्या माजी नगराध्यक्षा रिता उराडे, समता सैनिक दलाचे मुख्य संघटक विमलसुर्य चिमणकर, रिपाइंचे नेते रोहीदास राऊत, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भाऊ निरभवने, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. देवेश कांबळे, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, अ‍ॅड.दिगांबर गुरपुडे, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे कार्याध्यक्ष सत्यजीत खोब्रागडे, रिपाइंचे देशक खोब्रागडे, जेसा मोटवाणी, भदन्त अश्वघोष महाथेरो आदी उपस्थित होते.यावेळी स्मृतीशेष गिरीशबाबू खोब्रागडे स्मृतीसन्मान पुरस्काराने जीवन बागडे यांना देऊन गौरविण्णयात आले. यावेळी पटोले म्हणाले, शासनाने मागासवर्गातील सर्वांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. हे सर्वात मोठे दुदैव आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत डांगे यांनी, संचालन प्रा.सरोज शिंगाडे तर उपस्थिताचे आभार पद्माकर रामटेके यांनी मानले. यावेळी सुधीर राऊत, डॉ.राजेश कांबळे, बंटी श्रीवास्तव, अभय रामटेके, देवानंद कांबळे, जनार्धन गेडाम, अशोक रामटेके उपसिथत होते.