शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याकरिता बहुजन समाजाने एक होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:09 IST

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : देशातील सरकार भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या तयारीत असणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी सज्ज असले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही दलितांपूरती मर्यादित न राहता ती बहुजनांचीही चळवळ झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना ...

ठळक मुद्देनाना पटोले : गिरीशबाबू खोब्रागडे स्मृतीसन्मान पुरस्काराचे वितरण

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : देशातील सरकार भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या तयारीत असणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी सज्ज असले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही दलितांपूरती मर्यादित न राहता ती बहुजनांचीही चळवळ झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्मृतीशेष गिरीशबाबू खोब्रागडे स्मृती सन्मान पुरस्कार प्रदान कार्यक्रम तथा जीवन बागडे यांचा गौरव सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेतळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते मारोतराव कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, रिपब्लिक पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे, ब्रह्मपुरीच्या माजी नगराध्यक्षा रिता उराडे, समता सैनिक दलाचे मुख्य संघटक विमलसुर्य चिमणकर, रिपाइंचे नेते रोहीदास राऊत, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भाऊ निरभवने, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. देवेश कांबळे, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, अ‍ॅड.दिगांबर गुरपुडे, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे कार्याध्यक्ष सत्यजीत खोब्रागडे, रिपाइंचे देशक खोब्रागडे, जेसा मोटवाणी, भदन्त अश्वघोष महाथेरो आदी उपस्थित होते.यावेळी स्मृतीशेष गिरीशबाबू खोब्रागडे स्मृतीसन्मान पुरस्काराने जीवन बागडे यांना देऊन गौरविण्णयात आले. यावेळी पटोले म्हणाले, शासनाने मागासवर्गातील सर्वांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. हे सर्वात मोठे दुदैव आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत डांगे यांनी, संचालन प्रा.सरोज शिंगाडे तर उपस्थिताचे आभार पद्माकर रामटेके यांनी मानले. यावेळी सुधीर राऊत, डॉ.राजेश कांबळे, बंटी श्रीवास्तव, अभय रामटेके, देवानंद कांबळे, जनार्धन गेडाम, अशोक रामटेके उपसिथत होते.