शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

बाबूपेठचा उड्डाण पूल ६१ कोटींच्या अंदाजपत्रकाला

By admin | Updated: November 4, 2015 00:45 IST

चंद्रपुरातील बाबूपेठ येथील रेल्वे रूळावरील बहुप्रतीक्षित उड्डाण पूल उभारण्याची स्थिती अंतीम टप्प्यात आली असली तरी,

नगर विकास मंत्रालयाच्या मान्यतेची प्रतीक्षाचंद्रपूर : चंद्रपुरातील बाबूपेठ येथील रेल्वे रूळावरील बहुप्रतीक्षित उड्डाण पूल उभारण्याची स्थिती अंतीम टप्प्यात आली असली तरी, या पुलाच्या निर्मितीसाठी ६१ कोटी ५७ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकाला नगर विकास मंत्रालयाच्या प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा मात्र कायमच आहे. ही मान्यता मिळाल्यावरच आणि भूसंपादनाची कार्यवाही झाल्यावरच या पुलाच्या निर्मीतीच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.बाबूपेठच्या उड्डाण पुलाच्या निर्मीतीभोवती शहराच्या विकासाचे राजकारण फिरत असले तरी अद्यापही या पुलासाठी असलेली तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नाही, हे तेवढेच स्पष्ट आहे. दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंत्यांनीच एका प्रसिद्धी पत्रकातून ही बाब स्पष्ट केली आहे. चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांच्या मतदार संघात येणाऱ्या बाबूपेठच्या उड्डाण पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडला आहे. त्यामुळे या मार्गाने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना अकारण प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पुलाच्या मान्यतेतील सर्व अडथळे दूर झाल्याचे आमदार श्यामकुळे यांनी यापूर्वी सांगितले असले तरी, एवढ्या महिन्यानंतरही या पुलाच्या निर्मीतीच्या कामाला न झालेली सुरूवातच सर्व काही सांगून जाण्यास पुरेशी आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे उड्डाण पुलासाठी सर्वसाधारण आराखडा तयार केला आहे. मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे अशा दोन विभागाचे लोहमार्ग रस्त्याला क्रॉस करतात. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या नकाशाला तत्वत: मान्यता दिली असून येथे पादचारीसाठी आणि दुचाकींसाठी तरतुद करण्यासाठी कळविले आहे. त्यानुसार अंडरपासचे नकाशेही मंजुरीसाठी रेल्वेकडे पाठविले आहेत. पोचमार्गासाठी भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीही झाली आहे. या पुलासाठी राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने पाच कोटी रूपये मंजूर केले असून मध्य रेल्वेने २०१५-१६ या रेल्वेच्या अर्थसंकल्पातही या उड्डाण पुलाच्या कामाचा समावेश केला आहे. त्यामुळे या पुलाच्या निर्मीतीच्या आशा बळावल्या आहेत.या संपूर्ण प्रकल्पाच्या कामासाठी ६१ कोटी ५७ लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. नगर विकास विभागाकडे ते पाठविण्यात आले आहे. या सोबतच ६९ घरांना या पुलामुळे बाधा पोहचणार आहे. या घरांच्या स्थलांतरणासाठी होणारी भूसंपादनाची प्रक्रियाही अद्याप पूर्ण व्हावयाची आहे. हे काम पूर्ण झाल्यावरच पुलाच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. तुर्तास तरी प्रतीक्षाच आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ६९ कुटुंबीय म्हणतात, उड्डाण पुलाला विरोध नाही‘उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर’ या मथळ्याचे वृत्त २ नोव्हेंबरच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच, या उड्डाण पुलाला ६९ कुटुंबियांचा विरोध नसल्याचे पूलबाधित नागरिकांच्या समितीमधील सदस्यांनी एका पत्रकातून स्पष्ट केले आहे. १३ सप्टेंबरला झालेल्या प्रत्यक्ष मोका पहाणीदरम्यान पालमंकत्र्यांनी पूलबाधित नागरिकाचे कसलेही नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन दिल्याने या पुलासाठी आपला विरोध नसल्याचे या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. या रेल्वे फाटकाचा त्रास जसा नागरिकांना आहे, तसा आपल्यालाही आहे. २० वर्षांपासून ही मागणी शासनदरबारी सातत्याने रेटली जात आहे. आपला विरोध असल्याचे सांगण्यामागे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. उड्डाण पूल लवकर झाला पाहीजे, असा सर्वांचा मानस असल्याचे या पत्रकातून समितीचे सदस्य विजय चांदेकर, स्नेहल रामटेके, प्रितपालसिंग भाटीया, अविनाश शेंडे, जयश्री घडसे, देवानंद बोबडे, केशव दारूंडे, वैशाली कांबळे आदींनी म्हटले आहे.