शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे विचार समाजाला आजही प्रेरणादायी

By admin | Updated: April 9, 2015 01:18 IST

देशात सामाजिक समता रुजविण्याचे महत्वपूर्ण काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असून दलित, शोषित, पीडित व दुर्बल घटकांसाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य झिजविले आहे.

चंद्रपूर : देशात सामाजिक समता रुजविण्याचे महत्वपूर्ण काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असून दलित, शोषित, पीडित व दुर्बल घटकांसाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य झिजविले आहे. सामाजिक समतेसाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य व त्यांचे विचार समाजासाठी आजही प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिलदरम्यान चंद्रपूर जिल्हयात सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ आज बुधवारी सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रभारी जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी व समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर यावेळी उपस्थित होते. गरिबातील गरीब व्यक्तीला सन्मानाने जगता यावे, यासाठी बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. शिक्षण व सामाजिक एकता यासाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य यामुळेच आपण आज प्रगतीपथावर आहोत. आर्थिक दुर्बल घटकासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला देश आजही विसरला नाही. ग्रामीण भागातील गोरगरिबांचा विकास त्यांनी नेहमी डोळयासमोर ठेवला म्हणून आज या महामानवाला देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आठवले जाते, असे संध्याताई गुरुनुले म्हणाल्या.समाजात खऱ्या अर्थाने सामाजिक समता रुजविण्याचे काम छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शासनाने सामाजिक समता सप्ताह आयोजित करुन या महामहानवांना खरी श्रध्दांजली अर्पण केल्याचे त्या म्हणाल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील असल्याचा सार्थ अभिमान असून समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य समाजाला नवी दिशा देणारे असल्याचे मत आशुतोष सलील यांनी व्यक्त केले. सामाजिक समता सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी नेहमी आग्रह धरला आहे. त्यांच्या या आग्रहामुळे आज समाजाने प्रगती साधली असल्याचे त्यांनी सांगितले.सामाजिक सप्ताहादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती प्रसाद कुळकर्णी यांनी प्रास्ताविकातून दिली. उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)