शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

बी- बियाणांचे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST

मासळ(बु) : कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातही शासनाकडून ३१ मेपर्यंत ...

मासळ(बु) : कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातही शासनाकडून ३१ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आपले सरकार, सेतू सुविधा केंद्र तसेच इंटरनेट कॅफे बंद आहेत. शेतकऱ्यांनी आता २० मेपर्यंत महाडीबीटीवरील योजनांसाठी अर्ज करायचा कसा, असा प्रश्न पडला आहे.

परंतु टाळेबंदी असल्याने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

राज्य शासनाच्या अनेक योजनांचा महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अर्ज भरून शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. खरिपाचा हंगाम सुरू झाला असून बियाणे लागवडीसाठी शेतकऱ्यांना भात, तूर, सोयाबीन, कापूस, ज्वारी इत्यादी बी-बियाणे ५० टक्के अनुदान तत्त्वावर मिळणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर मुदत मिळाली असून, २० मेपर्यंत अर्ज भरावे लागणार आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे आपले सेवा केंद्र, सेतू केंद्र, इंटरनेट कॅफे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा तरी कसा, अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर ऑनलाइन अर्जाद्वारे शेतकऱ्यांना योजनेची निवड करण्याचे अधिकार दिले आहे. राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी भात, कापूस, सोयाबीन, तूर व ज्वारी आदी बी- बियाणे अनुदान तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. परंतु अर्ज भरून देणारे ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. इंटरनेट व इतर माहितीच्या अभावामुळे योजनेचा लाभ घेता येणार किंवा नाही, यांची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अर्ज सादर करण्यासाठी प्रशानाकडून पर्यायी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.

बॉक्स

वाहतूक सेवा बंद

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महाडीबीटीवर माहिती भरताना अनेक अडचणी येत असून, अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जात आहेत. त्यातही बससेवा व खासगी प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

कोट

लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना बी- बियाणांसाठी अर्ज भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने सेतू सुविधा केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी.

-नितेश गणवीर, शेतकरी मासळ ( बु ).