शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बी. एड. अंतिम वर्षाचा निकाल लवकर जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठांच्या परीक्षा वेळेवर होऊ न शकल्यामुळे निकाल वेळेवर लागला नाही. त्यामुळे बी. एड. व एम. एड. प्रशिक्षणार्थींची ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठांच्या परीक्षा वेळेवर होऊ न शकल्यामुळे निकाल वेळेवर लागला नाही. त्यामुळे बी. एड. व एम. एड. प्रशिक्षणार्थींची पदवी पूर्ण झाली नाही. महाराष्ट्र सरकारने लगेच शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटीची परीक्षा घेण्याचे जाहीर केले. यामुळे अनेक बी.एड व एम.एड. प्रशिक्षणार्थी परीक्षेपासून वंचित राहणार, हा त्यांच्यावर अन्याय आहे. सध्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या बी.एड., एम. एड. अंतिम वर्षाची शेवटच्या सत्राची परीक्षा सुरू आहे. त्याचा निकाल परीक्षा झाल्यानंतर लगेच जाहीर करावा. जेनेकरून प्रशिक्षणार्थी टीईटी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. करिता विद्यापीठाने युद्धपातळीवर निकाल जाहीर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे निवेदनामार्फत सिनेट सदस्य प्रशांत दोंतुवार यांनी केली आहे.

२५ ऑगस्ट टीईटी पात्रता परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख

टीईटी परीक्षेचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२१ आहे व बी.एड. द्वितीय वर्ष सेमिस्टर ४ प्रशिक्षणार्थींची परीक्षा १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२१ पर्यंत आणि एम. एड. द्वितीय वर्ष सेमिस्टर ४ प्रशिक्षणार्थींची परीक्षा १० ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२१ आहे. २५ तारखेच्या आत निकाल लागला तर अनेक बी.एड. व एम. एड. प्रशिक्षणार्थींना ती परीक्षा देता येणार. यामुळे कुणाचेही नुकसान होणार नाही. विद्यापीठाने याचा गंभीर विचार करून बी. एड. व एम. एड. परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी आहे.

160821\img_20210814_091305.jpg

बी. एड.अंतिम वर्षाचा निकाल लवकर जाहीर करावा