शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

कृत्रिम टंचाईवर आळा घाला

By admin | Updated: May 22, 2014 23:44 IST

खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठाची उचल करतात, त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्या,

 आढावा बैठक : पालकमंत्री यांच्या सूचना

चंद्रपूर: खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठाची उचल करतात, त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री संजय देवतळे यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार शोभाताई फडणवीस, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जि.प. चे कृषी अरुण निमजे, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, कृषी सहसंचालक विजय घावटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.डी.एल. जाधव यावेळी उपस्थित होते. कृषी विभागाने मागील वर्षी खते व बियाण्यांचे योग्य नियोजन केल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, यावर्षीही शेतकर्‍यांना खते व बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावे, असे नियोजन करा, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी असून अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन करून पीक परिस्थितीबाबत जागृत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सोयाबीनचा अपवाद वगळता बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकर्‍यांनी आपल्याकडील बियाणेही वापरावे, असे त्यांनी सांगितले. राष्टÑीय कृषी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. या खरीप हंगामात १ लाख ७९ हजार हेक्टरवर खरीप भाताची, १ लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबिन तर १ लाख २० हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होईल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सर्व पिकांची पेरणी ४ लाख ६९ हजार हेक्टरवर होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव यांनी सांगितले. महाबीज व खासगी असे १ लाख ६ हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून प्राप्त साठा १ लाख ४ हजार २४० क्विंटल असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जाधव म्हणाले. या हंगामात जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत माजी मालगुजारी तलाव, राष्टÑीय कृषी विमा योजना, विद्युत विभागाचे पेडपेंडींग, गारपीटग्रस्तांना मदत, खते व बियाण्यांची उपलब्धता व बँकेचे कर्ज आदी विषयावर उपस्थित सदस्यांनी चर्चा केली. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणारे पोस्टर कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. बैठकीनंतर जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी.डी. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. (शहर प्रतिनिधी)