शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

कृत्रिम टंचाईवर आळा घाला

By admin | Updated: May 22, 2014 23:44 IST

खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठाची उचल करतात, त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्या,

 आढावा बैठक : पालकमंत्री यांच्या सूचना

चंद्रपूर: खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठाची उचल करतात, त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री संजय देवतळे यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार शोभाताई फडणवीस, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जि.प. चे कृषी अरुण निमजे, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, कृषी सहसंचालक विजय घावटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.डी.एल. जाधव यावेळी उपस्थित होते. कृषी विभागाने मागील वर्षी खते व बियाण्यांचे योग्य नियोजन केल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, यावर्षीही शेतकर्‍यांना खते व बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावे, असे नियोजन करा, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी असून अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन करून पीक परिस्थितीबाबत जागृत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सोयाबीनचा अपवाद वगळता बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकर्‍यांनी आपल्याकडील बियाणेही वापरावे, असे त्यांनी सांगितले. राष्टÑीय कृषी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. या खरीप हंगामात १ लाख ७९ हजार हेक्टरवर खरीप भाताची, १ लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबिन तर १ लाख २० हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होईल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सर्व पिकांची पेरणी ४ लाख ६९ हजार हेक्टरवर होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव यांनी सांगितले. महाबीज व खासगी असे १ लाख ६ हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून प्राप्त साठा १ लाख ४ हजार २४० क्विंटल असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जाधव म्हणाले. या हंगामात जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत माजी मालगुजारी तलाव, राष्टÑीय कृषी विमा योजना, विद्युत विभागाचे पेडपेंडींग, गारपीटग्रस्तांना मदत, खते व बियाण्यांची उपलब्धता व बँकेचे कर्ज आदी विषयावर उपस्थित सदस्यांनी चर्चा केली. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणारे पोस्टर कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. बैठकीनंतर जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी.डी. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. (शहर प्रतिनिधी)