शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम टंचाईवर आळा घाला

By admin | Updated: May 22, 2014 23:44 IST

खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठाची उचल करतात, त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्या,

 आढावा बैठक : पालकमंत्री यांच्या सूचना

चंद्रपूर: खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठाची उचल करतात, त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री संजय देवतळे यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार शोभाताई फडणवीस, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जि.प. चे कृषी अरुण निमजे, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, कृषी सहसंचालक विजय घावटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.डी.एल. जाधव यावेळी उपस्थित होते. कृषी विभागाने मागील वर्षी खते व बियाण्यांचे योग्य नियोजन केल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, यावर्षीही शेतकर्‍यांना खते व बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावे, असे नियोजन करा, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी असून अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन करून पीक परिस्थितीबाबत जागृत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सोयाबीनचा अपवाद वगळता बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकर्‍यांनी आपल्याकडील बियाणेही वापरावे, असे त्यांनी सांगितले. राष्टÑीय कृषी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. या खरीप हंगामात १ लाख ७९ हजार हेक्टरवर खरीप भाताची, १ लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबिन तर १ लाख २० हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होईल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सर्व पिकांची पेरणी ४ लाख ६९ हजार हेक्टरवर होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव यांनी सांगितले. महाबीज व खासगी असे १ लाख ६ हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून प्राप्त साठा १ लाख ४ हजार २४० क्विंटल असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जाधव म्हणाले. या हंगामात जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत माजी मालगुजारी तलाव, राष्टÑीय कृषी विमा योजना, विद्युत विभागाचे पेडपेंडींग, गारपीटग्रस्तांना मदत, खते व बियाण्यांची उपलब्धता व बँकेचे कर्ज आदी विषयावर उपस्थित सदस्यांनी चर्चा केली. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणारे पोस्टर कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. बैठकीनंतर जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी.डी. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. (शहर प्रतिनिधी)