शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अवकाळीने घेतला तिघांचा जीव, ३१२ घरे ही कोसळली

By साईनाथ कुचनकार | Updated: April 26, 2023 19:46 IST

३१२ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान, ६५ जनावरांचा मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यात २५ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून तिघांचा मृत्यू झाला असून ३१२ घरांचे तसेच गुरांचे गोठे कोसळले आहे. दरम्यान, ३२१.५१ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ६५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात प्रशासनाने पंचनामे करून आकडेवारी जाहीर केली आहे.

२५ एप्रिल रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या नैसगिक आपत्तीमध्ये जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने पंचनामे केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच दोघेजण जखमी झाले आहे. या वादळामध्ये ६५ पशुधनाची जीवितहानी तसेच पाच पशुधन जखमी झाले आहेत. पावसामध्ये जिल्ह्यातील ३१२ घरांचे व गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. शेती पिकांनाही मोठा फटका बसला असून तब्बल ३१२.५१ हेक्टरवरील शेत पीक जमीनदोस्त झाले आहे.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना व शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी तलाठ्यांमार्फत पंचनामे केले आहे. यासाठी आवश्यक निधीच्या मागणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्देश दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत देण्याची मागणी केली जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर