शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

हुमन प्रकल्पातील साहित्यांचा आणखी पाच लाखांत लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

कोट्यवधीचे साहित्य भंगारात : ४० वर्षांनंतरही प्रकल्पाच्या आशा धूसर दिलीप मेश्राम नवरगाव : मंजुरीनंतर हुमन प्रकल्पाच्या उभारणीसाठी विविध साहित्याची ...

कोट्यवधीचे साहित्य भंगारात

: ४० वर्षांनंतरही प्रकल्पाच्या आशा धूसर

दिलीप मेश्राम

नवरगाव : मंजुरीनंतर हुमन प्रकल्पाच्या उभारणीसाठी विविध साहित्याची जुळवाजुळव करून १९८२ मध्ये कामाला सुरुवात झाली. परंतु, विविध अडचणींमध्ये प्रकल्पाचे बांधकाम रखडल्याने कोटींच्या वस्तू भंगारामध्ये हजारात विकल्या जात असल्याने कररूपात जमा जनतेच्या पैशाचा दुरूपयोग तर होत नाही ना, असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी असेच काही साहित्य पाच लाखांत विकण्यात आले.

सिरकाडा या गावाजवळील उमा नदीवर हुमन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. १९८२ मध्ये कामाला सुरुवात झाली. शिवाय, धरणाच्या पाळीजवळ, रत्नापूर शिवटेकडी परिसरात आणि गडमौशी येथे कर्मचाऱ्यांना निवासी व सामान ठेवण्यासाठी मोठ-मोठे गोडाऊन बांधण्यात आले. बरेच कर्मचारी राहायला लागले. यामुळे आपल्या परिसरात हुमन प्रकल्प होणारच आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिन्देवाही, मूल, सावली आणि पोंभुर्णा या चार तालुक्यांतील १६० गावांतील ४६ हजार ११७ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार ही बातमीच शेतकऱ्यांना आनंद देणारी होती. आजघडीला या प्रकल्पाच्या उद्घाटनापासून ४० वर्षांचा कालखंड होत आहे. आजही वर्षा दोन वर्षांतून या प्रकल्पाबाबत कोणते ना कोणते सर्व्हे, शासनाच्या बैठका होतात. परंतु, यातून मार्ग निघालेला दिसत नाही. त्यामुळे हुमन प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसते.

१९८२ मध्ये उद्घाटन झाले तेव्हा हुमन प्रकल्पाची अंदाजपत्रकीय किंमत ३३ कोटी ६८ लाख रुपये होती. सन २००८- ०९ मध्ये १०१६ कोटींवर पोहोचली. आतातर प्रकल्पाची किंमत त्याहून दुप्पट झाली आहे. दिवसेंदिवस किंमत वाढत जात आहे तर दुसरीकडे निर्माण केलेल्या वसाहतींमधील साहित्य भंगारात विकल्या जात आहे. सात आठ वर्षांपूर्वी प्रकल्पाच्या पाळीजवळील इमारतीचे साहित्य केवळ ३५ हजार रुपयांत विकण्यात आले आणि १६ फेब्रुवारी २०२१ ला झालेल्या लिलावात रत्नापूर शिवटेकडी परिसरातील वसाहतींमधील साहित्य यामध्ये काटेरी तारांचे बंडल १४६, इलेक्ट्रीक पोल ६४, ट्यूबलाईट फिटींग नग ५४, एंगल १२३५ नग जिएसटी सह केवळ ५ लाख २४ हजार १५६ रुपयांना विकण्यात आले आहे.

बॉक्स

बांधलेल्या इमारतीही पडल्या

बांधलेल्या इमारती काही पडल्या, काही जीर्ण झाल्या. हळूहळू असलेले साहित्य भंगारात विकल्या जात असून हुमन प्रकल्पाचे शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्नसुध्दा भंगारासारखे कुजत-कुजत नष्ट होते की काय, अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. शिवाय, जनतेकडून कररूपाने जमा पैशाचा दुरूपयोग होतो की कायॽ याचाही विचार करण्याची वेळ जागृत नागरिकांवर आलेली आहे.