शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कोदेपुरातील पाणीटंचाईकडे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:17 IST

गावखेड्यातील मूलभूत सुविधा पुरविण्यात हयगय केल्यास गावखेड्यांतील महिला कशी एल्गार पुुकारु शकते, याचा प्रत्यय कोदेपार येथे आला.

ठळक मुद्देमहिलाही आता समोर येऊ लागल्या. आपल्या समस्या मांडू लागल्या आहेत

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गावखेड्यातील मूलभूत सुविधा पुरविण्यात हयगय केल्यास गावखेड्यांतील महिला कशी एल्गार पुुकारु शकते, याचा प्रत्यय कोदेपार येथे आला. एरव्ही शांत असलेल्या परंतु, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या महिलांनी हा प्रश्न पदाधिकाººयांना लक्षात आणून दिल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. महिलाही आता समोर येऊ लागल्या. आपल्या समस्या मांडू लागल्या आहेत, हें या घटनेतून सिद्ध झाले.तालुक्यातील कोदेपार येथे ३० ते ३५ ारांची लोकवस्ती. हीवस्ती मिंडाळा ग्रामपंचायतीअंतर्गत येते. या वस्तीत तीन-चार विंधन विहिरी असल्या तरी सर्व बिनकामाच्या झाल्या आहेत. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना अनेक वर्षापासून रखडली आहे. त्यामुळे या संपूर्ण वस्तीची मदार चौकातील एकाच विंधन विहिरीवर आहे. संपूर्ण वस्ती याच एका विंधन विहिरीवरुन पाणी भरत असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी, एक बादलीभर पाणी काढण्यासाठी कोदेपार येथील महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील महिलांना जागृत करण्यासाठी बचतगटांचा उपयोग होऊ शकतो. परंतु, त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. शेतीमध्ये पुुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राबणाºया महिलांना सामाजिक व आर्थिक संकटांची झळ लागल्याने त्या आता बोलू लागल्या आहेत. गावातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींसमोर धाडसाने प्रश्न मांडू लागल्या. कारण त्याशिवाय पर्याय नाही, हे आता कोदेपार महिलांना वाटत आहे.शुक्रवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान गटनेते डॉ. सतीश वारजूकर हे एका कुटुंबाच्या सात्वनासाठी कोदेपारला गेले असता सहा-सात महिला याच विंधन विहिरीवर पाणी भरत होत्या. त्यातील एका महिलेने बोरींग पाणी भरण्यासाठी कशा अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर अन्य महिलांनीही या प्रश्नाची गांर्भियता पदाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली साहेब, बघा आम्हाला किती त्रास होतो, या शब्दात आपली समस्या मांडली. गावात तीन-चार बोअरींग असल्या तरी त्या कामाच्या नाहीत. याच बोअरींगचे पाणी संपूर्ण गाव वापरते. आम्ही अनेकांना या बोअरींगविषयी सांगितले. ग्रामपंचायतीला माहिती देऊनही काही कार्यवाही झाली नाही, याविषयी खंत व्यक्त केली. डॉ. सतीश वारजूकर यांनी त्या महिलांची समस्या शांतपणे ऐकून घेतली. मागणी लवकरच पूर्ण होईल. एवढेच नाही तर येत्या मार्चपर्यंत एका नवीन नळासाठी स्वत: पाठपुरावा करतो, अशी हमी दिली. मार्चपर्यंत नवीन नळ मंजूर झाली नाही तर एप्रिलमध्ये स्वत:कडून नवीन नळ करून देणार, अशी ग्वाही दिल्यानंतर महिलांनी समाधानाचा सुटकारा सोडला.