शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोदेपुरातील पाणीटंचाईकडे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:17 IST

गावखेड्यातील मूलभूत सुविधा पुरविण्यात हयगय केल्यास गावखेड्यांतील महिला कशी एल्गार पुुकारु शकते, याचा प्रत्यय कोदेपार येथे आला.

ठळक मुद्देमहिलाही आता समोर येऊ लागल्या. आपल्या समस्या मांडू लागल्या आहेत

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गावखेड्यातील मूलभूत सुविधा पुरविण्यात हयगय केल्यास गावखेड्यांतील महिला कशी एल्गार पुुकारु शकते, याचा प्रत्यय कोदेपार येथे आला. एरव्ही शांत असलेल्या परंतु, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या महिलांनी हा प्रश्न पदाधिकाººयांना लक्षात आणून दिल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. महिलाही आता समोर येऊ लागल्या. आपल्या समस्या मांडू लागल्या आहेत, हें या घटनेतून सिद्ध झाले.तालुक्यातील कोदेपार येथे ३० ते ३५ ारांची लोकवस्ती. हीवस्ती मिंडाळा ग्रामपंचायतीअंतर्गत येते. या वस्तीत तीन-चार विंधन विहिरी असल्या तरी सर्व बिनकामाच्या झाल्या आहेत. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना अनेक वर्षापासून रखडली आहे. त्यामुळे या संपूर्ण वस्तीची मदार चौकातील एकाच विंधन विहिरीवर आहे. संपूर्ण वस्ती याच एका विंधन विहिरीवरुन पाणी भरत असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी, एक बादलीभर पाणी काढण्यासाठी कोदेपार येथील महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील महिलांना जागृत करण्यासाठी बचतगटांचा उपयोग होऊ शकतो. परंतु, त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. शेतीमध्ये पुुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राबणाºया महिलांना सामाजिक व आर्थिक संकटांची झळ लागल्याने त्या आता बोलू लागल्या आहेत. गावातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींसमोर धाडसाने प्रश्न मांडू लागल्या. कारण त्याशिवाय पर्याय नाही, हे आता कोदेपार महिलांना वाटत आहे.शुक्रवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान गटनेते डॉ. सतीश वारजूकर हे एका कुटुंबाच्या सात्वनासाठी कोदेपारला गेले असता सहा-सात महिला याच विंधन विहिरीवर पाणी भरत होत्या. त्यातील एका महिलेने बोरींग पाणी भरण्यासाठी कशा अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर अन्य महिलांनीही या प्रश्नाची गांर्भियता पदाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली साहेब, बघा आम्हाला किती त्रास होतो, या शब्दात आपली समस्या मांडली. गावात तीन-चार बोअरींग असल्या तरी त्या कामाच्या नाहीत. याच बोअरींगचे पाणी संपूर्ण गाव वापरते. आम्ही अनेकांना या बोअरींगविषयी सांगितले. ग्रामपंचायतीला माहिती देऊनही काही कार्यवाही झाली नाही, याविषयी खंत व्यक्त केली. डॉ. सतीश वारजूकर यांनी त्या महिलांची समस्या शांतपणे ऐकून घेतली. मागणी लवकरच पूर्ण होईल. एवढेच नाही तर येत्या मार्चपर्यंत एका नवीन नळासाठी स्वत: पाठपुरावा करतो, अशी हमी दिली. मार्चपर्यंत नवीन नळ मंजूर झाली नाही तर एप्रिलमध्ये स्वत:कडून नवीन नळ करून देणार, अशी ग्वाही दिल्यानंतर महिलांनी समाधानाचा सुटकारा सोडला.