शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

कोदेपुरातील पाणीटंचाईकडे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:17 IST

गावखेड्यातील मूलभूत सुविधा पुरविण्यात हयगय केल्यास गावखेड्यांतील महिला कशी एल्गार पुुकारु शकते, याचा प्रत्यय कोदेपार येथे आला.

ठळक मुद्देमहिलाही आता समोर येऊ लागल्या. आपल्या समस्या मांडू लागल्या आहेत

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गावखेड्यातील मूलभूत सुविधा पुरविण्यात हयगय केल्यास गावखेड्यांतील महिला कशी एल्गार पुुकारु शकते, याचा प्रत्यय कोदेपार येथे आला. एरव्ही शांत असलेल्या परंतु, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या महिलांनी हा प्रश्न पदाधिकाººयांना लक्षात आणून दिल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. महिलाही आता समोर येऊ लागल्या. आपल्या समस्या मांडू लागल्या आहेत, हें या घटनेतून सिद्ध झाले.तालुक्यातील कोदेपार येथे ३० ते ३५ ारांची लोकवस्ती. हीवस्ती मिंडाळा ग्रामपंचायतीअंतर्गत येते. या वस्तीत तीन-चार विंधन विहिरी असल्या तरी सर्व बिनकामाच्या झाल्या आहेत. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना अनेक वर्षापासून रखडली आहे. त्यामुळे या संपूर्ण वस्तीची मदार चौकातील एकाच विंधन विहिरीवर आहे. संपूर्ण वस्ती याच एका विंधन विहिरीवरुन पाणी भरत असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी, एक बादलीभर पाणी काढण्यासाठी कोदेपार येथील महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील महिलांना जागृत करण्यासाठी बचतगटांचा उपयोग होऊ शकतो. परंतु, त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. शेतीमध्ये पुुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राबणाºया महिलांना सामाजिक व आर्थिक संकटांची झळ लागल्याने त्या आता बोलू लागल्या आहेत. गावातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींसमोर धाडसाने प्रश्न मांडू लागल्या. कारण त्याशिवाय पर्याय नाही, हे आता कोदेपार महिलांना वाटत आहे.शुक्रवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान गटनेते डॉ. सतीश वारजूकर हे एका कुटुंबाच्या सात्वनासाठी कोदेपारला गेले असता सहा-सात महिला याच विंधन विहिरीवर पाणी भरत होत्या. त्यातील एका महिलेने बोरींग पाणी भरण्यासाठी कशा अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर अन्य महिलांनीही या प्रश्नाची गांर्भियता पदाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली साहेब, बघा आम्हाला किती त्रास होतो, या शब्दात आपली समस्या मांडली. गावात तीन-चार बोअरींग असल्या तरी त्या कामाच्या नाहीत. याच बोअरींगचे पाणी संपूर्ण गाव वापरते. आम्ही अनेकांना या बोअरींगविषयी सांगितले. ग्रामपंचायतीला माहिती देऊनही काही कार्यवाही झाली नाही, याविषयी खंत व्यक्त केली. डॉ. सतीश वारजूकर यांनी त्या महिलांची समस्या शांतपणे ऐकून घेतली. मागणी लवकरच पूर्ण होईल. एवढेच नाही तर येत्या मार्चपर्यंत एका नवीन नळासाठी स्वत: पाठपुरावा करतो, अशी हमी दिली. मार्चपर्यंत नवीन नळ मंजूर झाली नाही तर एप्रिलमध्ये स्वत:कडून नवीन नळ करून देणार, अशी ग्वाही दिल्यानंतर महिलांनी समाधानाचा सुटकारा सोडला.