शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकाकडे ग्रामस्थांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीशिवाय सध्यातरी पर्याय नाही. दरम्यान, काही सरपंचांनी मुदतवाढ देण्याची मागणीही शासनाकडे केली आहे. योग्य व्यक्ती हा एकमेव निकष देत ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडीचे अधिकार शासनाने पालकमंत्र्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देगावातील राजकारण तापले : गावातील कट्ट्यावरही चर्चांना उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे गावागावात कट््ट्यांवर चर्चांना उधाण आले आहे. सरपंच आणि प्रशासक निवडीवरून ग्रामीण राजकारण सध्या ढवळून निघत आहे. मात्र, शेवटपर्यंत कोण बाजी मारेल हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीशिवाय सध्यातरी पर्याय नाही. दरम्यान, काही सरपंचांनी मुदतवाढ देण्याची मागणीही शासनाकडे केली आहे. योग्य व्यक्ती हा एकमेव निकष देत ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडीचे अधिकार शासनाने पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांकडून आपल्यालाच खुर्ची मिळावी यासाठी फिल्डींग लावली जात आहे. गावातून अनेक जण इच्छूक असल्याने तालुकास्तरावरील नेत्यांनाही चांगलाच घाम सुटत आहे. गावातील पक्षनिहाय ताकदीनुसार ग्रामपंचायतीची विभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, अशा परिस्थितीत आपल्या पक्षाच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. शेती हंगाम असतानाही सध्यास्थितीत गावातील राजकारण चांगलेच तापले आहे.अनेकांना बसणार फटकाप्रशासकपदी योग्य व्यक्तीची निवड करण्याबाबतचे ग्रामविकास विभागाचे पत्र आहे. यात सरपंचपदाचे ज्या प्रवर्गासाठी आरक्षण होते, त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीची निवड करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेवून प्रशासकपदावर हक्क सांगण्यासाठी ग्रामपंचायतीचे आरक्षण आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांची निवड करण्यासाठी काही राजकीय पक्षांकडून चाचपणी केली जात आहे.पालकमंत्र्यांकडून ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडण्याचा शासनाने घेतलेला निर्णय पूर्णत: चुकीचा आहे. यासंदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.- पारस पिंपळकर, अध्यक्ष,संरपंच संघटना चंद्रपूर तालुकातथा सरपंच, पिपरी (धानोरा)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत