शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर उपनिरीक्षकांच्या बदल्यांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:21 IST

चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

ठळक मुद्देअचानक झालेल्या बदलीने पोलीस निरीक्षकासोबतच जनतेला सुद्धा आश्चर्य वाटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अचानक झालेल्या बदलीने पोलीस निरीक्षकासोबतच जनतेला सुद्धा आश्चर्य वाटले. आता हाच बदल उपनिरीक्षकांच्या बदल्यांतून दिसून येणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.तालुक्यातील ठिकाणावर बदल हवा यासाठी पोलीस अधीक्षकांनी केलेल्या बदल्या सर्वांना स्वागर्ताह असला तरी ऐन नवरात्रीत झालेल्या बदलाने पोलीस निरीक्षकांना जनतेशी जुळवून घेण्यास व योग्य घडी नीट बसविण्यात अवधी लागणार आहे. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या व्हाव्यात, असा सूर जनतेद्वारा उमटत आहे. याचे कारणही तसेच असून बढती झाल्यानंतर एकाच ठाण्यात ठाण मांडून बसणारे महाभाग मूल बरोबरच इतरही ठाण्यात आहेत. एकाच ठिकाणी वावरत असल्याने त्यांची पकड इतर अवैध धंदे करणाºयांसोबत चांगली जमल्याचे दिसून येते.पोलीस निरीक्षकांच्या बदल्या सर्वांना अचंबित करणाºया ठरल्या. या बदल्यावरुन नेहमी उन्हाळ्यामध्ये होणाºया बदल्यांना फाटा देत अवेळी बदल्या केल्याने सर्वांची भंबेरी उडाली. मात्र सर्वानी स्वत:ला सावरत वरिष्ठांचा आदेश मानत कामावर रूजू झाले.पोलीस प्रशासनात सूसत्रता आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उचललेले पाऊन कौतुकास्पद आहे. मात्र अवैध काम करणाºया काहींना अस्वस्थ तर काहींच्या चेहºयावर हास्य फुलले आहे. ज्या ठाणेदारांनी अवैध धंदे करणाºयांवर जबर बसवले त्यांना ते ठाणेदार नको होते. काहीशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले त्यांना ठाणेदार हवे होते. मात्र ‘विंचवाचं बिºहाड पाठीवर’ या उक्तीप्रमाणे अधिकाºयांची बदली ठरली असल्याने त्यांचे बिºहाड पाठीवरच असते, हेच यावरुन दिसून येते.मूलमध्ये पोलीस उपनिरीक्षक ठाण्यातच मुक्कामाला आहेत की काय, असा भास होताना दिसतो. शिपायांपासून तर पोलीस उपनिरीक्षकापर्यंतचे अनेक जण याच ठाण्यात अथवा परिसरात फिरत असल्याने अवैध धंदे करणाºयांच्या ‘नाड्या’ त्यांना माहित आहेत. त्यामुळे केव्हा नाड्या दाबावच्या याची माहिती असल्याने त्याचा फायदा पोलीस उपनिरीक्षकांना होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या कराव्यात.