शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर उपनिरीक्षकांच्या बदल्यांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:21 IST

चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

ठळक मुद्देअचानक झालेल्या बदलीने पोलीस निरीक्षकासोबतच जनतेला सुद्धा आश्चर्य वाटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अचानक झालेल्या बदलीने पोलीस निरीक्षकासोबतच जनतेला सुद्धा आश्चर्य वाटले. आता हाच बदल उपनिरीक्षकांच्या बदल्यांतून दिसून येणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.तालुक्यातील ठिकाणावर बदल हवा यासाठी पोलीस अधीक्षकांनी केलेल्या बदल्या सर्वांना स्वागर्ताह असला तरी ऐन नवरात्रीत झालेल्या बदलाने पोलीस निरीक्षकांना जनतेशी जुळवून घेण्यास व योग्य घडी नीट बसविण्यात अवधी लागणार आहे. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या व्हाव्यात, असा सूर जनतेद्वारा उमटत आहे. याचे कारणही तसेच असून बढती झाल्यानंतर एकाच ठाण्यात ठाण मांडून बसणारे महाभाग मूल बरोबरच इतरही ठाण्यात आहेत. एकाच ठिकाणी वावरत असल्याने त्यांची पकड इतर अवैध धंदे करणाºयांसोबत चांगली जमल्याचे दिसून येते.पोलीस निरीक्षकांच्या बदल्या सर्वांना अचंबित करणाºया ठरल्या. या बदल्यावरुन नेहमी उन्हाळ्यामध्ये होणाºया बदल्यांना फाटा देत अवेळी बदल्या केल्याने सर्वांची भंबेरी उडाली. मात्र सर्वानी स्वत:ला सावरत वरिष्ठांचा आदेश मानत कामावर रूजू झाले.पोलीस प्रशासनात सूसत्रता आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उचललेले पाऊन कौतुकास्पद आहे. मात्र अवैध काम करणाºया काहींना अस्वस्थ तर काहींच्या चेहºयावर हास्य फुलले आहे. ज्या ठाणेदारांनी अवैध धंदे करणाºयांवर जबर बसवले त्यांना ते ठाणेदार नको होते. काहीशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले त्यांना ठाणेदार हवे होते. मात्र ‘विंचवाचं बिºहाड पाठीवर’ या उक्तीप्रमाणे अधिकाºयांची बदली ठरली असल्याने त्यांचे बिºहाड पाठीवरच असते, हेच यावरुन दिसून येते.मूलमध्ये पोलीस उपनिरीक्षक ठाण्यातच मुक्कामाला आहेत की काय, असा भास होताना दिसतो. शिपायांपासून तर पोलीस उपनिरीक्षकापर्यंतचे अनेक जण याच ठाण्यात अथवा परिसरात फिरत असल्याने अवैध धंदे करणाºयांच्या ‘नाड्या’ त्यांना माहित आहेत. त्यामुळे केव्हा नाड्या दाबावच्या याची माहिती असल्याने त्याचा फायदा पोलीस उपनिरीक्षकांना होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या कराव्यात.