शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीकडे लक्ष

By admin | Updated: September 26, 2016 01:10 IST

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

ग्रामीण भागात उत्सुकता : ५ आॅक्टोबरला जाहीर होणार आरक्षण चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नव्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघायला आतापासून सुरुवात झाली आहे. ग्रामीण राजकारणासाठी आरक्षण सोडतीची सर्वांना उत्सुकता लागली असून येत्या ५ आॅक्टोबरला जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समित्यांचे तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आपल्या गटातील व गणातील आरक्षण काय असणार, याकडे उत्सुक उमेदवारांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे विधानसभेच्या निवडणुकीसाठी रंगीत तालीम म्हणून पाहिले जाते. राजकीय पक्ष या निवडणुकीच्या यशापशावर निवडणुकीचे गणित लावतात. केंद्र व राज्यात सत्ताबदल घडविण्याची किमया मतदारांनी केली. आता मात्र मिनी मंत्रालयाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंदाज बांधले जात आहेत. त्या अनुषंगाने निवडणुकीतील उमेदवाराची चर्चा करून चाचपणी करण्यास ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. काहींनी ग्रामीण भागाच्या राजकारणात उतरण्यासाठी प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे. कधी सामाजिक कार्यात न दिसणारे आता मतदारांत वावरू लागले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ५६ गट राहणार असल्याचे निश्चित करण्यात आले. १५ पंचायत समितीचे ११२ गण ठरविण्यात आले आहे. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारूप मतदार यादीला अंतीम रूप देण्याचे कार्य सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत जिल्हा परिषद गटाची एक तर पंचायत समिती गणाच्या दोन जागा आगामी निवडणुकीसाठी कमी करण्यात आले आहेत. राजुरा व कोरपना तालुका वगळता जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुख्य लढत काँग्रेस व भाजपात होत असते. चिमूर तालुक्यात आमदार बंटी भांगडीया यांच्या युवाशक्ती संघटनेने २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत चवथ्या स्थानावर झेप घेतली होती. आता मात्र ते भाजपाचे आमदार असल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेससोबत त्यांना लढत द्यावी लागणार आहे.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ आॅक्टोबरची आरक्षण सोडत निघताच, ग्रामीण भागात मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नजरा या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)