शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तींना तातडीची आर्थिक मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 01:08 IST

वन्यप्राणी मानवावर हल्ला करून जखमी केल्याच्या घटनामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे.

स्वत: करावा लागतो खर्च : तातडीच्या निधीची तरतूद नाहीवरोरा : वन्यप्राणी मानवावर हल्ला करून जखमी केल्याच्या घटनामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची नोंद तातडीने वनविभागात केली जाते. रुग्णालयात जावून वन कर्मचारी अधिकारी जखमीचे बयाण नोंदवितात. परंतु तातडीच्या आर्थिक मदतीची तरतूद नसल्याने जखमींना तातडीची मदत मिळत नसल्याने वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक व्यक्ती शासकीय रुग्णालयाच्या व्यतिरिक्त असलेल्या औषधोपचारापासून वंचित राहात आहेत.वन्यप्राण्यांचा हल्ला शेतात वा गावात होत असतो. या घटना नित्याच्या झाल्या आहेत. शेतीच्या हंगामात अशा अनेक घटना घडत असतात. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीस उपचाराकरीता जखमीचे आप्तेष्ठ मिळेल त्या वाहनाने शासकीय-खाजगी रुग्णालयात दाखल करून त्याबाबत वन विभागाच्या कार्यालयात नोंद करतात. नोंद केल्यानंतर वन कर्मचारी व अधिकारी जखमीचे बयाण घेवून निघून जातात. जखमीला प्राथमिक उपचारानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास खाजगी रुग्णवाहिकेमधून न्यावे लागते. त्यामुळे अनेकदा आप्तेष्टांजवळ पैसे नसल्यास जखमीला तिष्ठत राहावे लागते. शासकीय रुग्णालयात औषधी नसल्यास आर्थिक कमकुवतपणामुळे बाहेरून औषधी घेता येत नाही. ंअशी एक ना अनेक संकटे जखमी व त्यांच्या आप्तांसमोर उभी राहतात. त्यामुळे जखमीना तातडीचा आर्थिक निधी मिळावा, याकरिता तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे.वनाधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वत: करतात मदत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती वनधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी किंवा रुग्णालयात जखमीचे बयाण नोंदविण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांच्यामधील माणुसकीचा झऱ्याला पाझर फुटते. जखमीची अवस्था बघून अनेक वनाधिकारी व वनकर्मचारी आपल्या खिश्यामधून वन्यप्राण्याच्या हल्ल्यातील जखमींना अनेकदा मदत करीत असतात. (तालुका प्रतिनिधी)