शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लाल्या रोगाच्या आक्रमणाने कापसाचे पीक करपू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:37 IST

हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे.

ठळक मुद्देजिवती तालुका : कृषी विभागाच्या अधिकाºयांचे मार्गदर्शन मिळेना

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषीवर आधारित शासन योजनांची पुरेपूर माहिती शेतकºयांना द्यायची असते. जेणेकरून शेतकºयांना तांत्रिक पद्धतीचा वापर करत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येईल, ही त्यामागील शासनाची भूमिका आहे. मात्र पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही कृषी अधिकारी व कर्मचारी पहाडावरील शेतकºयांच्या बांधावर पोहचले नाहीत.पहाडावर शेतकºयांना वर्षानुवर्षे निर्सगाच्या कचाट्यात सापडावे लागत आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, हे शेतकºयांना पाचविलाच पुंजले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामातही पावसाने पाठ फिरवली.जुलै महिन्याच्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावले होते. सर्वत्र हिरवा शिवार दिसायले लागले होते. परंतु, मध्यतंरीच्या काळात पुन्हा पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने कोवळी पिके कोमेजून गेली होती. महिनाभरानंतर पाऊस झाल्याने कोमेजून गेलेली पिके वाचली. आता तरी पाऊस साथ देईल व भरघोस उत्पन्न घेता येईल, असे वाटत असतानाच निर्सगराजा पुन्हा रूसला आणि हाती आलेली उभे पीक रोगामुळे करपू लागले आहे. त्यामुळे अल्पावधीतच शेतकºयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.कुठे पावसाने पिके करपली तर कुठे लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापूस पिके लाल पडली आहेत. कापूस पिकावर हिरवा रंग यावा यासाठी विविध कंपन्याची किटकनाशके फवारली जात आहेत. परंतु, पिकात कुठलाही बदल झालेला दिसत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. असे असतानाही कृषी अधिकारी व कर्मचारी शेतकºयांच्या बांधावर एकदाही भेट देत नसल्याने शेतकºयांना मार्गदर्शन मिळत नाही. अशा अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कृषी अधिकाºयांची अनियमित उपस्थितीजिवती येथील कृषी अधिकारी नियमित येत नाही. शेतकरी मेळावे किंवा शेतकºयांना लाभदायक मार्गदर्शन करीत नाही. त्यामुळे कृषी विभाग कार्यालयाचा शेतकºयांना कसलाच फायदा झालेला दिसत नाही. शेतकºयांच्या प्रश्नांकडे कृषी अधिकारीच दुर्लक्ष करीत असेल, तर शेतकºयांच्या समस्या सुटायच्या कशा, हा प्रश्नच आहे.पावसाची शेतकºयांना प्रतीक्षाचमागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे परिसरातील शेतातील पिके करपू लागल्याने बी-बियासाठी काडलेले कर्ज फेडायचे कसे, संसाराचा गाडा चालवायचा कसा, असे अनेक प्रश्न शेतकरी डोळ्यात अश्रू घेऊन बोलताना दिसत आहे. निर्सगाने शेतकºयांच्या चेहºयावरचे हास्यच हिरावून घेतल्याचे प्रत्यक्ष पीक पाहणीत आढळून आले.