शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लाल्या रोगाच्या आक्रमणाने कापसाचे पीक करपू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:37 IST

हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे.

ठळक मुद्देजिवती तालुका : कृषी विभागाच्या अधिकाºयांचे मार्गदर्शन मिळेना

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषीवर आधारित शासन योजनांची पुरेपूर माहिती शेतकºयांना द्यायची असते. जेणेकरून शेतकºयांना तांत्रिक पद्धतीचा वापर करत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येईल, ही त्यामागील शासनाची भूमिका आहे. मात्र पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही कृषी अधिकारी व कर्मचारी पहाडावरील शेतकºयांच्या बांधावर पोहचले नाहीत.पहाडावर शेतकºयांना वर्षानुवर्षे निर्सगाच्या कचाट्यात सापडावे लागत आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, हे शेतकºयांना पाचविलाच पुंजले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामातही पावसाने पाठ फिरवली.जुलै महिन्याच्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावले होते. सर्वत्र हिरवा शिवार दिसायले लागले होते. परंतु, मध्यतंरीच्या काळात पुन्हा पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने कोवळी पिके कोमेजून गेली होती. महिनाभरानंतर पाऊस झाल्याने कोमेजून गेलेली पिके वाचली. आता तरी पाऊस साथ देईल व भरघोस उत्पन्न घेता येईल, असे वाटत असतानाच निर्सगराजा पुन्हा रूसला आणि हाती आलेली उभे पीक रोगामुळे करपू लागले आहे. त्यामुळे अल्पावधीतच शेतकºयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.कुठे पावसाने पिके करपली तर कुठे लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापूस पिके लाल पडली आहेत. कापूस पिकावर हिरवा रंग यावा यासाठी विविध कंपन्याची किटकनाशके फवारली जात आहेत. परंतु, पिकात कुठलाही बदल झालेला दिसत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. असे असतानाही कृषी अधिकारी व कर्मचारी शेतकºयांच्या बांधावर एकदाही भेट देत नसल्याने शेतकºयांना मार्गदर्शन मिळत नाही. अशा अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कृषी अधिकाºयांची अनियमित उपस्थितीजिवती येथील कृषी अधिकारी नियमित येत नाही. शेतकरी मेळावे किंवा शेतकºयांना लाभदायक मार्गदर्शन करीत नाही. त्यामुळे कृषी विभाग कार्यालयाचा शेतकºयांना कसलाच फायदा झालेला दिसत नाही. शेतकºयांच्या प्रश्नांकडे कृषी अधिकारीच दुर्लक्ष करीत असेल, तर शेतकºयांच्या समस्या सुटायच्या कशा, हा प्रश्नच आहे.पावसाची शेतकºयांना प्रतीक्षाचमागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे परिसरातील शेतातील पिके करपू लागल्याने बी-बियासाठी काडलेले कर्ज फेडायचे कसे, संसाराचा गाडा चालवायचा कसा, असे अनेक प्रश्न शेतकरी डोळ्यात अश्रू घेऊन बोलताना दिसत आहे. निर्सगाने शेतकºयांच्या चेहºयावरचे हास्यच हिरावून घेतल्याचे प्रत्यक्ष पीक पाहणीत आढळून आले.