शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लाल्या रोगाच्या आक्रमणाने कापसाचे पीक करपू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:37 IST

हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे.

ठळक मुद्देजिवती तालुका : कृषी विभागाच्या अधिकाºयांचे मार्गदर्शन मिळेना

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषीवर आधारित शासन योजनांची पुरेपूर माहिती शेतकºयांना द्यायची असते. जेणेकरून शेतकºयांना तांत्रिक पद्धतीचा वापर करत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येईल, ही त्यामागील शासनाची भूमिका आहे. मात्र पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही कृषी अधिकारी व कर्मचारी पहाडावरील शेतकºयांच्या बांधावर पोहचले नाहीत.पहाडावर शेतकºयांना वर्षानुवर्षे निर्सगाच्या कचाट्यात सापडावे लागत आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, हे शेतकºयांना पाचविलाच पुंजले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामातही पावसाने पाठ फिरवली.जुलै महिन्याच्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावले होते. सर्वत्र हिरवा शिवार दिसायले लागले होते. परंतु, मध्यतंरीच्या काळात पुन्हा पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने कोवळी पिके कोमेजून गेली होती. महिनाभरानंतर पाऊस झाल्याने कोमेजून गेलेली पिके वाचली. आता तरी पाऊस साथ देईल व भरघोस उत्पन्न घेता येईल, असे वाटत असतानाच निर्सगराजा पुन्हा रूसला आणि हाती आलेली उभे पीक रोगामुळे करपू लागले आहे. त्यामुळे अल्पावधीतच शेतकºयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.कुठे पावसाने पिके करपली तर कुठे लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापूस पिके लाल पडली आहेत. कापूस पिकावर हिरवा रंग यावा यासाठी विविध कंपन्याची किटकनाशके फवारली जात आहेत. परंतु, पिकात कुठलाही बदल झालेला दिसत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. असे असतानाही कृषी अधिकारी व कर्मचारी शेतकºयांच्या बांधावर एकदाही भेट देत नसल्याने शेतकºयांना मार्गदर्शन मिळत नाही. अशा अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कृषी अधिकाºयांची अनियमित उपस्थितीजिवती येथील कृषी अधिकारी नियमित येत नाही. शेतकरी मेळावे किंवा शेतकºयांना लाभदायक मार्गदर्शन करीत नाही. त्यामुळे कृषी विभाग कार्यालयाचा शेतकºयांना कसलाच फायदा झालेला दिसत नाही. शेतकºयांच्या प्रश्नांकडे कृषी अधिकारीच दुर्लक्ष करीत असेल, तर शेतकºयांच्या समस्या सुटायच्या कशा, हा प्रश्नच आहे.पावसाची शेतकºयांना प्रतीक्षाचमागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे परिसरातील शेतातील पिके करपू लागल्याने बी-बियासाठी काडलेले कर्ज फेडायचे कसे, संसाराचा गाडा चालवायचा कसा, असे अनेक प्रश्न शेतकरी डोळ्यात अश्रू घेऊन बोलताना दिसत आहे. निर्सगाने शेतकºयांच्या चेहºयावरचे हास्यच हिरावून घेतल्याचे प्रत्यक्ष पीक पाहणीत आढळून आले.