शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्यावरून वातावरण तापले

By admin | Updated: October 24, 2015 00:34 IST

तालुक्यातील मौजा सकमूर येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण सात शिक्षक कार्यरत आहेत.

वरिष्ठांकडे तक्रार : व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांकडून बचावगोंडपिंपरी : तालुक्यातील मौजा सकमूर येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण सात शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी बरेच शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे करुन याबाबतची तक्रार शिक्षण विभागाच्या वरिष्ठांकडे केली. मात्र याच तक्रारी विरोधात शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या हितार्थ बचावात्मक पवित्रा घेतल्याने सकमुरात चांगलेच वातावरण तापले आहे.गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांचा मुख्यालयाला ‘खो’ हा मुद्दा सकमुरात गाजत असला तरी संपूर्ण तालुक्यात हा प्रकार सुरू आहे. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहावे तसेच नियोजित कर्तव्ये पार पाडावी, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र अलिकडच्या काळात ग्राम खेड्यात राहण्यास नापसंती दर्शविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज तालुक्यातील बहुतांश विभागाचे कर्मचारी मुख्यालयाला न राहता अधिकाऱ्यांशी समन्वय व मुकसंमती घेवून मुख्यालयाला ‘खो’ देवून घरभाडे, प्रवास भत्ता, नक्षलग्रस्त भत्ता आदी वेतनाअतिरिक्त भत्त्यांची उचल करीत आहे. यामुळे शासनाची अनेक कामे रेंगाळलेली असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.अगदी याच मुद्दयावरुन तालुक्यातीेल सकरमूर गावातील जि.प. शाळा शिक्षक हे मुख्यालयी राहात नसल्याबाबतची तक्रार करण्यात आली. मात्र शिक्षक हितार्थ शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी वर्तमान पत्रातून शिक्षकांची बाजू मांडून शाळेची प्रगती होत असल्याची बाजू मांडली आहे. एकाच गावात वास्तव्यास राहणाऱ्या मात्र वेगवेगळी बाजू मांडणाऱ्या काही पालक तर काही नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचे जाणवत असून शिक्षकांचा मुख्यालयाला खो हा मुद्दा आता तालुक्यात सर्वत्र चर्चील्या जात आहे. यासंदर्भात तेथील मुख्याध्यापिकांनी नवे कारण पुढे केले असून गणेशोत्सवादरम्यान सक्ती रकमेनुसार वर्गणी अदा न केल्याने सदर प्रकार घडल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकंदरीत या सर्व प्रकारावरुन सकमूर गावात मुख्यालयाला खो या मुद्दयावरुन चांगलीच खडाजंगी उडाली आहे. तापलेल्या राजकारणाचे चटके हे विद्यार्थ्यांना बसू नये, याची खबरदारी पालकांसह शिक्षकांचीही आहे. हे तेवढेच सत्य. (तालुका प्रतिनिधी)