शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनाने निम्न पैनगंगा प्रकल्पाला गती मिळण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

आठवडाभरापूर्वी विधान परिषद प्रश्नोत्तरांच्या काळात दोन महिन्यात निर्णय घेऊन लवकरच कामाची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती प्राप्त होण्याची शक्यता आहे. निम्न पैनगंगा हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रस्तावित सिंचन प्रकल्प आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पाठपुरावा करून प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळवली होती. मात्र, निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचा याला प्रखर विरोध होता.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील ताडसावली येथील निम्न पैनगंगा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्प फेररचनेचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी विधान परिषद प्रश्नोत्तरांच्या काळात दोन महिन्यात निर्णय घेऊन लवकरच कामाची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती प्राप्त होण्याची शक्यता आहे. निम्न पैनगंगा हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रस्तावित सिंचन प्रकल्प आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पाठपुरावा करून प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळवली होती. मात्र, निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचा याला प्रखर विरोध होता. या प्रकल्पाविरोधात नागपूर, औरंगाबाद उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल व प्रलंबित होत्या. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काही परवानग्या न मिळाल्याने प्रकल्पाचे काम बंद असून, तो रखडला आहे.२०१२मध्ये प्रस्तावित प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामसुद्धा सुरू झाले होते. परंतु, परवानगी नसल्याचा आरोप धरणविरोधी संघर्ष समितीने केला. ऑक्टोबर २०१४मध्ये केंद्र सरकारने आवश्यक परवानगी दिल्या. मात्र, प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू झाले नाही. तेलंगणा सरकारने महाराष्ट्र सरकारची परवानगी घेत धरणाच्या खालच्या बाजूच्या सीमेवर चनाखा कोर्टा येथे ३६० कोटी रुपये खर्चून बधारा बांधला. 

सध्या प्रकल्पाची किंमत २२ हजार कोटींच्या घरातप्रकल्पाला २७ जून १९९७ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची किंमत १४०२ कोटी ४३ लाख रुपये होती. आजघडीला ही किंमत अंदाजे २२ हजार कोटींच्या घरात आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता २२ हजार ७२७ हेक्टर आर. आहे. यात यवतमाळ जिल्हा एक लाख ४१ हजार ६०७ हेक्टर, चंद्रपूर जिल्हा ५८ हजार ३५५ हेक्टर, तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील २७ हजार ३०९ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेती व उद्योगाला होईल.

निम्न पैनगंगा प्रकल्प कार्यालयाकडून नाशिक येथील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे फेररचनेचा अहवाल तपासणीसाठी सादर करण्यात आला आहे. तसेच समितीमार्फत फेररचनेचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला आहे.- घनश्याम तोटे, कार्यकारी अभियंता, निम्न पैनगंगा प्रकल्प, यवतमाळ.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प