शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण

By admin | Updated: December 1, 2014 22:51 IST

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाद्वारेही मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी एवढेच नाही तर,

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरजिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाद्वारेही मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी एवढेच नाही तर, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र त्यांचे प्रयत्न जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कमी पडण्याची शक्यता आहे. पंधरा पंचायत समितीपैकी तब्बल १२ पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी प्रभारी आहे.जिल्हा परिषदेद्वारे चालविण्यात येणाऱ्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. तो दर्जा सुधारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. यासाठी विविध उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहे. कोणत्याही परिस्थिती खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी पडता कामा नये, यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. एवढेच नाही तर शिक्षकांना विविध विषयांचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणीसाठी एकाच दिवशी काही तालु्क्यातील विद्यार्थ्यांची परीक्षाही घेण्यात आली. त्याचा निकाल अद्याप लागला नाही. निकालानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. हे सर्व ठिक असले तरी जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षक यांच्यातील दुवा असलेल्या जिल्ह्यातील १५ पैकी १२ गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. रिक्त असलेले पद प्रभारींच्या भरोवश्यावर आहे. प्रभारी अधिकारी असल्याने त्यांचा प्रशासकीय कामावर पाहिेजे तसा वचक नाही. एवढेच नाही तर येथेही सेवाज्येष्ठतेला तिरांजली देण्यात आली आहे. मनमर्जीप्रमाणे प्रभार देवून ज्येष्ठांना डावलण्यात आल्याचा प्रकारही घडत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या प्रकारामुळे प्रभारी अधिकाऱ्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या शिक्षक नाही. त्यामुळे जिल्हा स्तरावरून आखण्यात आलेल्या विविध गुणवत्ता विषयक तसेच अन्य योजना प्रभावीपणे राबविण्यात अडचण निर्माण होत आहे. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचे अधिकारी बघत असलेले स्वप्न भविष्यात अधुरे राहतील की काय, असा प्रश्न आता नागरिकांत विचारला जात आहे.